शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

एकाचवेळी तीन ऋतूंमुळे साथीचे आजार; उमेदवारांनो, तब्येत सांभाळून करा प्रचार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 12:31 IST

शरीरातील तापमानाचा समतोल बिघडला : दिवसा ऊन, संध्याकाळी पाऊस अन् रात्री थंडी !

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातही अकरा विधानसभा मतदारसंघात १५४ उमेदवार निवडणूक रिंगणातसर्दी, पडसे, खोकला, घसादुखी तसेच उष्णतेमुळे ताप, डिहायड्रेशन, डोकेदुखी हे आजार वाढीसआजारांपासून बचाव करायचा असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार आणि काळजी घेणे आवश्यक

महेश कुलकर्णी

सोलापूर : ऐन निवडणुकीच्या धावपळीत परतीच्या पावसाचा लांबलेला मुक्काम, आॅक्टोबर हिटचे चटके आणि थंडीची चाहूल या एकाच वेळच्या तीन ऋतूंमुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांना प्रकृती सांभाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. शरीरातील तापमानाचा समतोल बिघडल्यामुळे साथीच्या आजारापासून दूर राहण्यासाठी उमेदवारांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार धीरज देशमुख ऐन निवडणुकीच्या प्रचारात तापामुळे रुग्णालयात दाखल आहेत. सोलापूर जिल्ह्यातही अकरा विधानसभा मतदारसंघात १५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दिवसभर प्रचाराचे व्यस्त वेळापत्रक एकीकडे सांभाळताना बदलत्या हवामानामुळे होणाºया आजारापासून दूर राहण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागत आहे. 

दिवसा वाढणाºया तापमानामुळे  डोळ्यांच्या संसर्गापासून संसर्गजन्य ताप तसेच शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागल्यामुळे थकवा जाणवण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उन्हात फिरताना डोळ्यावर गडद रंगाचा गॉगल घालावा. तसेच डोळ्यातून पाणी आल्यास ते जोरात चोळू नयेत. संसर्ग झाल्यास हात स्वच्छ धुऊन घ्यावेत मगच डोळ्याला हात लावावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले.दुसरीकडे रात्री थंडीची चाहूल लागलेली आहे. यामुळे सर्दी, पडसे, खोकला, घसादुखी तसेच उष्णतेमुळे ताप, डिहायड्रेशन, डोकेदुखी हे आजार वाढीस लागतात. यासारख्या आजारांपासून बचाव करायचा असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार आणि काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच अशा काळात डेंग्यू, मलेरियासाख्या साथीच्या आजाराचाही धोका वाढलेला असतो. 

उमेदवारांनी अशी घ्यावी काळजी....

  • - संसर्गजन्य आजारांचे स्वरूप समजून घ्या.
  • - उष्म्याचा त्रास होत असेल तर उष्णधर्मीय पदार्थांचे सेवन टाळा.
  • - आहारात फळे, दूध-दही यांचा वापर करा.
  • - तेलकट, मसालेदार पदार्थ टाळा.
  • - संसर्ग असल्यास कोमट पाण्याने अंघोळ करा.
  • - गरजेपेक्षा अधिक घाम येत असेल तर त्यासाठी उपचार घ्या.
  • - प्रतिजैविके सुरू असतील, तर त्याचा कोर्स पूर्ण करा, अर्धवट सोडू नका.

हेल्दी फूड खा!- सध्याच्या मिश्र वातावरणात हेल्दी फूड खाण्यावर भर द्या. आजारांपासून वाचण्यासाठी आहारात प्रोटीनची मात्रा जास्त असेल अशा पदार्थांचेच सेवन करा. फळ, भाज्या, नट्ससारख्या गोष्टींचे सेवन करा. त्याचबरोबर जेवणात अशा गोष्टींचा समावेश करा की, ज्यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम (चयापचय क्रिया) वाढेल. त्यामुळे तुम्ही आजारी पडणार नाही.

   भरपूर पाणी प्या!- दिवसातून तीन ते चार लिटर पाणी प्या. तापमान वाढल्यावर शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो. या काळात भरपूर पाणी पिण्याची गरज असल्याचे प्रख्यात डॉक्टर सांगतात. उन्हात फिरताना डोक्यावर टोपी घालावी. शक्य असल्यास उन्हात फिरण्याचे टाळावे, असेही ते नमूद करतात.

सध्याच्या वातावरणात साथीचे आजार टाळायचे असतील तर वरील उपाययोजना करायला हव्यात. यानंतरही आजार कमी न झाल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य उपचार घ्या. विशेषत: स्वाईन फ्लू आणि डेंग्यू यासारख्या जीवघेण्या आजारांची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्या.- डॉ. सूर्यकांत कांबळेसेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यMedicalवैद्यकीयvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक