शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

गावी परतण्यासाठी ती फॅमिली आली तब्बल सोळाशे किलोमीटर दुचाकीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 11:43 IST

बिस्कीट खात अन् पायी चालतही निघाली अनेक कुटुंबं गावाकडे परतू लागली

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बागकामांसाठी अनेक परप्रांतीय मजूर येऊन स्थायिकबेरोजगार बनलेली ही मंडळी वाहनांअभावी चालत आपल्या राज्याकडे निघाली ‘कितने भी दिन लगेंगे... लेकीन हम अपने घर वापस जायेंगे’ असा निर्धार व्यक्त करत ही मंडळी चालत पुढे गेली

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : बेंगलोर से राजस्थान के भिलवाडा जा रहे है. वहॉँ पे तो कोई रहने नही दे रहा इसलिए राजस्थान जा रहे है, आपको मारना हे तो मारो साहब मगर हम वापस नही जाएंगे. हमे अपने घर जाने दो, अशा शब्दात आईस्क्रिम विक्रेत्या कुटुंबांतील व्यक्ती जागोजागी चौकशी करणाºयांना उत्तरे देत होती.

बंगळुरु येथे आईस्क्रिम विक्रीचा व्यवसाय करणारे सहा जण दोन बाईकवरुन जात होते. सोमवारी बंगळुरुमधून निघाल्यानंतर बुधवारी ते सोलापुरात पोहोचले. येथून तुळजापूर- उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद मार्गे मध्यप्रदेश नंतर राजस्थान येथे जात आहेत. देशभर लॉकडाऊन केल्यानंतर घर मालकाने त्या कुटुंबीयांना घर सोडण्यास सांगितले. तसेच तीन महिन्याचे भाडे मागितले. आता समोर काही पर्याय दिसत नसल्याने त्यांनी बाईकवरच आपला प्रवास सुरु केला. सोलापुरात येईपर्यंत ६०० किलोमीटरचा प्रवास झाला होता.

पुढे आणखी सुमारे एक हजार किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. कर्नाटक सीमेवर त्यांची गाडी बिघडली. दुरुस्त करणाºयाने ३ हजार ५०० रुपये घेतले. पण गाडी व्यवस्थित दुरुस्त केली नसल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी सकाळपासून फक्त बिस्कीट खाऊनच ते प्रवास करत आहेत. याची माहिती मिळताच प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनी त्यांना जेवण दिले.

लॉकडाऊन करण्यापूर्वी थोडा वेळ द्यायचा होता- जगभर कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. या आजारामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. या काळजीपोटी सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. आजार पसरु नये अशी त्यांची भूमिका होती. पण, ज्यांना घर आहे त्यांचे ठिक आम्हाला घरच नाही. लॉकडाऊन पूर्वी थोडा वेळ दिला असता तर आम्ही आमच्या घरी पोहोचलो असतो. सध्या सगळीकडूनच संकटे येत आहेत.

सहाशे किलोमीटरचा प्रवास आत्तापर्यंत केला आहे. आणखी एक हजार किलोमीटर जायचे आहे. रस्त्यात कितीही अडथळे आले तरी घरी पोहोचायचे आहे. मरण आले तर आमच्या गावातच यावं.- कैलास कुमावत

तळपायाला आले फोड... सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बागकामांसाठी अनेक परप्रांतीय मजूर येऊन स्थायिक झाले आहेत. मात्र कर्फ्यूमुळे सर्व व्यवहारच ठप्प झाल्याने बेरोजगार बनलेली ही मंडळी वाहनांअभावी चालत आपल्या राज्याकडे निघाली आहेत. पंढरपूरहून मध्यप्रदेशातील आपल्या गावी निघालेली ही मंडळी मोडनिंब येथे आली असता त्यांची सोय करण्याचा शब्द स्थानिक नागरिकांनी दिला होता; मात्र ‘कितने भी दिन लगेंगे... लेकीन हम अपने घर वापस जायेंगे’ असा निर्धार व्यक्त करत ही मंडळी चालत पुढे गेली. विशेष म्हणजे अनेकांच्या तळपायाला फोडही आले आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMadhya Pradeshमध्य प्रदेशtwo wheelerटू व्हीलर