शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

खोलीत बसून नियोजन नको, गावात जाऊन माहिती घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 12:52 IST

दक्षिण सोलापूर तालुका टंचाई आढावा बैठकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे आदेश

ठळक मुद्देदक्षिण सोलापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांच्या उपस्थितीत टंचाई आराखडा नियोजन बैठकमंद्रुप, आहेरवाडी, रामपूर येथे पाणी टंचाई असून नव्याने टँकर देण्याची तसेच खेपा वाढवण्याची मागणी करण्यात आली पावसाळा येईपर्यंत ग्रामसेवक आणि तलाठ्यांना मुख्यालयात मुक्काम करणे सक्तीचे

सोलापूर :  ग्रामीण भागातील जनता पाणीटंचाई, जनावरांचा चारा आणि रोहयोच्या कामासाठी आक्रोश करीत असताना अधिकाºयांनी बंद खोलीत बसून दुष्काळाचे नियोजन करणे अयोग्य आहे.  गावात जा, जागेवर जाऊन माहिती घ्या, ग्रामस्थांशी बोला मग नियोजन करा, असे सक्त आदेश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी अधिकाºयांना दिले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांच्या उपस्थितीत टंचाई आराखडा नियोजन बैठकीत सहकारमंत्री बोलत होते. व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार,  सभापती सोनाली कडते,  उपसभापती संदीप टेळे, बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब पाटील-वडकबाळकर, रामप्पा चिवडशेट्टी, श्रीमंत बंडगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंद्रुप, आहेरवाडी, रामपूर येथे पाणी टंचाई असून नव्याने टँकर देण्याची तसेच खेपा वाढवण्याची मागणी करण्यात आली. टँकर मागणीच्या प्रस्तावाला प्रशासन प्रतिसाद देत नाही. काही गावांना अर्धा टँकर पाणीपुरवठा होतो तोही एखादीच खेप. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. तलाठी गावात येत नाहीत अशा तक्रारी लोकप्रतिनिधींनी करताच सहकारमंत्री काहीसे संतप्त झाले. त्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले.

आठ दिवसात अहवाल सादर करा, असे आदेश त्यांनी दिले. चारा छावण्या सुरु करण्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन सहकारमंत्र्यांनी केले. तालुक्यात एकही संस्था पुढे येत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. कंदलगावचे शरीफ शेख यांनी चारा छावण्या सुरू होत नसतील तर जनावरांची गणती करून शेतकºयांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची मागणी केली. चारा डेपो सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला तरच प्रस्तावांना दोन दिवसात मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिले.

बैठकीला डॉ.सी.जी. हविनाळे, हणमंत कुलकर्णी, एम.डी. कमळे, शशिकांत दुपारगुडे, भारत बिराजदार, नागण्णा बनसोडे यांच्यासह तालुक्यातील सरपंच-ग्रामसेवक, शासकीय कर्मचारी उपस्थित होते.

अनुपस्थित तलाठ्याच्या निलंबनाचे आदेश- आहेरवाडीचे तलाठी गावात येत नाहीत, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. बैठकीलाही ते उपस्थित नव्हते त्यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश सहकारमंत्र्यांनी दिले.- पावसाळा येईपर्यंत ग्रामसेवक आणि तलाठ्यांना मुख्यालयात मुक्काम करणे सक्तीचे आहे. त्यात हयगय झाल्यास कठोर कारवाई करू, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिल्या.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखdroughtदुष्काळwater transportजलवाहतूकSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय