शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

खोलीत बसून नियोजन नको, गावात जाऊन माहिती घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 12:52 IST

दक्षिण सोलापूर तालुका टंचाई आढावा बैठकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे आदेश

ठळक मुद्देदक्षिण सोलापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांच्या उपस्थितीत टंचाई आराखडा नियोजन बैठकमंद्रुप, आहेरवाडी, रामपूर येथे पाणी टंचाई असून नव्याने टँकर देण्याची तसेच खेपा वाढवण्याची मागणी करण्यात आली पावसाळा येईपर्यंत ग्रामसेवक आणि तलाठ्यांना मुख्यालयात मुक्काम करणे सक्तीचे

सोलापूर :  ग्रामीण भागातील जनता पाणीटंचाई, जनावरांचा चारा आणि रोहयोच्या कामासाठी आक्रोश करीत असताना अधिकाºयांनी बंद खोलीत बसून दुष्काळाचे नियोजन करणे अयोग्य आहे.  गावात जा, जागेवर जाऊन माहिती घ्या, ग्रामस्थांशी बोला मग नियोजन करा, असे सक्त आदेश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी अधिकाºयांना दिले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांच्या उपस्थितीत टंचाई आराखडा नियोजन बैठकीत सहकारमंत्री बोलत होते. व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार,  सभापती सोनाली कडते,  उपसभापती संदीप टेळे, बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब पाटील-वडकबाळकर, रामप्पा चिवडशेट्टी, श्रीमंत बंडगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंद्रुप, आहेरवाडी, रामपूर येथे पाणी टंचाई असून नव्याने टँकर देण्याची तसेच खेपा वाढवण्याची मागणी करण्यात आली. टँकर मागणीच्या प्रस्तावाला प्रशासन प्रतिसाद देत नाही. काही गावांना अर्धा टँकर पाणीपुरवठा होतो तोही एखादीच खेप. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. तलाठी गावात येत नाहीत अशा तक्रारी लोकप्रतिनिधींनी करताच सहकारमंत्री काहीसे संतप्त झाले. त्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले.

आठ दिवसात अहवाल सादर करा, असे आदेश त्यांनी दिले. चारा छावण्या सुरु करण्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन सहकारमंत्र्यांनी केले. तालुक्यात एकही संस्था पुढे येत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. कंदलगावचे शरीफ शेख यांनी चारा छावण्या सुरू होत नसतील तर जनावरांची गणती करून शेतकºयांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची मागणी केली. चारा डेपो सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला तरच प्रस्तावांना दोन दिवसात मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिले.

बैठकीला डॉ.सी.जी. हविनाळे, हणमंत कुलकर्णी, एम.डी. कमळे, शशिकांत दुपारगुडे, भारत बिराजदार, नागण्णा बनसोडे यांच्यासह तालुक्यातील सरपंच-ग्रामसेवक, शासकीय कर्मचारी उपस्थित होते.

अनुपस्थित तलाठ्याच्या निलंबनाचे आदेश- आहेरवाडीचे तलाठी गावात येत नाहीत, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. बैठकीलाही ते उपस्थित नव्हते त्यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश सहकारमंत्र्यांनी दिले.- पावसाळा येईपर्यंत ग्रामसेवक आणि तलाठ्यांना मुख्यालयात मुक्काम करणे सक्तीचे आहे. त्यात हयगय झाल्यास कठोर कारवाई करू, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिल्या.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखdroughtदुष्काळwater transportजलवाहतूकSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय