शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी सोलापूर जिल्हा ; मोफत पासबरोबर आता परीक्षा शुल्कही होणार माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 16:59 IST

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा: उच्च तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुके म्हणून समावेशशालेय विद्यार्थ्यांना एस.टी.ची मोफत पास सुविधा जाहीर करुन अंमलातव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आकारलेले परीक्षा शुल्क माफ  होणार

सोलापूर:  खरीप हंगाम २०१८-१९ साठी राज्यातील १८० तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती घोषित करुन शासनाने शालेय विद्यार्थ्यांना एस.टी.ची मोफत पास सुविधा जाहीर करुन अंमलात आणली. त्यानंतर दुष्काळ घोषित केलेल्या मंडलातील तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचेही परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय मंगळवारी राज्याच्या उच्च तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. याचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांंतील विद्यार्थ्यांना होणार आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुके म्हणून समावेश झाला आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील उत्तर व दक्षिण सोलापूर, मोहोळ, करमाळा, अक्कलकोट, माढा, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला तालुक्यातील तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आकारलेले परीक्षा शुल्क माफ  होणार आहे. 

यंदा सोलापूर जिल्ह्यासह राज्यात पावसाने दगा दिल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील एकूण १८० तालुक्यांतील २६८ महसुली मंडलांमध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये परीक्षा शुल्कमाफीची योजना लागू झाली आहे. याबरोबरच यापुढे २०१८ मध्ये महसूल व वनविभागाने अन्य तालुक्यांमध्ये किंवा मंडलांमध्ये तेथीलही विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीची योजना लागू होईल, असे उच्च तंत्र शिक्षण विभागाने परिपत्रकात म्हटले आहे. राज्य शासनाने दुष्काळ घोषित केलेल्या गावातील विद्यार्थ्यांना संबंधित संस्थेने व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने कोणत्याही स्वरूपाचे परीक्षा शुल्क आकारू नये, असेही आदेशात म्हटले आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील शासनाने जाहीर केलेल्या तंत्र शिक्षणाच्या अधिपत्याखालील विद्यार्थ्यांना या परीक्षा शुल्क माफी योजनेचा लाभ होणार आहे.

 पुरावा जोडणे बंधनकारक

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या गावातील रहिवासाचा पुरावा जोडून संबंधित संस्थेकडे देणे आवश्यक आहे. दुष्काळग्रस्त भागातील ज्या विद्यार्थ्यांकडून संबंधित संस्थेने परीक्षा शुल्क आकारले आहे, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क परत करावे, असा आदेश शिक्षण संस्थांना शासनाने जारी केला आहे.

यांना पन्नास टक्के शुल्क माफच्जे विद्यार्थी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के शुल्क माफ करावे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप परीक्षा फी भरली नसेल त्यांनी १५ दिवसात भरावी, असेही आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठdroughtदुष्काळ