शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

जलसंकट; सोलापूर शहरातील अनेक भागात आता चार दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 1:13 PM

सोलापूर : शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित झाले असताना अनेक भागात चार दिवसाआड पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक ...

ठळक मुद्देशहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित झाले असताना अनेक भागात चार दिवसाआड पाणीजलसंपदा विभाग उजनी धरणातून पाणी सोडण्यास तयार नसल्याने महापालिका प्रशासनासमोर पेच उजनीतून पाणी सोडण्यास विलंब; वापर काटकसरीने करण्याचे आवाहन

सोलापूर : शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित झाले असताना अनेक भागात चार दिवसाआड पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. त्यातच औज बंधारा कोरडा पडला आहे. जलसंपदा विभाग उजनी धरणातून पाणी सोडण्यास तयार नसल्याने महापालिका प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. यावरुन गुरुवारी होणाºया महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ होण्याची चिन्हे आहेत. 

शहरातील पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या औज बंधाºयासाठी उजनीतून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी महापालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाकडे एकूण पाचवेळा केली आहे. जलसंपदा विभागाने हे पाणी १० एप्रिलपर्यंत पुरवा, असे सांगितले आहे. पण प्रत्यक्षात कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पाणी उपसा झाल्याने औज बंधाºयातील पाणी लवकर कमी झाले आहे. जलसंपदा विभागातील अधिकाºयांना लवकर पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत यासाठी मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी चर्चा केली होती.

सध्या टाकळी इनटेकमध्ये असलेले पाणी २५ मार्चपर्यंत पुरेल. त्यानंतर आठवडाभर पाच दिवस पाणीपुरवठा होईल. यानंतर शहरावर जलसंकट ओढावू शकते. उजनीतून १५ मार्चला पाणी सोडल्यास ते २३ मार्चपर्यंत औज बंधाºयात पोहोचेल, असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. पण जलसंपदा विभागाकडून अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही. जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने त्यांच्याकडूनही पाठपुरावा होत नसल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

सर्वसाधारण सभेत गोंधळाची शक्यता 

  • - शहराच्या अनेक भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. जुळे सोलापुरातील नागरिकांनी याबाबत नगरसेवकांकडे तक्रारी केल्या आहेत. या विषयावरुन भाजपा नगरसेवकांनी बुधवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांशी काही नगरसेवकांनी चर्चा केली. याबाबत पाणीपुरवठा विभागातील अधिकारी सिद्धेश्वर उस्तुरगे म्हणाले, शहरात तीन दिवसाआड पाणी दिले जात आहे. चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. 

जुळे सोलापुरातील अनेक नगरांमध्ये बुधवारी चार दिवसांनंतर आणि कमी दाबाने पाणी आले आहे. याबाबत चावीवाल्यांकडे चौकशी केल्यावर त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार चार दिवसाआड पाणी सोडत असल्याचे सांगितले आहे. - सिद्धय्या स्वामीनागरिक, सिद्धेश्वरनगर. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाUjine Damउजनी धरणwater shortageपाणीटंचाई