शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यात विष कालवल्यामुळे हत्तुर येथील तळ्यातील हजारो मासे दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 14:35 IST

संताजी शिंदे  सोलापूर : गेल्या दोन वर्षांतील कमी पाऊस, पिकाची शाश्वती नाही. अशा अवस्थेत पर्यायी आणि खात्रीशीर उत्पादनासाठी मत्स्य ...

ठळक मुद्दे हत्तूर येथील घटना; मत्स्यपालकांनी दिली विजापूर नाका ठाण्यात फिर्याद पाच हजार मरून पाण्यावर तरंगताना पाहून हत्तूर येथील मत्स्य व्यावसायिकांची निराशातूर हातातून गेली, कांद्यानं फसवले आणि माशाने वाकवले अशी अवस्था शेतकºयाची झाली

संताजी शिंदे सोलापूर : गेल्या दोन वर्षांतील कमी पाऊस, पिकाची शाश्वती नाही. अशा अवस्थेत पर्यायी आणि खात्रीशीर उत्पादनासाठी मत्स्य व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसातच मासे हाताला येणार, अशी आशा करत असताना कोणीतरी विष टाकले आणि पाच हजार मरून पाण्यावर तरंगताना पाहून हत्तूर येथील मत्स्य व्यावसायिकांची निराशा  झाली. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद नोंदविली आहे.

रमेश शिवशरण आणि प्रकाश बनशेट्टी-पुजारी या दोन शेतकºयांनी हत्तूर येथील एका व्यक्तीची १६ एकर पडीक शेती करण्यासाठी घेतली आहे. गेल्या दोन वर्षांत पाऊस कमी झाला, शेतात म्हणावे तसे उत्पन्न काढता आले नाही. शेतीला पूरक  व्यवसाय असावा, पर्यायी उत्पन्न असावे म्हणून शेतकºयांनी याच शेतात असलेल्या कृत्रिम तळ्यात मत्सपालन करण्याचा निर्णय घेतला. जून २०१८ मध्ये २५ हजार रुपये खर्चून कृत्रिम तळ्यात कटला आणि सुपरनेस जातीची सुमारे पाच हजार माशाची पिल्ले कृत्रिम तळ्यात सोडले. माशांना दररोज खाद्य देण्याचे काम शेतकºयांमार्फत केले जात होते.

जूनमध्ये सोडण्यात आलेले मासे हळूहळू मोठे होऊ लागले होते. जून २0१९ मध्ये हे मासे पूर्ण मोठे होऊन विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवण्याची तयारी शेतकरी करीत होते. पाण्यात पाळीव प्राणी कुत्रा, मांजर आणि अन्य जनावरे जाऊ नये म्हणून तारेचे कुंपण बांधण्यात आले आहे. माशांना अन्य पक्षांचा उपद्रव होऊ नये म्हणून तळ्याच्या वरच्या बाजूला जाळी बांधण्यात आली आहे. जाळी काही ठिकाणी फाटल्यामुळे पाण्याच्या वरचा काही भाग मोकळा आहे.

प्रकाश बनशेट्टी-पुजारी यांनी नेहमीप्रमाणे १४ फेब्रुवारी रोजी माशांना खाद्य टाकले आणि निघून गेले. १५ फेब्रुवारी रोजी पुन्हा खाद्य घेऊन तळ्याजवळ आले असता, त्यांना पाण्याच्या आतील मासे हे पाण्यावर तरंगताना दिसून आले. हा काय प्रकार म्हणून त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, आतमध्ये मासे मरून पडल्याचे लक्षात आले. अवघ्या चार महिन्यात माशाचे उत्पन्न मिळणार आहे, अशी आशा बाळगणाºया प्रकाश बनशेट्टी हे डोक्याला हात लावून जमिनीवर बसले. ८ ते ९ वर्षांचे कष्ट वाया गेले या विचाराने ते विचलित झाले. 

तूर गेली, कांदा फसला, माशाने वाकवले...- शेतात अन्य जमिनीवर तूर लावण्यात आली आहे. तुरीला भाव मिळणार नाही म्हणून जास्त लक्ष कांद्याकडे दिले. कांद्याला जास्त पाणी दिले, कांदा हातात आला; मात्र बाजारात त्याची किंमत घसरली. हा कांदा आता शेतात सडत आहे. तुरीकडे लक्ष न दिल्यामुळे या पिकाची अपेक्षा करता येत नाही. ज्या मत्स उत्पादनाची अपेक्षा होती ती तर एका रात्रीत संपली. अंगाचे पाणी करून दिवस रात्र शेतात राबणारे प्रकाश बनशेट्टी सध्या हवालदिल झाले आहेत. तूर हातातून गेली, कांद्यानं फसवले आणि माशाने वाकवले अशी अवस्था शेतकºयाची झाली आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरfishermanमच्छीमारWaterपाणीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसFarmerशेतकरी