शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
2
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
3
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
4
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
5
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
7
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
8
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
9
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
10
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
11
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
12
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
13
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
14
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
15
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
16
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
17
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
18
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
19
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
20
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा

ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफी पूर्णत फसवी : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:48 IST

सुभाष देशमुख यांचा आरोप: दोन लाखांवर हजार रुपये थकबाकी असलेला शेतकरी बेदखल

ठळक मुद्दे- माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली शिवसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेस पक्षावर टीका- ठाकरे सरकार शेतकºयांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा देशमुख यांनी केला आरोप-शेतकºयांना न्याय द्यावा म्हणून विधानसभेत भूमिका मांडणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले

सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने सात-बारा उतारा कोरा करण्याची घोषणा केली, पण अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. या सरकारने घोषित केलेली कर्जमाफी फसवी असून, दोन लाखांवर एक हजार रुपये थकबाकी असलेल्या शेतकºयांना लाभ दिला जात नाही, नियमितपणे कर्ज भरलेल्या शेतकºयांचे काय ? असा सवाल माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला.

माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाºयांना भेटण्यासाठी आले होते, त्यावेळी ’लोकमत’ शी संवाद साधताना ठाकरे सरकार फसवे असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रातील जनतेने युतीला कौल दिला होता, पण युतीचा कल न जुमानता फसवून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिघांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. 

अतिवृष्टी झाली त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बांधावर गेले आणि त्यांनी हेक्टरी २५ हजार कोरडवाहूला तर बागायती शेतीला ५0 हजार मदत देण्याचे वचन शेतकºयांना दिले होते. पण दुर्भाग्य म्हणावे लागेल. राज्यपालांनी दिलेली आठ हजारांची मदत आली आणि ही मदतही अनेक शेतकºयांच्या खात्यावर अद्याप वर्ग झालेली नाही. शेतकºयांचा सात-बारा उतारा कोरा करण्याचे या सरकारने आश्वासन दिले होते. आणखी एकाही शेतकºयाचा सात-बारा उतारा कोरा झालेला नाही. ज्या शेतकºयांनी नियमितपणे कर्ज भरलेले आहे, त्या शेतकºयांनाही प्रोत्साहनपर मदत देतो म्हणून नादी लावले गेले. दोन लाखांच्यावर एक हजाराचेही कर्ज असेल तर त्या शेतकºयाचे नाव कर्जमाफीत बसत नाही. जिल्ह्यातील अशा ३0 हजार शेतकºयांची नावे वगळण्यात आली. 

अशा एक ना अनेक गोष्टींत या सरकारने फसवणूक केली असून, ठाकरे सरकारचा मी धिक्कार करतो, शेतकºयांना न्याय द्यावा म्हणून विधानसभेत भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्ष निवडीस वेळ- भाजप जिल्हाध्यक्षपद निवडणुकीचे काय, असे विचारले असता ते म्हणाले, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांना साडेसहा वर्षे झाली आहेत. भाजपमध्ये एका अध्यक्षाला तीन वर्षे पदावर राहता येते. सध्या जिल्हाध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात १४ मंडळे आहेत, अद्याप ८ मंडळांची नियुक्ती झालेली नाही. या निवडीनंतर इच्छुकांचे अर्ज घेतले जातील. त्यानंतर प्रदेश अध्यक्ष ठरवतील त्यांची नियुक्ती होणार आहे. यावेळी त्यांच्यासमवेत उप महापौर राजेश काळे, हणमंत कुलकर्णी, इरप्पा बिराजदार उपस्थित होते.

अत्याचाºयावर कारवाई करा- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºयावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली. त्याचबरोबर मंद्रुप एमआयडीसीची भूसंपादन प्रक्रिया सुरू करावी, अपर तहसीलमधील पदे भरावीत, मंद्रुप पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करावे, अवैध वाळू उपसा बंद करावा अशा मागण्यांचेही निवेदन दिले. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखagricultureशेतीFarmerशेतकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना