शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

कांदा अनुदान कालावधी वाढीच्या निर्णयावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:50 AM

सोलापूर : कार्यक्रम सुरू असताना प्रास्ताविकात कांदा अनुदानाचा कालावधी वाढविण्याची मागणी झाली. सहकार मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लागलीच मोबाईलवरुन कांदा अनुदानाचा ...

ठळक मुद्देआजपर्यंत कांद्याला कधीही प्रति क्विंटल ५० रुपयांपेक्षा अधिक अनुदान मिळाले नाही२०१४ प्रमाणेच २०१९ च्या निवडणुकीतही यांना बाजूला फेका, असे सहकार मंत्री देशमुख यावेळी म्हणाले. 

सोलापूर: कार्यक्रम सुरू असताना प्रास्ताविकात कांदा अनुदानाचा कालावधी वाढविण्याची मागणी झाली. सहकार मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लागलीच मोबाईलवरुन कांदा अनुदानाचा कालावधी वाढविण्याचा एसएमएस पाठविला अन् मुख्यमंत्र्यांनी ओके असा रिप्लाय दिला. 

विविध शासकीय योजनेतून निधी व साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्तर तालुक्यातील मार्डी येथे झाला. त्या कार्यक्रमात भाजपाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम यांनी कांदा अनुदानाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली. याशिवाय तालुक्यातील २४ गावांचा विकास खुंटल्याची खंत व्यक्त केली.

रस्ते खराब झाले, २५: १५ योजनेचा निधी मिळत नाही व अन्य समस्या मांडल्या. हाच धागा पकडून खा. अमर साबळे यांनी प्रास्ताविकात उपस्थित होणारे मुद्दे शेतकºयांशी संबंधित असल्याने सहकार मंत्री सुभाष देशमुख हे लागलीच मुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठवून समस्या मांडत आहेत असे सांगितले. त्यानंतर सहकार मंत्र्यांनी भाषणात मुख्यमंत्र्यांना पाठविलेला मेसेज वाचून दाखविला. कांद्याचे दर आणखीन वाढलेले नाहीत, जानेवारी अखेरपर्यंत कांदा अनुदानाची मुदत वाढविणे गरजेचे आहे असा हा एसएमएस होता. त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी ओके असे पाठविल्याचेही सहकार मंत्र्यांनी सांगितले. उद्या होणाºया मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल, असेही सहकार मंत्री देशमुख म्हणाले. 

आजपर्यंत कांद्याला कधीही प्रति क्विंटल ५० रुपयांपेक्षा अधिक अनुदान मिळाले नाही. आम्ही प्रति क्विंटल १०० रुपये व नोव्हेंबर महिन्यात विक्री झालेल्या कांद्याला अनुदान देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रति क्विंटल २०० रुपये व १५ फेब्रुवारीपर्यंतच्या कांदा विक्रीवर अनुदान देण्याचा निर्णय घेतला, असेही सहकार मंत्र्यांनी सांगितले.

तिजोरीच्या चाव्यावाल्यांनी काय केले?राज्याच्या तिजोरीच्या चाव्या १४ वर्षे उत्तर सोलापूर तालुक्याच्या हातात होत्या, त्यांनी काय कामे केली?,असा प्रश्न सुशीलकुमार शिंदे यांचे नाव न घेता सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला. हेच आता विष पेरण्याचे काम करीत आहेत, २०१४ प्रमाणेच २०१९ च्या निवडणुकीतही यांना बाजूला फेका, असे सहकार मंत्री देशमुख यावेळी म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार