शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकºयांना आता शेतीतील मजुरीही झाली महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 19:51 IST

श्रीपूर परिसर : आर्थिक कोंडी, मजुरांच्या वाहतुकीचा खर्चही शेतकºयांवर

ठळक मुद्देश्रीपूर (ता. माळशिरस) भागांमध्ये जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या लांबल्याबोअर व विहिरींच्या पाण्याची पातळी वाढल्याने शेती ओलिताखाली आली खुरपणाचा खर्च वाढत चाललेला असून मजुरांचा तुटवडा निर्माण झाला

संदीप लोनकरश्रीपूर : श्रीपूर (ता. माळशिरस) भागांमध्ये जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या लांबल्या. जुलैअखेर काही प्रमाणात पडलेल्या पावसामुळे कॅनॉल व नदीला पाणी आल्यामुळे शेतातील बोअर व विहिरींच्या पाण्याची पातळी वाढल्याने शेती ओलिताखाली आली आहे. मात्र पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तण निर्माण झाले आहे. 

परिणामी खुरपणाचा खर्च वाढत चाललेला असून मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी आधीच दुष्काळामुळे होरपळलेला असताना आता मंजुरीमुळे जेरीस आला आहे.

माळशिरस तालुक्यामध्ये जून महिना कोरडा गेला. जुलै-आॅगस्टच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावली. पण धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सर्व धरणे १०० टक्के भरून वाहू लागली. 

त्यामुळे तालुक्यात कॅनॉल व नद्यांना पाणी आल्यामुळे पाणीपातळी वाढली आहे. परिणामी हजारो एकर शेती ओलिताखाली आली. ऊस शेती व सर्व पिकांना भरपूर पाणी दिल्याने तर मोठ्या प्रमाणात शेतात तण वाढले आहे. पिकांमधील तण काढण्यासाठी महिला मजुरांची खुरपणीसाठी मनधरणी करावी लागत आहे.

महिला मजुरांना मागणी वाढली- तालुक्यामध्ये यावर्षी पावसामुळे सुरुवातीला लागवड उशिरा करण्यात आली. त्यातच पावसाने जून महिन्यात पाठ फिरवली. यानंतर जुलै महिन्यात शेवटच्या आलेल्या पावसामुळे शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. तर नद्यांना पाणी आल्यामुळे बोअर व विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली. यामुळे शेती ओलिताखाली आल्याने शेतात तण वाढले. शेतातील तण काढण्यासाठी खर्चही वाढला. खुरपणासाठी महिला मजुरांची मागणी वाढत आहे. यामुळे मजुरी वाढवून देऊन शेतकरी खुरपणाची कामे करीत आहेत.

अतिरिक्त खर्चात झाली वाढ- पूर्वी गावातून शेतमजूर पायीच चालत शेतात येत होते. मात्र गेल्या काही वर्षात मजुरांच्या वाहतुकीसाठी वाहनांची सुविधा शेतकºयांना उपलब्ध करून द्यावी लागते. त्यासाठी ३०० ते ५०० रुपये प्रती दिवस शेतकºयांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

ठेका पद्धतीने शेतीची खुरपणी- यावर्षी महिला मजुरांची मजुरी शंभर ते दीडशे रुपयांच्या घरात असून त्यांना गावापासून शेतापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहन करावे लागते. त्याच्या वाहतुकीचा अतिरिक्त खर्चही शेतकºयांनाच करावा लागत आहे. महिला मजुरांची टंचाई असल्यामुळे दहा ते पंधरा महिलांची टोळी तयार करून काही महिला ठेका पद्धतीने खुरपणीचे काम घेतात. ते शेतामध्ये तणानुसार एकरी दोन ते चार हजार रुपये घेतात.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ