शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकºयांना आता शेतीतील मजुरीही झाली महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 19:51 IST

श्रीपूर परिसर : आर्थिक कोंडी, मजुरांच्या वाहतुकीचा खर्चही शेतकºयांवर

ठळक मुद्देश्रीपूर (ता. माळशिरस) भागांमध्ये जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या लांबल्याबोअर व विहिरींच्या पाण्याची पातळी वाढल्याने शेती ओलिताखाली आली खुरपणाचा खर्च वाढत चाललेला असून मजुरांचा तुटवडा निर्माण झाला

संदीप लोनकरश्रीपूर : श्रीपूर (ता. माळशिरस) भागांमध्ये जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या लांबल्या. जुलैअखेर काही प्रमाणात पडलेल्या पावसामुळे कॅनॉल व नदीला पाणी आल्यामुळे शेतातील बोअर व विहिरींच्या पाण्याची पातळी वाढल्याने शेती ओलिताखाली आली आहे. मात्र पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तण निर्माण झाले आहे. 

परिणामी खुरपणाचा खर्च वाढत चाललेला असून मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी आधीच दुष्काळामुळे होरपळलेला असताना आता मंजुरीमुळे जेरीस आला आहे.

माळशिरस तालुक्यामध्ये जून महिना कोरडा गेला. जुलै-आॅगस्टच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावली. पण धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सर्व धरणे १०० टक्के भरून वाहू लागली. 

त्यामुळे तालुक्यात कॅनॉल व नद्यांना पाणी आल्यामुळे पाणीपातळी वाढली आहे. परिणामी हजारो एकर शेती ओलिताखाली आली. ऊस शेती व सर्व पिकांना भरपूर पाणी दिल्याने तर मोठ्या प्रमाणात शेतात तण वाढले आहे. पिकांमधील तण काढण्यासाठी महिला मजुरांची खुरपणीसाठी मनधरणी करावी लागत आहे.

महिला मजुरांना मागणी वाढली- तालुक्यामध्ये यावर्षी पावसामुळे सुरुवातीला लागवड उशिरा करण्यात आली. त्यातच पावसाने जून महिन्यात पाठ फिरवली. यानंतर जुलै महिन्यात शेवटच्या आलेल्या पावसामुळे शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. तर नद्यांना पाणी आल्यामुळे बोअर व विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली. यामुळे शेती ओलिताखाली आल्याने शेतात तण वाढले. शेतातील तण काढण्यासाठी खर्चही वाढला. खुरपणासाठी महिला मजुरांची मागणी वाढत आहे. यामुळे मजुरी वाढवून देऊन शेतकरी खुरपणाची कामे करीत आहेत.

अतिरिक्त खर्चात झाली वाढ- पूर्वी गावातून शेतमजूर पायीच चालत शेतात येत होते. मात्र गेल्या काही वर्षात मजुरांच्या वाहतुकीसाठी वाहनांची सुविधा शेतकºयांना उपलब्ध करून द्यावी लागते. त्यासाठी ३०० ते ५०० रुपये प्रती दिवस शेतकºयांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

ठेका पद्धतीने शेतीची खुरपणी- यावर्षी महिला मजुरांची मजुरी शंभर ते दीडशे रुपयांच्या घरात असून त्यांना गावापासून शेतापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहन करावे लागते. त्याच्या वाहतुकीचा अतिरिक्त खर्चही शेतकºयांनाच करावा लागत आहे. महिला मजुरांची टंचाई असल्यामुळे दहा ते पंधरा महिलांची टोळी तयार करून काही महिला ठेका पद्धतीने खुरपणीचे काम घेतात. ते शेतामध्ये तणानुसार एकरी दोन ते चार हजार रुपये घेतात.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ