शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

गावी परतण्यासाठी ती फॅमिली आली तब्बल सोळाशे किलोमीटर दुचाकीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 11:43 IST

बिस्कीट खात अन् पायी चालतही निघाली अनेक कुटुंबं गावाकडे परतू लागली

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बागकामांसाठी अनेक परप्रांतीय मजूर येऊन स्थायिकबेरोजगार बनलेली ही मंडळी वाहनांअभावी चालत आपल्या राज्याकडे निघाली ‘कितने भी दिन लगेंगे... लेकीन हम अपने घर वापस जायेंगे’ असा निर्धार व्यक्त करत ही मंडळी चालत पुढे गेली

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : बेंगलोर से राजस्थान के भिलवाडा जा रहे है. वहॉँ पे तो कोई रहने नही दे रहा इसलिए राजस्थान जा रहे है, आपको मारना हे तो मारो साहब मगर हम वापस नही जाएंगे. हमे अपने घर जाने दो, अशा शब्दात आईस्क्रिम विक्रेत्या कुटुंबांतील व्यक्ती जागोजागी चौकशी करणाºयांना उत्तरे देत होती.

बंगळुरु येथे आईस्क्रिम विक्रीचा व्यवसाय करणारे सहा जण दोन बाईकवरुन जात होते. सोमवारी बंगळुरुमधून निघाल्यानंतर बुधवारी ते सोलापुरात पोहोचले. येथून तुळजापूर- उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद मार्गे मध्यप्रदेश नंतर राजस्थान येथे जात आहेत. देशभर लॉकडाऊन केल्यानंतर घर मालकाने त्या कुटुंबीयांना घर सोडण्यास सांगितले. तसेच तीन महिन्याचे भाडे मागितले. आता समोर काही पर्याय दिसत नसल्याने त्यांनी बाईकवरच आपला प्रवास सुरु केला. सोलापुरात येईपर्यंत ६०० किलोमीटरचा प्रवास झाला होता.

पुढे आणखी सुमारे एक हजार किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. कर्नाटक सीमेवर त्यांची गाडी बिघडली. दुरुस्त करणाºयाने ३ हजार ५०० रुपये घेतले. पण गाडी व्यवस्थित दुरुस्त केली नसल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी सकाळपासून फक्त बिस्कीट खाऊनच ते प्रवास करत आहेत. याची माहिती मिळताच प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनी त्यांना जेवण दिले.

लॉकडाऊन करण्यापूर्वी थोडा वेळ द्यायचा होता- जगभर कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. या आजारामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. या काळजीपोटी सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. आजार पसरु नये अशी त्यांची भूमिका होती. पण, ज्यांना घर आहे त्यांचे ठिक आम्हाला घरच नाही. लॉकडाऊन पूर्वी थोडा वेळ दिला असता तर आम्ही आमच्या घरी पोहोचलो असतो. सध्या सगळीकडूनच संकटे येत आहेत.

सहाशे किलोमीटरचा प्रवास आत्तापर्यंत केला आहे. आणखी एक हजार किलोमीटर जायचे आहे. रस्त्यात कितीही अडथळे आले तरी घरी पोहोचायचे आहे. मरण आले तर आमच्या गावातच यावं.- कैलास कुमावत

तळपायाला आले फोड... सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बागकामांसाठी अनेक परप्रांतीय मजूर येऊन स्थायिक झाले आहेत. मात्र कर्फ्यूमुळे सर्व व्यवहारच ठप्प झाल्याने बेरोजगार बनलेली ही मंडळी वाहनांअभावी चालत आपल्या राज्याकडे निघाली आहेत. पंढरपूरहून मध्यप्रदेशातील आपल्या गावी निघालेली ही मंडळी मोडनिंब येथे आली असता त्यांची सोय करण्याचा शब्द स्थानिक नागरिकांनी दिला होता; मात्र ‘कितने भी दिन लगेंगे... लेकीन हम अपने घर वापस जायेंगे’ असा निर्धार व्यक्त करत ही मंडळी चालत पुढे गेली. विशेष म्हणजे अनेकांच्या तळपायाला फोडही आले आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMadhya Pradeshमध्य प्रदेशtwo wheelerटू व्हीलर