शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील ७६ महसुली मंडळात अतिवृष्टी; ६ तालुक्यातील ९२ गावांना पुराचा फटका, २७ गावातील वीजपुरवठा बंदच

By आप्पासाहेब पाटील | Updated: September 29, 2025 17:28 IST

पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे सव्वाचार हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

आप्पासाहेब पाटील

सोलापूर :  मागील काही दिवसांपूर्वी झालेली अतिवृष्टी तसेच भीमा व सीना नदीला महापूर येऊन ६ तालुक्यातील ९२ गावांतील शेती, घरदारे, जनावरे तसेच गावातील सार्वजनिक सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ११० महसुली मंडळापैकी ७६ मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे तसेच ९२ गावांना पुराचा फटका बसलेला आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे सीना, भीमा नदीला महापूर आल्याने जवळपासच्या शेकडो गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतजमिनी, घरे, मंदिरांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे पिकेही नष्ट झाली आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे सव्वाचार हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सोलापूर-विजयपूर महामार्गावरील हत्तूर, वडकबाळ येथील पुलावरून पाणी पातळी वाढल्यामुळे जड वाहतुकीस सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घालण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीचे ९५ गावात जवळपास २५ कोटी चे नुकसान झालेले आहे. सध्या २७ गावातील वीजपुरवठा बंद असल्याची माहिती महावितरणने दिली.

सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पूरस्थिती संदर्भात आढावा घेतला. यावेळी जिल्हा प्रशासनाला पूरग्रस्तांना मदत करण्याविषयी सूचना केल्या. पुरामुळे घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना शासकीय मदत प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. निवारा केंद्रातील लोकांना दोन वेळ जेवण तर जनावरांना मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध करण्याचे निर्देशही जयकुमार गाेरे यांनी दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur Rainfall: 76 Circles Affected, 92 Villages Hit by Floods

Web Summary : Heavy rain and floods in Solapur's six talukas have severely impacted 92 villages. Farmlands, homes, and infrastructure suffered extensive damage. Thousands evacuated, traffic disrupted, and 27 villages remain without power. Relief efforts are underway.
टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसfloodपूर