शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पायी यात्रेसाठी वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:16 AM

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० प्रमुख संतांच्या पादुका बसने नेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संस्थानांनी स्वीकारला असला ...

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० प्रमुख संतांच्या पादुका बसने नेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संस्थानांनी स्वीकारला असला तरी तो वारकरी संप्रदायाला मान्य नाही. पायी वारीसाठी वारकऱ्यांना परवानगी मिळावी, या मागणीसाठी वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने सोमवार रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.

महाराष्ट्राची शेकडो वर्षांची पायी वारीची परंपरा जी निजामांच्या, मुघलांच्या आणि इंग्रजांच्या काळातही खंडित झाली नाही. तिला सलग दुसऱ्या वर्षी खंडित करण्याचे पाप आघाडी सरकारकडून होत आहे. सरकारने निर्बंधांसह ५० वारकऱ्यांच्या पायी वारीला परवानगी द्यावी. ज्ञानोबा- तुकोबांसह ५० वारकऱ्यांना सुरक्षा देणे राज्य सरकारला झेपत नसेल, तर त्यांनी केंद्राकडून सुरक्षा मिळवत ही पायी वारी करावी. वारकऱ्यांच्या भावना समजून घेऊन पायी वारीची परंपरा जोपासण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, असे निवेदन राज्यपालांकडे करण्यात आले आहे.

यावेळी भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, विठ्ठल- रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान, त्र्यंबकेश्वरचे माजी अध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज धोंडगे, ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर उपस्थित होते.

---

फोटो :

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देताना आचार्य तुषार भोसले, ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, ह.भ.प. संजयनाना महाराज धोंडगे, ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर.