शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

बिमारी टपून बसलीय, देऊ नका थारा; आपली माणसं जपा, दूषित पाणी टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:27 IST

सोलापूर : पावसाळा आला रे आला की, दूषित पाणी अनेक जलस्रोतांमध्ये मिसळले जाते अन् मग पाठीमागून दबा धरून बसलेले ...

सोलापूर : पावसाळा आला रे आला की, दूषित पाणी अनेक जलस्रोतांमध्ये मिसळले जाते अन् मग पाठीमागून दबा धरून बसलेले आजार हळूच आपल्या शरीरात शिरकाव करतात. बदललेल्या हवामानामुळे सर्दी, खोकला, गॅस्ट्रो, असे एक का अनेक पोटाचे विकार मागे लागतात. दवाखान्यात जाऊन जाऊन खिसा रिकामा केला जातो. हे सारे नको असेल, तर मग एकच करावे लागेल. दूषित पाणी शुद्ध करून प्यायला हवे. यासाठी घरगुती अंमल करा. सर्वांनाच प्यारा असलेल्या जिवासाठी एवढे तर करावेच लागणार ना!

पावसाळ्यात सर्वाधिक साथीचे आजार दूषित पाण्यामुळे बळावतात. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे, अगदी घरगुती उपाय म्हणजे उकळून थंड केलेले स्वच्छ पाणी पिणे आरोग्याला अगदी उत्तम. पाणी गरम करून वापरल्यामुळे पाण्यातील जंतू नष्ट होतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.

पाणी शुद्ध करण्यासाठी नेहमी गाळून घ्यावे आणि उंचावर झाकून ठेवावे. पिण्याच्या पाण्यात शेवग्याच्या शेंगाच्या वाळलेल्या बिया टाकून ठेवल्या, तर गाळ त्यात चिकटतो व खाली तळाशी बसतो. पाण्यावर तुरटी फिरवावी मग गाळ पाण्याच्या तळाशी बसून थोड्यावेळाने पाणी पिण्यास शुद्ध होते. हे घरगुती उपाय तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतात.

-----

पाणी उकळून प्या

- पाणी उकळून पिणे हा चांगला व सोपा आपणास घरच्या घरी करता येणार उपाय आहे. दहा मिनिटे पाणी उकळून थंड झाल्यावर कळसी, टाकीत भरून ठेवा. ते पाणी प्यायल्यावर पाण्यातील जंतूंपासून होणारे कोणतेही आजार होणार नाहीत.

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

- पावसाळ्यात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार.

- सर्दी, खोकला- पडसे यासारखे आजारही जडतात.

- कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यासारख्याही आजारांना मन्युष्य बळी पडतो.

- या आजारांमुळे आपली पचनक्रिया मंदावते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

- दूषित पाणी आणि अन्नपदार्थांमधून संसर्गजन्य काविळीचा वाढ होते.

- उलटी व जुलाबामुळे शरीर कोरडे पडणे म्हणजेच गॅस्ट्रो. या रोगाचा फैलाव फार मोठ्या प्रमाणत होतो.

----

आजाराची लक्षणे

- पोटात पेटके येऊन दुखणे व वारंवार जुलाब होणे.

- उलटी होणे, लहान मुलांची टाळू खोल जाणे, डोळे खोल जाणे.

- सतत तोंड कोरडे पडणे, वजनात घट होणे.

- लघवी कमी होणे किंवा लघवीचा रंग बदलणे.

- जुलाब वा उलट्यांमधून रक्त जाणे

------

सोलापूर शहराच्या २०११ च्या जणगणनेनुसार लोकसंख्या १० लाख ५३ हजार आहे. शहरला दररोज ----------------------- एवढा पाणीपुरवठा होतो. लोकसंख्येनुसार पिण्यासाठी ----------------- एवढे पाणी लागते. उजनी धरणातून पाइलाइनद्वारे शहराला पाणीपुरवठा होता. पावसाळ्यात होणाऱ्या गळती अथवा धरणातील पाण्यामुळे दूषित पाणी मिसळल्याने सध्या शहर-जिल्ह्यात साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे.

----