शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफी पूर्णत फसवी : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:48 IST

सुभाष देशमुख यांचा आरोप: दोन लाखांवर हजार रुपये थकबाकी असलेला शेतकरी बेदखल

ठळक मुद्दे- माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली शिवसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेस पक्षावर टीका- ठाकरे सरकार शेतकºयांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा देशमुख यांनी केला आरोप-शेतकºयांना न्याय द्यावा म्हणून विधानसभेत भूमिका मांडणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले

सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने सात-बारा उतारा कोरा करण्याची घोषणा केली, पण अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. या सरकारने घोषित केलेली कर्जमाफी फसवी असून, दोन लाखांवर एक हजार रुपये थकबाकी असलेल्या शेतकºयांना लाभ दिला जात नाही, नियमितपणे कर्ज भरलेल्या शेतकºयांचे काय ? असा सवाल माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला.

माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाºयांना भेटण्यासाठी आले होते, त्यावेळी ’लोकमत’ शी संवाद साधताना ठाकरे सरकार फसवे असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रातील जनतेने युतीला कौल दिला होता, पण युतीचा कल न जुमानता फसवून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिघांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. 

अतिवृष्टी झाली त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बांधावर गेले आणि त्यांनी हेक्टरी २५ हजार कोरडवाहूला तर बागायती शेतीला ५0 हजार मदत देण्याचे वचन शेतकºयांना दिले होते. पण दुर्भाग्य म्हणावे लागेल. राज्यपालांनी दिलेली आठ हजारांची मदत आली आणि ही मदतही अनेक शेतकºयांच्या खात्यावर अद्याप वर्ग झालेली नाही. शेतकºयांचा सात-बारा उतारा कोरा करण्याचे या सरकारने आश्वासन दिले होते. आणखी एकाही शेतकºयाचा सात-बारा उतारा कोरा झालेला नाही. ज्या शेतकºयांनी नियमितपणे कर्ज भरलेले आहे, त्या शेतकºयांनाही प्रोत्साहनपर मदत देतो म्हणून नादी लावले गेले. दोन लाखांच्यावर एक हजाराचेही कर्ज असेल तर त्या शेतकºयाचे नाव कर्जमाफीत बसत नाही. जिल्ह्यातील अशा ३0 हजार शेतकºयांची नावे वगळण्यात आली. 

अशा एक ना अनेक गोष्टींत या सरकारने फसवणूक केली असून, ठाकरे सरकारचा मी धिक्कार करतो, शेतकºयांना न्याय द्यावा म्हणून विधानसभेत भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्ष निवडीस वेळ- भाजप जिल्हाध्यक्षपद निवडणुकीचे काय, असे विचारले असता ते म्हणाले, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांना साडेसहा वर्षे झाली आहेत. भाजपमध्ये एका अध्यक्षाला तीन वर्षे पदावर राहता येते. सध्या जिल्हाध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात १४ मंडळे आहेत, अद्याप ८ मंडळांची नियुक्ती झालेली नाही. या निवडीनंतर इच्छुकांचे अर्ज घेतले जातील. त्यानंतर प्रदेश अध्यक्ष ठरवतील त्यांची नियुक्ती होणार आहे. यावेळी त्यांच्यासमवेत उप महापौर राजेश काळे, हणमंत कुलकर्णी, इरप्पा बिराजदार उपस्थित होते.

अत्याचाºयावर कारवाई करा- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºयावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली. त्याचबरोबर मंद्रुप एमआयडीसीची भूसंपादन प्रक्रिया सुरू करावी, अपर तहसीलमधील पदे भरावीत, मंद्रुप पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करावे, अवैध वाळू उपसा बंद करावा अशा मागण्यांचेही निवेदन दिले. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखagricultureशेतीFarmerशेतकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना