शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
5
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
6
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
7
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
8
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
9
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
10
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
11
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
12
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
13
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
14
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
15
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
16
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
17
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
18
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
19
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
20
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

बिमारी टपून बसलीय, देऊ नका थारा; आपली माणसं जपा, दूषित पाणी टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:27 IST

सोलापूर : पावसाळा आला रे आला की, दूषित पाणी अनेक जलस्रोतांमध्ये मिसळले जाते अन् मग पाठीमागून दबा धरून बसलेले ...

सोलापूर : पावसाळा आला रे आला की, दूषित पाणी अनेक जलस्रोतांमध्ये मिसळले जाते अन् मग पाठीमागून दबा धरून बसलेले आजार हळूच आपल्या शरीरात शिरकाव करतात. बदललेल्या हवामानामुळे सर्दी, खोकला, गॅस्ट्रो, असे एक का अनेक पोटाचे विकार मागे लागतात. दवाखान्यात जाऊन जाऊन खिसा रिकामा केला जातो. हे सारे नको असेल, तर मग एकच करावे लागेल. दूषित पाणी शुद्ध करून प्यायला हवे. यासाठी घरगुती अंमल करा. सर्वांनाच प्यारा असलेल्या जिवासाठी एवढे तर करावेच लागणार ना!

पावसाळ्यात सर्वाधिक साथीचे आजार दूषित पाण्यामुळे बळावतात. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे, अगदी घरगुती उपाय म्हणजे उकळून थंड केलेले स्वच्छ पाणी पिणे आरोग्याला अगदी उत्तम. पाणी गरम करून वापरल्यामुळे पाण्यातील जंतू नष्ट होतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.

पाणी शुद्ध करण्यासाठी नेहमी गाळून घ्यावे आणि उंचावर झाकून ठेवावे. पिण्याच्या पाण्यात शेवग्याच्या शेंगाच्या वाळलेल्या बिया टाकून ठेवल्या, तर गाळ त्यात चिकटतो व खाली तळाशी बसतो. पाण्यावर तुरटी फिरवावी मग गाळ पाण्याच्या तळाशी बसून थोड्यावेळाने पाणी पिण्यास शुद्ध होते. हे घरगुती उपाय तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतात.

-----

पाणी उकळून प्या

- पाणी उकळून पिणे हा चांगला व सोपा आपणास घरच्या घरी करता येणार उपाय आहे. दहा मिनिटे पाणी उकळून थंड झाल्यावर कळसी, टाकीत भरून ठेवा. ते पाणी प्यायल्यावर पाण्यातील जंतूंपासून होणारे कोणतेही आजार होणार नाहीत.

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

- पावसाळ्यात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार.

- सर्दी, खोकला- पडसे यासारखे आजारही जडतात.

- कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यासारख्याही आजारांना मन्युष्य बळी पडतो.

- या आजारांमुळे आपली पचनक्रिया मंदावते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

- दूषित पाणी आणि अन्नपदार्थांमधून संसर्गजन्य काविळीचा वाढ होते.

- उलटी व जुलाबामुळे शरीर कोरडे पडणे म्हणजेच गॅस्ट्रो. या रोगाचा फैलाव फार मोठ्या प्रमाणत होतो.

----

आजाराची लक्षणे

- पोटात पेटके येऊन दुखणे व वारंवार जुलाब होणे.

- उलटी होणे, लहान मुलांची टाळू खोल जाणे, डोळे खोल जाणे.

- सतत तोंड कोरडे पडणे, वजनात घट होणे.

- लघवी कमी होणे किंवा लघवीचा रंग बदलणे.

- जुलाब वा उलट्यांमधून रक्त जाणे

------

सोलापूर शहराच्या २०११ च्या जणगणनेनुसार लोकसंख्या १० लाख ५३ हजार आहे. शहरला दररोज ----------------------- एवढा पाणीपुरवठा होतो. लोकसंख्येनुसार पिण्यासाठी ----------------- एवढे पाणी लागते. उजनी धरणातून पाइलाइनद्वारे शहराला पाणीपुरवठा होता. पावसाळ्यात होणाऱ्या गळती अथवा धरणातील पाण्यामुळे दूषित पाणी मिसळल्याने सध्या शहर-जिल्ह्यात साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे.

----