शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

दीड वर्ष उलटून गेले तरीही अक्कलकोटचा रस्ता अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 13:27 IST

शिवानंद फुलारी अक्कलकोट : तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाºया कारंजा चौक ते वीज वितरण कंपनी कार्यालयापर्यंतचा रस्ता दीड ...

ठळक मुद्देधुळीने सगळे वैतागले : प्रवेशासाठीचा पर्यायी मार्गही खडतरचअतिक्रमणधारकांची मर्जी राखण्याचा प्रयत्न

शिवानंद फुलारी

अक्कलकोट : तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाºया कारंजा चौक ते वीज वितरण कंपनी कार्यालयापर्यंतचा रस्ता दीड वर्ष उलटून गेले तरी अद्याप पूर्ण झाला नाही. यासाठी नगरपालिका प्रशासनासह पदाधिकारी ठेकेदारांना जाब विचारत नसल्याचाच हा परिणाम आहे. यामुळे शहरवासीयांची मात्र मुस्कटदाबी होत आहे.

अक्कलकोट शहरात प्रवेश करणारा हा रस्ता नादुरुस्त व अर्धवट स्थितीत असल्याने बायपासवरून राजवाड्याच्या पाठीमागील चढण्याच्या कच्च्या रस्त्यावरून जावे लागत आहे. हा पर्यायी मार्गही खडतरच आहे. इतका त्रास होत असतानाही सगळेच चिडीचूप असल्याने आश्चर्य व्यक्त होत  आहे. वारंवार रस्त्यावर खड्डे पडत असल्याने शासनाने सात कोटी रुपये मंजूर केले; मात्र हा रस्ता सतरा महिने उलटले तरी पूर्णत्वाकडे जाताना दिसत नाही.

पूर्वीच्या खराब रस्त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. कसेबसे दोन वर्षांपूर्वी युती शासनाने सात कोटी रुपये निधी रस्ता बांधणीसाठी दिले. त्यानंतर ई-टेंडरमध्ये सोलापूर येथील पाटील अँड पाटील या कंपनीला ठेका मिळाला. तत्काळ कामाला सुरुवातही केली. सर्व रस्ता जेसीबीने उखडून टाकला. त्यानंतर ज्या पद्धतीने गतीने रस्ता बांधणी काम होणे गरजेचे होते. ते होताना दिसत नाही. यामध्ये नगरपालिका अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदार यांच्यात समन्वय राहिला  नाही. म्हणून कोणाचा कोणावर   वचक राहिलेला नाही. परिणामी  दीड वर्षानंतरही हा रस्ता अपूर्ण आहे.

या रखडलेल्या रस्त्यामुळे या मार्गावरील व्यापाºयांना धुळीचा त्रास होत आहे. याबरोबर त्यांचा दैनंदिन व्यापाºयांना फटकाही बसला आहे. सर्वात कहर म्हणजे या मार्गावरून ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर, आंबेडकर जयंती, शिवजयंती, मोहरम, रमजान, गणपती अशा विविध धार्मिक यात्रा, उत्सवाप्रसंगी कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाला जिकिरीचे होऊन बसले आहे. शासनाच्या धोरणानुसार रस्ता नवीन बांधणी करीत असताना दर्जेदार होणे अपेक्षित आहे; मात्र नियमांना बगल देत, अतिक्रमणधारकांना अभय दिल्याचे समोर येत आहे.

अतिक्रमणधारकांची मर्जी राखण्याचा प्रयत्न- या मार्गावरील व्यापाºयांचे धुळीने आरोग्याबरोबर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक तोटाही झाला आहे. या मार्गावरील २०० हून अधिक व्यापारी रस्त्यामुळे वैतागून गेले आहेत. यामध्ये हॉटेलधारक, मोबाईल, किराणा दुकान, चप्पल दुकान, फ्रुटस्, कृषी असे व्यापारी या रस्त्याच्या आजूबाजूला आहेत. अतिक्रमणधारकांची मर्जी राखण्यासाठी रस्ता मोठा करण्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. नगरपालिका ठेकेदाराला वारंवार मुदतवाढही देत आहे. या मार्गाचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे. या मार्गावरून जाताना स्वामी भक्तांच्या नाकीनऊ येत आहे. 

रस्ता बांधणीला सुरुवात झाल्यानंतर हे काम लवकर पूर्ण होईल आणि आमची समस्या सुटेल, अशी अपेक्षा होती; मात्र नेमके उलटे होत आहे. सुरुवातीला धुळीचा त्रास होत होता, तर आता रस्ता दीड वर्षापासून पूर्ण होत नसल्याने व्यवसायाची वाट लागली आहे.- स्वामीनाथ हेगडे, व्यापारी, अक्कलकोट

या अपूर्ण रस्त्यामुळे व्यापाºयांची आर्थिक कोंडी झाली आहे. अधिकारी व पदाधिकाºयांमध्ये समन्वय नसल्याचा गैरफायदा ठेकेदार घेत आहे. रस्त्यावरील धुळीने व्यापारी त्रस्त आहेत. वाहतुकीलाही त्रासही होत आहे.

                    -आप्पासाहेब पाटील, चालक, कृषी भांडार

टॅग्स :Solapurसोलापूरroad safetyरस्ते सुरक्षा