शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दुष्काळी सोलापूर जिल्हा ; मोफत पासबरोबर आता परीक्षा शुल्कही होणार माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 16:59 IST

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा: उच्च तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुके म्हणून समावेशशालेय विद्यार्थ्यांना एस.टी.ची मोफत पास सुविधा जाहीर करुन अंमलातव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आकारलेले परीक्षा शुल्क माफ  होणार

सोलापूर:  खरीप हंगाम २०१८-१९ साठी राज्यातील १८० तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती घोषित करुन शासनाने शालेय विद्यार्थ्यांना एस.टी.ची मोफत पास सुविधा जाहीर करुन अंमलात आणली. त्यानंतर दुष्काळ घोषित केलेल्या मंडलातील तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचेही परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय मंगळवारी राज्याच्या उच्च तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. याचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांंतील विद्यार्थ्यांना होणार आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुके म्हणून समावेश झाला आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील उत्तर व दक्षिण सोलापूर, मोहोळ, करमाळा, अक्कलकोट, माढा, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला तालुक्यातील तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आकारलेले परीक्षा शुल्क माफ  होणार आहे. 

यंदा सोलापूर जिल्ह्यासह राज्यात पावसाने दगा दिल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील एकूण १८० तालुक्यांतील २६८ महसुली मंडलांमध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये परीक्षा शुल्कमाफीची योजना लागू झाली आहे. याबरोबरच यापुढे २०१८ मध्ये महसूल व वनविभागाने अन्य तालुक्यांमध्ये किंवा मंडलांमध्ये तेथीलही विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीची योजना लागू होईल, असे उच्च तंत्र शिक्षण विभागाने परिपत्रकात म्हटले आहे. राज्य शासनाने दुष्काळ घोषित केलेल्या गावातील विद्यार्थ्यांना संबंधित संस्थेने व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने कोणत्याही स्वरूपाचे परीक्षा शुल्क आकारू नये, असेही आदेशात म्हटले आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील शासनाने जाहीर केलेल्या तंत्र शिक्षणाच्या अधिपत्याखालील विद्यार्थ्यांना या परीक्षा शुल्क माफी योजनेचा लाभ होणार आहे.

 पुरावा जोडणे बंधनकारक

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या गावातील रहिवासाचा पुरावा जोडून संबंधित संस्थेकडे देणे आवश्यक आहे. दुष्काळग्रस्त भागातील ज्या विद्यार्थ्यांकडून संबंधित संस्थेने परीक्षा शुल्क आकारले आहे, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क परत करावे, असा आदेश शिक्षण संस्थांना शासनाने जारी केला आहे.

यांना पन्नास टक्के शुल्क माफच्जे विद्यार्थी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के शुल्क माफ करावे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप परीक्षा फी भरली नसेल त्यांनी १५ दिवसात भरावी, असेही आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठdroughtदुष्काळ