शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

सावरकरांचा मुद्दा आता काढू नका, आमचं सरकार व्यवस्थित चाललंय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 05:51 IST

संजय राऊत अंदमानला गेले की नाही माहीत नाही, पण मी जाऊन आलोय. सावरकरांबाबत अनेक चुकीच्या गोष्टी पसरविण्यात आल्या आहेत.

सोलापूर : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी त्याग केलाय ही वस्तुस्थिती आहे. पण सावरकरांबाबत अनेक चुकीच्या गोष्टी पसरविण्यात आल्या आहेत. आता त्या गोष्टी काढू नका. आमचं सरकार चाललंय चालू द्या. हा मुद्दा आता येत नाही, असे मत काँग्रेसचे प्रवक्ते खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत खा. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता दलवाई म्हणाले, संजय राऊत अंदमानला गेले की नाही माहीत नाही, पण मी जाऊन आलोय. सावरकरांबाबत अनेक चुकीच्या गोष्टी पसरविण्यात आल्या आहेत. अनेक वर्षे ते एकाच बरॅकमध्ये होते वगैरे हे खरे नाही. तीन महिन्यांतून एकदा सर्वांना इकडून तिकडे हलवले जायचे. इतर लोकांनाही तिथे शिक्षा झाली होती. पण आता या गोष्टी काढू नका. आमचं सरकार चाललंय, चालू द्या.हे सरकार भागवत चालवतात का?राष्ट्रीय नागरिकत्व कायदा मागे घेणार नाही असे मोहन भागवत म्हणतात. भागवत हे काय देशाचे पंतप्रधान आहेत काय?, असा सवालही दलवाई यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे सरकार कोण चालवतंय, याचं उत्तर द्यावं. संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला त्यावेळी इंदिराजींनी लोकांच्या भावना पंडित नेहरु यांच्यापर्यंत पोहोचविल्या. सरकारने प्रतिष्ठेचा मुद्दा न करता निर्णय मागे घेतला. तामिळनाडूमध्ये हिंदीला विरोध झाल्यानंतर हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे तर संपर्क भाषा झाली, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Hussein Dalwaiहुसेन दलवाईcongressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊत