शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

आजार संसर्गजन्य नाही; गैरसमज मात्र फार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 13:01 IST

जागतिक श्वेत त्वचा आजार दिन; भारतात दोन ते अडीच टक्के लोकांना श्वेत त्वचेचा आजार

ठळक मुद्देपांढरे पदार्थ खाल्ल्याने श्वेत त्वचा आजार होतो अशा प्रकारचा गैरसमज दूर होणे गरजेचे श्वेत त्वचा आजार झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यावर लगेच उपचार घेणे गरजेचेश्वेत त्वचा आजार किंवा कोड याविषयी अनेक गैरसमज लोकांमध्ये आहेत. यापैकी सर्वात मोठा गैरसमज म्हणजे हा आजार संसर्गजन्य नाही

शीतलकुमार कांबळे सोलापूर : श्वेत त्वचा आजार किंवा कोड याविषयी अनेक गैरसमज लोकांमध्ये आहेत. यापैकी सर्वात मोठा गैरसमज म्हणजे हा आजार संसर्गजन्य नाही. त्यामुळे श्वेत त्वचा आजार असलेल्या एखाद्या व्यक्तीस स्पर्श केल्याने दुसºया व्यक्तीस हा आजार होत नाही. त्वचेला रंग देणाºया मृत झाल्यास हा आजार जडतो; पण तो बरा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

श्वेत त्वचा (कोड) आजार होणे याचे नेमके असे कारण नाही. हा आजार अनुवंशिक असतोच असेही नाही. जगभरात पांढरे डाग होण्याचे प्रमाण एक टक्का आहे. भारतात ते दोन ते अडीच टक्के आहे. हे डाग कधीच जन्मत: नसतात. ते कोणत्याही वयात होऊ शकतात. या डागांमुळे दुखणे, ताप येणे, स्राव होणे असा कोणताही त्रास होत नाही. शरीराच्या त्वचेला रंग देणाºया पेशी या कमी किंवा मृत झाल्या तर हा आजार होतो. शरीराच्या एका ठिकाणी हा आजार झाला तर तो पसरण्याची शक्यता फक्त एक टक्का असते. ९९ टक्के प्रकारात हा श्वेत त्वचा आजार पसरत नाही.

शरीराच्या संपूर्ण भागावर चट्टे असतील तर त्याला विटीलिगो वलगारीस तर फक्त ओठांवर, बोटांच्या टोकावर व गुप्तांगावर चट्टे असतील तर त्याला लिप टिप विटीलिगो असे म्हटले जाते. एकाच ठिकाणी आढळणारा चट्टा असेल तर त्याला लोकलाईज्ड विटीलिगो म्हणतात. जर का चट्टे वेगाने उमटत असतील तर त्याला अनस्टेबल विटीलिगो असे म्हणतात. 

या आजारात अनेक प्रकार आहेत. यात केसांमध्ये पांढरे चट्टे येणे, ओठांवर चट्टे येणे, पांढरे चट्टे पसरत जाणे आदी प्रकार आहेत. बºयाच जणांना श्वेत त्वचा आजार व कुष्ठरोग हा एकच आहे असे वाटते, पण कुष्ठरोग हा संसर्गजन्य रोग असून, श्वेत त्वचा आजार हा संसर्गजन्य नाही. औषधोपचार, लेसर, शस्त्रक्रिया, मलम लावणे या प्रकाराचे उपचार घेतल्याने हा आजार बरा होऊ शकतो. रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्याने त्वचेला रंग देणाºया पेशी कमी किंवा मृत होतात, यामुळेदेखील हा आजार होऊ शकतो.

श्वेत त्वचा आजार झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यावर लगेच उपचार घेणे गरजेचे आहे. रोग प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास हा आजार होत नाही. यासाठी सकस आहार घेणे, ध्यान करणे, व्यायाम करणे गरजेचे आहे.  - डॉ. प्रकाश दुलंगे, त्वचारोग तज्ज्ञ

पांढरे पदार्थ खाल्ल्याने श्वेत त्वचा आजार होतो अशा प्रकारचा गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. हा आजार होऊ नये म्हणून पथ्य पाळण्याची आवश्यकता नाही. हा आजार झाल्यास उपचाराच्या अनेक पध्दती उपलब्ध आहेत. - डॉ. सचिन कोरे, त्वचारोग तज्ज्ञ

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्य