शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

गावी परतण्यासाठी ती फॅमिली आली तब्बल सोळाशे किलोमीटर दुचाकीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 11:43 IST

बिस्कीट खात अन् पायी चालतही निघाली अनेक कुटुंबं गावाकडे परतू लागली

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बागकामांसाठी अनेक परप्रांतीय मजूर येऊन स्थायिकबेरोजगार बनलेली ही मंडळी वाहनांअभावी चालत आपल्या राज्याकडे निघाली ‘कितने भी दिन लगेंगे... लेकीन हम अपने घर वापस जायेंगे’ असा निर्धार व्यक्त करत ही मंडळी चालत पुढे गेली

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : बेंगलोर से राजस्थान के भिलवाडा जा रहे है. वहॉँ पे तो कोई रहने नही दे रहा इसलिए राजस्थान जा रहे है, आपको मारना हे तो मारो साहब मगर हम वापस नही जाएंगे. हमे अपने घर जाने दो, अशा शब्दात आईस्क्रिम विक्रेत्या कुटुंबांतील व्यक्ती जागोजागी चौकशी करणाºयांना उत्तरे देत होती.

बंगळुरु येथे आईस्क्रिम विक्रीचा व्यवसाय करणारे सहा जण दोन बाईकवरुन जात होते. सोमवारी बंगळुरुमधून निघाल्यानंतर बुधवारी ते सोलापुरात पोहोचले. येथून तुळजापूर- उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद मार्गे मध्यप्रदेश नंतर राजस्थान येथे जात आहेत. देशभर लॉकडाऊन केल्यानंतर घर मालकाने त्या कुटुंबीयांना घर सोडण्यास सांगितले. तसेच तीन महिन्याचे भाडे मागितले. आता समोर काही पर्याय दिसत नसल्याने त्यांनी बाईकवरच आपला प्रवास सुरु केला. सोलापुरात येईपर्यंत ६०० किलोमीटरचा प्रवास झाला होता.

पुढे आणखी सुमारे एक हजार किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. कर्नाटक सीमेवर त्यांची गाडी बिघडली. दुरुस्त करणाºयाने ३ हजार ५०० रुपये घेतले. पण गाडी व्यवस्थित दुरुस्त केली नसल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी सकाळपासून फक्त बिस्कीट खाऊनच ते प्रवास करत आहेत. याची माहिती मिळताच प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनी त्यांना जेवण दिले.

लॉकडाऊन करण्यापूर्वी थोडा वेळ द्यायचा होता- जगभर कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. या आजारामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. या काळजीपोटी सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. आजार पसरु नये अशी त्यांची भूमिका होती. पण, ज्यांना घर आहे त्यांचे ठिक आम्हाला घरच नाही. लॉकडाऊन पूर्वी थोडा वेळ दिला असता तर आम्ही आमच्या घरी पोहोचलो असतो. सध्या सगळीकडूनच संकटे येत आहेत.

सहाशे किलोमीटरचा प्रवास आत्तापर्यंत केला आहे. आणखी एक हजार किलोमीटर जायचे आहे. रस्त्यात कितीही अडथळे आले तरी घरी पोहोचायचे आहे. मरण आले तर आमच्या गावातच यावं.- कैलास कुमावत

तळपायाला आले फोड... सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बागकामांसाठी अनेक परप्रांतीय मजूर येऊन स्थायिक झाले आहेत. मात्र कर्फ्यूमुळे सर्व व्यवहारच ठप्प झाल्याने बेरोजगार बनलेली ही मंडळी वाहनांअभावी चालत आपल्या राज्याकडे निघाली आहेत. पंढरपूरहून मध्यप्रदेशातील आपल्या गावी निघालेली ही मंडळी मोडनिंब येथे आली असता त्यांची सोय करण्याचा शब्द स्थानिक नागरिकांनी दिला होता; मात्र ‘कितने भी दिन लगेंगे... लेकीन हम अपने घर वापस जायेंगे’ असा निर्धार व्यक्त करत ही मंडळी चालत पुढे गेली. विशेष म्हणजे अनेकांच्या तळपायाला फोडही आले आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMadhya Pradeshमध्य प्रदेशtwo wheelerटू व्हीलर