शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जलसंकट; सोलापूर शहरातील अनेक भागात आता चार दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 13:15 IST

सोलापूर : शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित झाले असताना अनेक भागात चार दिवसाआड पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक ...

ठळक मुद्देशहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित झाले असताना अनेक भागात चार दिवसाआड पाणीजलसंपदा विभाग उजनी धरणातून पाणी सोडण्यास तयार नसल्याने महापालिका प्रशासनासमोर पेच उजनीतून पाणी सोडण्यास विलंब; वापर काटकसरीने करण्याचे आवाहन

सोलापूर : शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित झाले असताना अनेक भागात चार दिवसाआड पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. त्यातच औज बंधारा कोरडा पडला आहे. जलसंपदा विभाग उजनी धरणातून पाणी सोडण्यास तयार नसल्याने महापालिका प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. यावरुन गुरुवारी होणाºया महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ होण्याची चिन्हे आहेत. 

शहरातील पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या औज बंधाºयासाठी उजनीतून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी महापालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाकडे एकूण पाचवेळा केली आहे. जलसंपदा विभागाने हे पाणी १० एप्रिलपर्यंत पुरवा, असे सांगितले आहे. पण प्रत्यक्षात कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पाणी उपसा झाल्याने औज बंधाºयातील पाणी लवकर कमी झाले आहे. जलसंपदा विभागातील अधिकाºयांना लवकर पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत यासाठी मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी चर्चा केली होती.

सध्या टाकळी इनटेकमध्ये असलेले पाणी २५ मार्चपर्यंत पुरेल. त्यानंतर आठवडाभर पाच दिवस पाणीपुरवठा होईल. यानंतर शहरावर जलसंकट ओढावू शकते. उजनीतून १५ मार्चला पाणी सोडल्यास ते २३ मार्चपर्यंत औज बंधाºयात पोहोचेल, असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. पण जलसंपदा विभागाकडून अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही. जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने त्यांच्याकडूनही पाठपुरावा होत नसल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

सर्वसाधारण सभेत गोंधळाची शक्यता 

  • - शहराच्या अनेक भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. जुळे सोलापुरातील नागरिकांनी याबाबत नगरसेवकांकडे तक्रारी केल्या आहेत. या विषयावरुन भाजपा नगरसेवकांनी बुधवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांशी काही नगरसेवकांनी चर्चा केली. याबाबत पाणीपुरवठा विभागातील अधिकारी सिद्धेश्वर उस्तुरगे म्हणाले, शहरात तीन दिवसाआड पाणी दिले जात आहे. चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. 

जुळे सोलापुरातील अनेक नगरांमध्ये बुधवारी चार दिवसांनंतर आणि कमी दाबाने पाणी आले आहे. याबाबत चावीवाल्यांकडे चौकशी केल्यावर त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार चार दिवसाआड पाणी सोडत असल्याचे सांगितले आहे. - सिद्धय्या स्वामीनागरिक, सिद्धेश्वरनगर. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाUjine Damउजनी धरणwater shortageपाणीटंचाई