शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

दीड वर्ष उलटून गेले तरीही अक्कलकोटचा रस्ता अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 13:27 IST

शिवानंद फुलारी अक्कलकोट : तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाºया कारंजा चौक ते वीज वितरण कंपनी कार्यालयापर्यंतचा रस्ता दीड ...

ठळक मुद्देधुळीने सगळे वैतागले : प्रवेशासाठीचा पर्यायी मार्गही खडतरचअतिक्रमणधारकांची मर्जी राखण्याचा प्रयत्न

शिवानंद फुलारी

अक्कलकोट : तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाºया कारंजा चौक ते वीज वितरण कंपनी कार्यालयापर्यंतचा रस्ता दीड वर्ष उलटून गेले तरी अद्याप पूर्ण झाला नाही. यासाठी नगरपालिका प्रशासनासह पदाधिकारी ठेकेदारांना जाब विचारत नसल्याचाच हा परिणाम आहे. यामुळे शहरवासीयांची मात्र मुस्कटदाबी होत आहे.

अक्कलकोट शहरात प्रवेश करणारा हा रस्ता नादुरुस्त व अर्धवट स्थितीत असल्याने बायपासवरून राजवाड्याच्या पाठीमागील चढण्याच्या कच्च्या रस्त्यावरून जावे लागत आहे. हा पर्यायी मार्गही खडतरच आहे. इतका त्रास होत असतानाही सगळेच चिडीचूप असल्याने आश्चर्य व्यक्त होत  आहे. वारंवार रस्त्यावर खड्डे पडत असल्याने शासनाने सात कोटी रुपये मंजूर केले; मात्र हा रस्ता सतरा महिने उलटले तरी पूर्णत्वाकडे जाताना दिसत नाही.

पूर्वीच्या खराब रस्त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. कसेबसे दोन वर्षांपूर्वी युती शासनाने सात कोटी रुपये निधी रस्ता बांधणीसाठी दिले. त्यानंतर ई-टेंडरमध्ये सोलापूर येथील पाटील अँड पाटील या कंपनीला ठेका मिळाला. तत्काळ कामाला सुरुवातही केली. सर्व रस्ता जेसीबीने उखडून टाकला. त्यानंतर ज्या पद्धतीने गतीने रस्ता बांधणी काम होणे गरजेचे होते. ते होताना दिसत नाही. यामध्ये नगरपालिका अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदार यांच्यात समन्वय राहिला  नाही. म्हणून कोणाचा कोणावर   वचक राहिलेला नाही. परिणामी  दीड वर्षानंतरही हा रस्ता अपूर्ण आहे.

या रखडलेल्या रस्त्यामुळे या मार्गावरील व्यापाºयांना धुळीचा त्रास होत आहे. याबरोबर त्यांचा दैनंदिन व्यापाºयांना फटकाही बसला आहे. सर्वात कहर म्हणजे या मार्गावरून ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर, आंबेडकर जयंती, शिवजयंती, मोहरम, रमजान, गणपती अशा विविध धार्मिक यात्रा, उत्सवाप्रसंगी कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाला जिकिरीचे होऊन बसले आहे. शासनाच्या धोरणानुसार रस्ता नवीन बांधणी करीत असताना दर्जेदार होणे अपेक्षित आहे; मात्र नियमांना बगल देत, अतिक्रमणधारकांना अभय दिल्याचे समोर येत आहे.

अतिक्रमणधारकांची मर्जी राखण्याचा प्रयत्न- या मार्गावरील व्यापाºयांचे धुळीने आरोग्याबरोबर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक तोटाही झाला आहे. या मार्गावरील २०० हून अधिक व्यापारी रस्त्यामुळे वैतागून गेले आहेत. यामध्ये हॉटेलधारक, मोबाईल, किराणा दुकान, चप्पल दुकान, फ्रुटस्, कृषी असे व्यापारी या रस्त्याच्या आजूबाजूला आहेत. अतिक्रमणधारकांची मर्जी राखण्यासाठी रस्ता मोठा करण्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. नगरपालिका ठेकेदाराला वारंवार मुदतवाढही देत आहे. या मार्गाचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे. या मार्गावरून जाताना स्वामी भक्तांच्या नाकीनऊ येत आहे. 

रस्ता बांधणीला सुरुवात झाल्यानंतर हे काम लवकर पूर्ण होईल आणि आमची समस्या सुटेल, अशी अपेक्षा होती; मात्र नेमके उलटे होत आहे. सुरुवातीला धुळीचा त्रास होत होता, तर आता रस्ता दीड वर्षापासून पूर्ण होत नसल्याने व्यवसायाची वाट लागली आहे.- स्वामीनाथ हेगडे, व्यापारी, अक्कलकोट

या अपूर्ण रस्त्यामुळे व्यापाºयांची आर्थिक कोंडी झाली आहे. अधिकारी व पदाधिकाºयांमध्ये समन्वय नसल्याचा गैरफायदा ठेकेदार घेत आहे. रस्त्यावरील धुळीने व्यापारी त्रस्त आहेत. वाहतुकीलाही त्रासही होत आहे.

                    -आप्पासाहेब पाटील, चालक, कृषी भांडार

टॅग्स :Solapurसोलापूरroad safetyरस्ते सुरक्षा