शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

समांतर पाईपलाईनच्या कामात बाधित शेतकºयांना नुकसानभरपाई मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:23 IST

सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे प्रस्ताव पाठविणार : २० कोटींची तरतूद करण्याची मागणी

ठळक मुद्देस्मार्ट सिटी कंपनी आणि एनटीपीसीच्या माध्यमातून टाकण्यात येणाºया उजनी ते सोलापूर समांतर पाईपलाईनची निविदा नुकतीच मंजूरनवी ११० किलोमीटरची पाईपलाईन पूर्णपणे जमिनीखालून टाकण्यात येणार जलशुध्दीकरण केंद्रासह इतर कामे स्वतंत्रपणे करण्यात येणार

सोलापूर : उजनी ते सोलापूर समांतर पाईपलाईन काम करताना काही शेतकºयांची जमीन बाधित होणार आहे. या शेतकºयांना पीक नुकसानभरपाई मिळणार आहे. त्यासाठी महापालिकेने २० कोटी रुपयांची तरतूद करावी, असा प्रस्ताव प्रशासनाकडून सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येणार आहे. 

स्मार्ट सिटी कंपनी आणि एनटीपीसीच्या माध्यमातून टाकण्यात येणाºया उजनी ते सोलापूर समांतर पाईपलाईनची निविदा नुकतीच मंजूर करण्यात आली आहे. हैदराबाद येथील पोचमपाड कंपनीला हे काम मिळाले आहे. १५ आॅगस्टपर्यंत या कामाला सुरुवात करण्याचे स्मार्ट सिटी कंपनीचे नियोजन आहे. सध्याची पाईपलाईन ही काही ठिकाणी रस्त्यालगत उघड्यावर आहे तर काही ठिकाणी जमिनीखालून गेली आहे. पण नवी ११० किलोमीटरची पाईपलाईन पूर्णपणे जमिनीखालून टाकण्यात येणार आहे. यापूर्वी पाईपलाईन करताना बाधित शेतकºयांना नुकसानभरपाई देण्यात आलेली नव्हती.

नव्या पाईपलाईनसाठी खोदाई करावी लागणार आहे. त्यातून शेतकºयांच्या पिकांचे नुकसान होणार आहे.  या शेतकºयांना शासन निमयानुसार नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. मनपा प्रशासनाच्या अंदाजनुसार यासाठी १५ ते २० कोटी रुपये लागणार आहेत. ही रक्कम महापालिकेने द्यावी, असे स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत सुचविण्यात आले आहे. त्यानुसार मनपा प्रशासनाने यासंदर्भात प्रस्ताव तयार केला असून तो मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येणार आहे. 

जलशुद्धीकरण केंद्र स्वतंत्र करणार- समांतर पाईपलाईनच्या मूळ प्रस्तावात पंपगृह, पाईपलाईन, जॅकवेल यासह पाकणी आणि सोरेगाव येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासह इतर कामांचा समावेश होता. त्यातून समांतर पाईपलाईनच्या मूळ निविदेची किंमत वाढत होती. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्रासह इतर कामे स्वतंत्रपणे करण्यात येणार आहेत. त्यासाठी पुन्हा प्रस्ताव तयार करुन निधी मागण्यात येणार आहे. मनपा प्रशासनाने शहरात नव्याने अंतर्गत पाईपलाईन करणे, दोन एमबीआर उभारणे, जलशुद्धीकरण केंद्रे उभारणे यासाठी ३११ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असेही अधिकाºयांकडून सांगण्यात आले. 

आर्थिक अडचण असली तरी घ्यावा लागेल निर्णय - महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने अनेक विकासकामांना तरतूद करता आलेली नाही. वाढती लोकसंख्या विचारात घेता शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी समांतर पाईपलाईनची गरज आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला यावर निर्णय घ्यावाच लागेल, असे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटीwater transportजलवाहतूकUjine Damउजनी धरण