शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

पाण्यात विष कालवल्यामुळे हत्तुर येथील तळ्यातील हजारो मासे दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 14:35 IST

संताजी शिंदे  सोलापूर : गेल्या दोन वर्षांतील कमी पाऊस, पिकाची शाश्वती नाही. अशा अवस्थेत पर्यायी आणि खात्रीशीर उत्पादनासाठी मत्स्य ...

ठळक मुद्दे हत्तूर येथील घटना; मत्स्यपालकांनी दिली विजापूर नाका ठाण्यात फिर्याद पाच हजार मरून पाण्यावर तरंगताना पाहून हत्तूर येथील मत्स्य व्यावसायिकांची निराशातूर हातातून गेली, कांद्यानं फसवले आणि माशाने वाकवले अशी अवस्था शेतकºयाची झाली

संताजी शिंदे सोलापूर : गेल्या दोन वर्षांतील कमी पाऊस, पिकाची शाश्वती नाही. अशा अवस्थेत पर्यायी आणि खात्रीशीर उत्पादनासाठी मत्स्य व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसातच मासे हाताला येणार, अशी आशा करत असताना कोणीतरी विष टाकले आणि पाच हजार मरून पाण्यावर तरंगताना पाहून हत्तूर येथील मत्स्य व्यावसायिकांची निराशा  झाली. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद नोंदविली आहे.

रमेश शिवशरण आणि प्रकाश बनशेट्टी-पुजारी या दोन शेतकºयांनी हत्तूर येथील एका व्यक्तीची १६ एकर पडीक शेती करण्यासाठी घेतली आहे. गेल्या दोन वर्षांत पाऊस कमी झाला, शेतात म्हणावे तसे उत्पन्न काढता आले नाही. शेतीला पूरक  व्यवसाय असावा, पर्यायी उत्पन्न असावे म्हणून शेतकºयांनी याच शेतात असलेल्या कृत्रिम तळ्यात मत्सपालन करण्याचा निर्णय घेतला. जून २०१८ मध्ये २५ हजार रुपये खर्चून कृत्रिम तळ्यात कटला आणि सुपरनेस जातीची सुमारे पाच हजार माशाची पिल्ले कृत्रिम तळ्यात सोडले. माशांना दररोज खाद्य देण्याचे काम शेतकºयांमार्फत केले जात होते.

जूनमध्ये सोडण्यात आलेले मासे हळूहळू मोठे होऊ लागले होते. जून २0१९ मध्ये हे मासे पूर्ण मोठे होऊन विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवण्याची तयारी शेतकरी करीत होते. पाण्यात पाळीव प्राणी कुत्रा, मांजर आणि अन्य जनावरे जाऊ नये म्हणून तारेचे कुंपण बांधण्यात आले आहे. माशांना अन्य पक्षांचा उपद्रव होऊ नये म्हणून तळ्याच्या वरच्या बाजूला जाळी बांधण्यात आली आहे. जाळी काही ठिकाणी फाटल्यामुळे पाण्याच्या वरचा काही भाग मोकळा आहे.

प्रकाश बनशेट्टी-पुजारी यांनी नेहमीप्रमाणे १४ फेब्रुवारी रोजी माशांना खाद्य टाकले आणि निघून गेले. १५ फेब्रुवारी रोजी पुन्हा खाद्य घेऊन तळ्याजवळ आले असता, त्यांना पाण्याच्या आतील मासे हे पाण्यावर तरंगताना दिसून आले. हा काय प्रकार म्हणून त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, आतमध्ये मासे मरून पडल्याचे लक्षात आले. अवघ्या चार महिन्यात माशाचे उत्पन्न मिळणार आहे, अशी आशा बाळगणाºया प्रकाश बनशेट्टी हे डोक्याला हात लावून जमिनीवर बसले. ८ ते ९ वर्षांचे कष्ट वाया गेले या विचाराने ते विचलित झाले. 

तूर गेली, कांदा फसला, माशाने वाकवले...- शेतात अन्य जमिनीवर तूर लावण्यात आली आहे. तुरीला भाव मिळणार नाही म्हणून जास्त लक्ष कांद्याकडे दिले. कांद्याला जास्त पाणी दिले, कांदा हातात आला; मात्र बाजारात त्याची किंमत घसरली. हा कांदा आता शेतात सडत आहे. तुरीकडे लक्ष न दिल्यामुळे या पिकाची अपेक्षा करता येत नाही. ज्या मत्स उत्पादनाची अपेक्षा होती ती तर एका रात्रीत संपली. अंगाचे पाणी करून दिवस रात्र शेतात राबणारे प्रकाश बनशेट्टी सध्या हवालदिल झाले आहेत. तूर हातातून गेली, कांद्यानं फसवले आणि माशाने वाकवले अशी अवस्था शेतकºयाची झाली आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरfishermanमच्छीमारWaterपाणीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसFarmerशेतकरी