शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जलसंकट; सोलापूर शहरातील अनेक भागात आता चार दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 13:15 IST

सोलापूर : शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित झाले असताना अनेक भागात चार दिवसाआड पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक ...

ठळक मुद्देशहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित झाले असताना अनेक भागात चार दिवसाआड पाणीजलसंपदा विभाग उजनी धरणातून पाणी सोडण्यास तयार नसल्याने महापालिका प्रशासनासमोर पेच उजनीतून पाणी सोडण्यास विलंब; वापर काटकसरीने करण्याचे आवाहन

सोलापूर : शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित झाले असताना अनेक भागात चार दिवसाआड पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. त्यातच औज बंधारा कोरडा पडला आहे. जलसंपदा विभाग उजनी धरणातून पाणी सोडण्यास तयार नसल्याने महापालिका प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. यावरुन गुरुवारी होणाºया महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ होण्याची चिन्हे आहेत. 

शहरातील पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या औज बंधाºयासाठी उजनीतून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी महापालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाकडे एकूण पाचवेळा केली आहे. जलसंपदा विभागाने हे पाणी १० एप्रिलपर्यंत पुरवा, असे सांगितले आहे. पण प्रत्यक्षात कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पाणी उपसा झाल्याने औज बंधाºयातील पाणी लवकर कमी झाले आहे. जलसंपदा विभागातील अधिकाºयांना लवकर पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत यासाठी मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी चर्चा केली होती.

सध्या टाकळी इनटेकमध्ये असलेले पाणी २५ मार्चपर्यंत पुरेल. त्यानंतर आठवडाभर पाच दिवस पाणीपुरवठा होईल. यानंतर शहरावर जलसंकट ओढावू शकते. उजनीतून १५ मार्चला पाणी सोडल्यास ते २३ मार्चपर्यंत औज बंधाºयात पोहोचेल, असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. पण जलसंपदा विभागाकडून अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही. जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने त्यांच्याकडूनही पाठपुरावा होत नसल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

सर्वसाधारण सभेत गोंधळाची शक्यता 

  • - शहराच्या अनेक भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. जुळे सोलापुरातील नागरिकांनी याबाबत नगरसेवकांकडे तक्रारी केल्या आहेत. या विषयावरुन भाजपा नगरसेवकांनी बुधवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांशी काही नगरसेवकांनी चर्चा केली. याबाबत पाणीपुरवठा विभागातील अधिकारी सिद्धेश्वर उस्तुरगे म्हणाले, शहरात तीन दिवसाआड पाणी दिले जात आहे. चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. 

जुळे सोलापुरातील अनेक नगरांमध्ये बुधवारी चार दिवसांनंतर आणि कमी दाबाने पाणी आले आहे. याबाबत चावीवाल्यांकडे चौकशी केल्यावर त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार चार दिवसाआड पाणी सोडत असल्याचे सांगितले आहे. - सिद्धय्या स्वामीनागरिक, सिद्धेश्वरनगर. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाUjine Damउजनी धरणwater shortageपाणीटंचाई