शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पानटपरी बंद करून शेतीत गुंतला अन् वर्षात लिंबूविक्रीतून तीन लाखांचे उत्पन्न घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 13:16 IST

कुर्डूवाडीतील तरुण शेतकºयाची यशोगाथा; एका वर्षात सुमारे ७५० डाग लिंबाचे उत्पादन घेतल

ठळक मुद्देसेंद्रिय शेती आणि ड्रीपद्वारे केलेल्या प्रयोगातून दीड एकरात ७५० डाग लिंबू निघालेकुर्डूवाडी येथील बाजारपेठेने चांगला दर दिला़  वार्षिक लागवड खर्च चाळीस हजार रुपये आलालिंबूचे दर ऋतूनुसार बदलतात, तरीही कमीतकमी शंभर ते जास्तीत जास्त दीड हजार रुपये उच्चांकी दर

लक्ष्मण कांबळेकुर्डूवाडी : वयाच्या सोळाव्या वर्षी एका पानटपरीच्या व्यवसायात उतरून जीवनाला सुरुवात केली...अनेक उद्योग क्षेत्रात राहूनही वडिलोपार्जित शेतीकडे वळले.. बघता-बघता एक प्रयोगशील तरुण शेतकरी म्हणून नावलौकिकही झाला..पाच वर्षांपूर्वी दीड एकरात लिंबाची १५० झाडं लावली..रासायनिक खतांची मात्रा न देता वर्षभर सेंद्रिय खताची योग्य मात्रा दिली़. उत्कृष्ट नियोजनाद्वारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न घेण्याची किमया साधली आहे कुर्डूवाडी येथील तरुणाने.

विशाल चंद्रकांत गोरे असे त्या अवलिया शेतकºयाचे नाव. त्यामुळे ते सध्या एक प्रयोगशील शेतकरी म्हणून चर्चेत आहेत.  कुर्डूवाडी शहराच्या हद्दीत ढवळस रोडवर विशाल गोरे यांची दीड एकर लिंबाची बाग आहे. ते स्वत: पदवीधर आहेत. लिंबाच्या बागेत ते दरवर्षी जून- जुलै महिन्यात अंतर्गत मशागत करतात.  प्रथम जमिनीची खननी करून घेतली. त्यानंतर त्याची बांधणी केली. त्यामध्ये सेंद्रिय खताची मात्रा दिली. तसेच अधिकप्रमाणात शेणखत वापरले. बाग सध्या सहा वर्षांची आहे.

बागेतील लिंबूच्या झाडांना इनलाईन ड्रीपच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला़ यासाठी एका बोअरची सुविधा उपलब्ध केली आहे. एका वर्षात सुमारे ७५० डाग लिंबाचे उत्पादन घेतले. शेती विभागात अग्रेसर असलेले गोरे हे इतर उद्योगातही अग्रेसर आहेत. त्यांच्या प्रयोगशील कार्यात त्यांच्सया कुटूंबानेही योगदान दिले आहे़ त्यांनी वीटभट्टीसारखे उद्योगधंदेही नावारूपाला आणले आहेत. त्याचबरोबर ते एका सामाजिक संस्थेद्वारे सामाजिक बांधिलकी म्हणून कु र्डूवाडीत सामाजिक उपक्रम राबवताहेत़ शेतीविषयक असणारे प्रेम त्यांना प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे ठरले.

शेतीप्रयोगाबाबत विशाल गोरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी लागवडीतले बारकावे सांगितले़ शेती करताना अभ्यासूवृत्ती बाळगण्याचे आवाहन त्यांनीर केले़ ते म्हणाले, लहानपणापासून उद्योग क्षेत्रात करिअर करीत आहे. कोणताही धंदा छोटा किंवा मोठा नाही हे लक्षात घेऊन प्रथम एका पानटपरीच्या माध्यमातून व्यवसायाला सुरुवात केली. वीटभट्टी सारख्या उद्योगात काम करीत आहे. पण पारंपरिक शेती व्यवसायात खूप आवड असल्याने सेंद्रिय पद्धतीने बाग जोपासण्याचा प्रयोग केला. त्यातून भरघोस नफा मिळाला आहे.यापुडे शेतकºयांनी प्रयोग केल्याशिवाय उत्पन्न नाही. 

स्थानिक बाजारपेठेने दिला १५० रुपयांचा दर सेंद्रिय शेती आणि ड्रीपद्वारे केलेल्या प्रयोगातून दीड एकरात ७५० डाग लिंबू निघाले़ त्याला कुर्डूवाडी येथील बाजारपेठेने चांगला दर दिला़  वार्षिक लागवड खर्च चाळीस हजार रुपये आला. लिंबूचे दर ऋतूनुसार बदलतात, तरीही कमीतकमी शंभर ते जास्तीत जास्त दीड हजार रुपये उच्चांकी दर त्यांना मिळाला़ त्यातून वर्षाकाठी खर्च वगळता सुमारे तीन लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. हा प्रयोग करत असताना अल्ताफ मुलाणी यांचे मार्गदर्शन लाभले. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी