शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाबाबत शैक्षणिक संस्थानी केले शासनाकडे बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 13:13 IST

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न : सोलापुरातील प्रशासनाने सुरक्षेची हमी घेण्याची मागणी 

रुपेश हेळवे

सोलापूर :  नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्यानंतर महाविद्यालय सुरू होण्याच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची हजेरी पाहता सध्या महाविद्यालये सुरू करणे हे घाईचे ठरेल, तरीही प्रशासनाने महाविद्यालय सुरू करण्याच्या सूचना दिल्यास आम्ही त्याचे पालन करू, असे मत व्यक्त करीत महाविद्यालये व विद्यापीठाने राज्य शासनाकडे बोट केले आहे.

ज्या राज्यात शाळा सुरू झाल्या त्यातील काही राज्यात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी वाढल्याचे लक्षात येत असल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळेच खूप कमी प्रमाणात पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले आहे. ही संख्या लक्षात घेता महाविद्यालये सध्या सुरू न करता ऑलनाईन शिक्षण घेणे उत्तम असल्याचे मत काही प्राध्यापक व्यक्त करत आहेत. कॉलेज जरी बंद असले तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबलेले नाही. मोठ्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. यामुळे अडीच-तीन हजार विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे हे अवघड असणार आहे. यामुळे सध्या ज्युनिअर कॉलेजचा प्रयोग चांगला वाटला तर टप्प्याटप्प्याने महाविद्यालये सुरू करण्यास अडचण नाही, असे मत कीर्ती पांडे यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्यकेंद्र शासन, राज्य शासन, विद्यापीठ अनुदान आयोग आणि विद्यापीठाने महाविद्यालये सुरू करण्यास सांगितले तर आम्ही यासाठी तयार आहेत. पण विद्यार्थ्यांची सुरक्षा ही खूप महत्त्वाची आहे, त्यांच्या सुरक्षिततेला आम्ही प्रथम प्राधान्य देऊ. यात पालकांचा निर्णयही खूप महत्त्वाचा आहे. - अंबादास देशमुख, अध्यक्ष, प्राचार्य संघटना 

 कोणत्याही सुचना मिळाल्या नाहीत...सध्या कोरोना स्थितीमुळे महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय राज्य शासन आणि शिक्षण मंत्री घेतील. त्यांच्या सूचना आल्यानंतर आम्ही त्यांच्या सूचनेनुसार पुढील कामे करू. अद्यापपर्यंत महाविद्यालये सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना आम्हाला मिळालेल्या नाहीत. - मृणालिनी फडणवीस    कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 

प्रशासनाने साेय करावीप्राध्यापक ऑनलाईन शिक्षण नाईलाजाने देत आहेत. ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन  शिकविणे आम्हाला आणि विद्यार्थ्यांना सोयीस्कर आहे. प्रशासन आणि महाविद्यालयांनी आम्हाला हजर राहण्याच्या सूचना केल्या तर आम्ही तत्काळ हजर राहू. पण विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सुरक्षिततेची प्रशासनाने सोय करणे गरजेचे आहे.- भगवान अदटराव,कार्यकारिणी सदस्य, सुटा संघटना

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी