शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

बिमारी टपून बसलीय, देऊ नका थारा; आपली माणसं जपा, दूषित पाणी टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:27 IST

सोलापूर : पावसाळा आला रे आला की, दूषित पाणी अनेक जलस्रोतांमध्ये मिसळले जाते अन् मग पाठीमागून दबा धरून बसलेले ...

सोलापूर : पावसाळा आला रे आला की, दूषित पाणी अनेक जलस्रोतांमध्ये मिसळले जाते अन् मग पाठीमागून दबा धरून बसलेले आजार हळूच आपल्या शरीरात शिरकाव करतात. बदललेल्या हवामानामुळे सर्दी, खोकला, गॅस्ट्रो, असे एक का अनेक पोटाचे विकार मागे लागतात. दवाखान्यात जाऊन जाऊन खिसा रिकामा केला जातो. हे सारे नको असेल, तर मग एकच करावे लागेल. दूषित पाणी शुद्ध करून प्यायला हवे. यासाठी घरगुती अंमल करा. सर्वांनाच प्यारा असलेल्या जिवासाठी एवढे तर करावेच लागणार ना!

पावसाळ्यात सर्वाधिक साथीचे आजार दूषित पाण्यामुळे बळावतात. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे, अगदी घरगुती उपाय म्हणजे उकळून थंड केलेले स्वच्छ पाणी पिणे आरोग्याला अगदी उत्तम. पाणी गरम करून वापरल्यामुळे पाण्यातील जंतू नष्ट होतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.

पाणी शुद्ध करण्यासाठी नेहमी गाळून घ्यावे आणि उंचावर झाकून ठेवावे. पिण्याच्या पाण्यात शेवग्याच्या शेंगाच्या वाळलेल्या बिया टाकून ठेवल्या, तर गाळ त्यात चिकटतो व खाली तळाशी बसतो. पाण्यावर तुरटी फिरवावी मग गाळ पाण्याच्या तळाशी बसून थोड्यावेळाने पाणी पिण्यास शुद्ध होते. हे घरगुती उपाय तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतात.

-----

पाणी उकळून प्या

- पाणी उकळून पिणे हा चांगला व सोपा आपणास घरच्या घरी करता येणार उपाय आहे. दहा मिनिटे पाणी उकळून थंड झाल्यावर कळसी, टाकीत भरून ठेवा. ते पाणी प्यायल्यावर पाण्यातील जंतूंपासून होणारे कोणतेही आजार होणार नाहीत.

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

- पावसाळ्यात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार.

- सर्दी, खोकला- पडसे यासारखे आजारही जडतात.

- कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यासारख्याही आजारांना मन्युष्य बळी पडतो.

- या आजारांमुळे आपली पचनक्रिया मंदावते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

- दूषित पाणी आणि अन्नपदार्थांमधून संसर्गजन्य काविळीचा वाढ होते.

- उलटी व जुलाबामुळे शरीर कोरडे पडणे म्हणजेच गॅस्ट्रो. या रोगाचा फैलाव फार मोठ्या प्रमाणत होतो.

----

आजाराची लक्षणे

- पोटात पेटके येऊन दुखणे व वारंवार जुलाब होणे.

- उलटी होणे, लहान मुलांची टाळू खोल जाणे, डोळे खोल जाणे.

- सतत तोंड कोरडे पडणे, वजनात घट होणे.

- लघवी कमी होणे किंवा लघवीचा रंग बदलणे.

- जुलाब वा उलट्यांमधून रक्त जाणे

------

सोलापूर शहराच्या २०११ च्या जणगणनेनुसार लोकसंख्या १० लाख ५३ हजार आहे. शहरला दररोज ----------------------- एवढा पाणीपुरवठा होतो. लोकसंख्येनुसार पिण्यासाठी ----------------- एवढे पाणी लागते. उजनी धरणातून पाइलाइनद्वारे शहराला पाणीपुरवठा होता. पावसाळ्यात होणाऱ्या गळती अथवा धरणातील पाण्यामुळे दूषित पाणी मिसळल्याने सध्या शहर-जिल्ह्यात साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे.

----