शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्ष उलटून गेले तरीही अक्कलकोटचा रस्ता अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 13:27 IST

शिवानंद फुलारी अक्कलकोट : तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाºया कारंजा चौक ते वीज वितरण कंपनी कार्यालयापर्यंतचा रस्ता दीड ...

ठळक मुद्देधुळीने सगळे वैतागले : प्रवेशासाठीचा पर्यायी मार्गही खडतरचअतिक्रमणधारकांची मर्जी राखण्याचा प्रयत्न

शिवानंद फुलारी

अक्कलकोट : तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाºया कारंजा चौक ते वीज वितरण कंपनी कार्यालयापर्यंतचा रस्ता दीड वर्ष उलटून गेले तरी अद्याप पूर्ण झाला नाही. यासाठी नगरपालिका प्रशासनासह पदाधिकारी ठेकेदारांना जाब विचारत नसल्याचाच हा परिणाम आहे. यामुळे शहरवासीयांची मात्र मुस्कटदाबी होत आहे.

अक्कलकोट शहरात प्रवेश करणारा हा रस्ता नादुरुस्त व अर्धवट स्थितीत असल्याने बायपासवरून राजवाड्याच्या पाठीमागील चढण्याच्या कच्च्या रस्त्यावरून जावे लागत आहे. हा पर्यायी मार्गही खडतरच आहे. इतका त्रास होत असतानाही सगळेच चिडीचूप असल्याने आश्चर्य व्यक्त होत  आहे. वारंवार रस्त्यावर खड्डे पडत असल्याने शासनाने सात कोटी रुपये मंजूर केले; मात्र हा रस्ता सतरा महिने उलटले तरी पूर्णत्वाकडे जाताना दिसत नाही.

पूर्वीच्या खराब रस्त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. कसेबसे दोन वर्षांपूर्वी युती शासनाने सात कोटी रुपये निधी रस्ता बांधणीसाठी दिले. त्यानंतर ई-टेंडरमध्ये सोलापूर येथील पाटील अँड पाटील या कंपनीला ठेका मिळाला. तत्काळ कामाला सुरुवातही केली. सर्व रस्ता जेसीबीने उखडून टाकला. त्यानंतर ज्या पद्धतीने गतीने रस्ता बांधणी काम होणे गरजेचे होते. ते होताना दिसत नाही. यामध्ये नगरपालिका अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदार यांच्यात समन्वय राहिला  नाही. म्हणून कोणाचा कोणावर   वचक राहिलेला नाही. परिणामी  दीड वर्षानंतरही हा रस्ता अपूर्ण आहे.

या रखडलेल्या रस्त्यामुळे या मार्गावरील व्यापाºयांना धुळीचा त्रास होत आहे. याबरोबर त्यांचा दैनंदिन व्यापाºयांना फटकाही बसला आहे. सर्वात कहर म्हणजे या मार्गावरून ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर, आंबेडकर जयंती, शिवजयंती, मोहरम, रमजान, गणपती अशा विविध धार्मिक यात्रा, उत्सवाप्रसंगी कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाला जिकिरीचे होऊन बसले आहे. शासनाच्या धोरणानुसार रस्ता नवीन बांधणी करीत असताना दर्जेदार होणे अपेक्षित आहे; मात्र नियमांना बगल देत, अतिक्रमणधारकांना अभय दिल्याचे समोर येत आहे.

अतिक्रमणधारकांची मर्जी राखण्याचा प्रयत्न- या मार्गावरील व्यापाºयांचे धुळीने आरोग्याबरोबर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक तोटाही झाला आहे. या मार्गावरील २०० हून अधिक व्यापारी रस्त्यामुळे वैतागून गेले आहेत. यामध्ये हॉटेलधारक, मोबाईल, किराणा दुकान, चप्पल दुकान, फ्रुटस्, कृषी असे व्यापारी या रस्त्याच्या आजूबाजूला आहेत. अतिक्रमणधारकांची मर्जी राखण्यासाठी रस्ता मोठा करण्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. नगरपालिका ठेकेदाराला वारंवार मुदतवाढही देत आहे. या मार्गाचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे. या मार्गावरून जाताना स्वामी भक्तांच्या नाकीनऊ येत आहे. 

रस्ता बांधणीला सुरुवात झाल्यानंतर हे काम लवकर पूर्ण होईल आणि आमची समस्या सुटेल, अशी अपेक्षा होती; मात्र नेमके उलटे होत आहे. सुरुवातीला धुळीचा त्रास होत होता, तर आता रस्ता दीड वर्षापासून पूर्ण होत नसल्याने व्यवसायाची वाट लागली आहे.- स्वामीनाथ हेगडे, व्यापारी, अक्कलकोट

या अपूर्ण रस्त्यामुळे व्यापाºयांची आर्थिक कोंडी झाली आहे. अधिकारी व पदाधिकाºयांमध्ये समन्वय नसल्याचा गैरफायदा ठेकेदार घेत आहे. रस्त्यावरील धुळीने व्यापारी त्रस्त आहेत. वाहतुकीलाही त्रासही होत आहे.

                    -आप्पासाहेब पाटील, चालक, कृषी भांडार

टॅग्स :Solapurसोलापूरroad safetyरस्ते सुरक्षा