शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

अवघ्या जिल्ह्याचे लक्ष, कोण साधणार विजयाचा ‘सुवर्ण मध्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 10:56 IST

सोलापूर शहर मध्य;  एमआयएम, महेश कोठे यांना अनपेक्षित साथ

ठळक मुद्देशहर मध्य मतदारसंघात एकूण २० उमेदवार रिंगणात एक लाख ६७ हजार ५६९ मतदारांनी मतदान केलेयंदा ५५.४७ टक्के मतदान झाले

राकेश कदम

सोलापूर  : शहराशी संलग्न तीनपैकी दोन मतदारसंघाच्या निकालाचा सर्वांनाच अंदाज आला आहे. आता शहर मध्य मतदारसंघातील काही भागातून वेगवेगळे कौल येत आहेत. त्यात काँग्रेस आणि शिवसेना आघाडीवर आहे, परंतु एमआयएम आणि महेश कोठे यांना अखेरच्या टप्प्यात चांगली साथ मिळाल्याने चर्चेत रंगत वाढली आहे. या वातावरण विजयाचा सुवर्णमध्ये कोण साधणार याकडे लक्ष आहे. 

शहर मध्य मतदारसंघात एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे दिलीप माने, माकपचे नरसय्या आडम, एमआयएमचे फारुक शाब्दी, अपक्ष उमेदवार महेश कोठे यांच्यात खरी लढत झाली. एकूण तीन लाख दोन ११६ मतदारांपैकी एक लाख ६७ हजार ५६९ मतदारांनी मतदान केले. २०१४ च्या निवडणुकीत ५८.९८ टक्के मतदान झाले होते. यंदा ५५.४७ टक्के मतदान झाले. रामवाडीपासून अशोक चौकापर्यंतच्या मतदान केंद्रावर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चुरस दिसली.

अशोक चौकापासून पूर्व भागात काँग्रेस, महेश कोठे, शिवसेना आणि माकप यांच्यात चुरस दिसली. शास्त्रीनगर, बापूजी नगर, विजापूर वेस या पट्ट्यात काँग्रेस आणि एमआयएमचा जोर होता. मतदारांचा कल लक्षात आल्याने काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे; मात्र या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचा ‘सायलेंट व्होटर’ आहे. तो उघडपणे चर्चा करण्याऐवजी शांतपणे महायुतीलाच साथ देतो. त्यामुळे दिलीप माने समर्थक विजयाच्या दाव्यावर ठाम आहेत.

असा झाला प्रचार- शिवसेना, एमआयएम आणि महेश कोठे यांच्या टीकेचा संपूर्ण रोख प्रणिती शिंदे आणि काँग्रेसवर अपेक्षित होता. परंतु, या तिघांनाही इतर  उमेदवारांवर टीकेचे बाण सोडावे लागले. प्रणिती शिंदे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी याच गोंधळावर बोट ठेवलेले दिसले. प्रणिती शिंदे यांनी प्रत्येक भाषणात ‘मी तुमची मुलगी आहे, मी तुमची बहीण आहे’, अशी भावनिक साद घातली. हे बाहेरचे लोक तुम्हाला काय देणार असा प्रश्न उपस्थित केला.

दिलीप माने यांनी काँग्रेस नेतृत्वाला निष्क्रिय ठरविताना रोजगार, उद्योग या मुद्यांना स्पर्श केला. त्यांच्या समर्थकांनी ‘हिंदुत्व’ हा मुद्दा प्रकर्षाने मांडला. शाब्दी सुरुवातीला ठराविक वस्त्यांमध्ये रमले. यंत्रणा काहीशी विस्कळीत होती. कार्यकर्त्यांना तौफिक शेख यांची उणीव प्रकर्षाने जाणवली. रोजगार, शिक्षण, सर्वांना स्वस्तात घरे, आरोग्य, सामाजिक सुरक्षा हे माकपच्या प्रचारातील मुद्दे होते. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकsolapur-city-central-acसोलापूर शहर मध्यPoliticsराजकारण