शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

देगाव प्रकल्पातील मलनिस्सारणातून वीजनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 08:19 IST

राज्यातील वेगळा प्रयोग : सांडपाण्यावर प्रक्रिया करत साधला आर्थिक फायदा

ठळक मुद्देदीड वर्षात वीज बिलात १३ लाख रुपयांची बचतमहापालिकेच्या देगाव येथील मलनिस्सारण केंद्रात मिथेन वायूपासून वीजनिर्मिती केली जात आहेसध्या उन्हाळ्याच्या दिवसात या प्रकल्पात दररोज सरासरी २५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होते

राकेश कदम

सोलापूर : महापालिकेच्या देगाव येथील मलनिस्सारण केंद्रात मिथेन वायूपासून वीजनिर्मिती केली जात आहे. यामुळे गेल्या दीड वर्षात संपूर्ण प्रकल्पाच्या वीज बिलात १३ ते १४ लाख रुपयांची बचत झाली आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालला तर वर्षाला २० लाख रुपयांचे वीज बिल कमी येईल, असा दावाही मनपा प्रशासनाने केला आहे. 

देगाव येथील मलनिस्सारण प्रकल्प आॅगस्ट २०१७ मध्ये कार्यान्वित झाला. तीन वर्षांसाठी तो खासगी कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आला आहे. महापालिकेचे देगावसह प्रतापनगर, कुमठे या ठिकाणी मलनिस्सारण प्रकल्प आहेत. देगाव हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. इतर दोन प्रकल्पांतील शुध्द झालेले पाणी या प्रकल्पात आणण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाला दरमहा दोन लाख युनिट वीज लागते. त्यातील ३०० ते ४०० युनिट वीज मिथेन वायूपासून मिळते. यावर २५ एमएलडीचा पंपहाऊस, स्ट्रीट लाईट्स, एअर ब्लोअर वापरले जातात. 

सध्या उन्हाळ्याच्या दिवसात या प्रकल्पात दररोज सरासरी २५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होते. उन्हाळा वगळता इतर हंगामात सरासरी ३५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होत असल्याचे मनपाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहायक अभियंता संतोष यलगुलवार यांनी सांगितले. मिथेन वायूपासून दररोज ३०० ते ४०० युनिट वीज निर्मिती होते. यामुळे प्रकल्पाच्या वीज बिलात दरमहा ७२ ते ८० हजार रुपयांची बचत होत आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालला तर दर महिन्याला २६ हजार युनिट वीजनिर्मिती होईल. प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालला तर वीज बिलात वर्षाला २० लाख रुपयांची बचत होईल, असा दावाही महापालिका प्रशासनाने केला आहे. 

कशी होते प्रक्रिया...- सहायक अभियंता संतोष यलगुलवार म्हणाले, सांडपाण्यावरील पहिल्या प्रक्रियेत कचरा, प्लास्टिक बॅग, वाळूचे कण अशा विविध प्रकारच्या वस्तू विलग होतात. त्यानंतर सांडपाणी काँबीट्रीट युनिटमध्ये येते. तिथून हे पाणी हवाबंद टाकीमध्ये (अ‍ॅनारॉबिक डायझेशन) घेतले जाते. या प्रक्रियेत मिथेन, कार्बनडाय आॅक्साईड, सल्फरडाय आॅक्साईड, अमोनिया, आर्द्रता आदी घटक तयार होतात. या पाण्याचे विघटन झाल्यानंतर तयार झालेला स्लज (घाण चिखल) टाकीच्या तळाला बसतो. यातूनच कच्चा मिथेन वायू तयार होतो. हा कच्चा मिथेन शुध्द करण्यासाठी पुन्हा स्क्रबर टँकमध्ये घेतला जातो. स्क्रबरसाठी पाण्याचे दोन टँक वापरले जातात. आयर्न मीडीयासाठी चार टँक वापरण्यात आले आहेत. स्क्रबर करीत असताना त्यातून सल्फरडाय आॅक्साईड आणि कार्बनडाय आॅक्साईड हे पाण्यासोबत आणि आयर्न मीडीयासोबत निघून जातात. या टाकीतील शुध्द मिथेन वायू पुढे दोन टाक्यांमध्ये साठविला जातो. हा जमा झालेला गॅस जनरेटरला इंधन म्हणून वापरला जातो. त्यातून जनरेटर सेट कार्यान्वित होतात.  

सांडपाण्यापासून वीजनिर्मिती हा राज्यातील वेगळा प्रयोग आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालला तर प्रकल्पाच्या वीजबिलात सरासरी २० टक्के इतकी बचत होऊ शकते. शिवाय सांडपाण्याचा पुनर्वापर व्हावा असा महापालिकेचा प्रयत्न आहे. शुध्द झालेले पाणी बागा, झाडांना दिले जात आहे. पुढील काळात खासगी बांधकामांना पाणी देण्याचे धोरण आखले जात आहे. वीजनिर्मिती आणि पुनर्वापरातून महापालिकेचा आर्थिक फायद होईल. - सुनीता हिबारे, उपअभियंता, महापालिका

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाmahavitaranमहावितरणPower ShutdownभारनियमनSmart Cityस्मार्ट सिटी