शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दुष्काळाचा कलंक : ज्वारीच्या कोठारात विकला जातोय आता मराठवाड्याचा कडबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 12:32 IST

मल्लिकार्जुन देशमुखे मंगळवेढा : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशात ज्वारी व कडबा पुरवणाºया व राज्यात ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असणाºया ...

ठळक मुद्देमंगळवेढा शिवारात झळकू लागले ‘कडबा विकणे आहे’चे फलकमंगळवेढ्याच्या इतिहासात पहिल्यांदा हजारो हेक्टर क्षेत्र नापेर राहण्याची वेळ आली आता ‘कडबा विकणे’ आहे, असे जाहिरातीचे फलक झळकू लागले

मल्लिकार्जुन देशमुखे

मंगळवेढा : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशात ज्वारी व कडबा पुरवणाºया व राज्यात ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असणाºया मंगळवेढा तालुक्यात यंदा ज्वारीची पेरणीच झाली नसल्याने कडब्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दरवर्षी ज्वारीच्या कोठारात कडबा घेण्यासाठी गर्दी होत होती़ यंदा उत्पादन कमी झाले असले तरी ज्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडून घेऊन विकण्यासाठी शिवारात आता ‘कडबा विकणे’ आहे, असे जाहिरातीचे फलक झळकू लागले आहेत.

काळी कसदार व सुपीक जमीन असल्याने तालुक्यात बोराळे, मुंढेवाडी, मंगळवेढा शिवार ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. ओल टिकवून ठेवणाºया जमिनी मंगळवेढा शिवारात असल्याने एकदा पेरले की ज्वारी काढायलाच शेतकरी जातो, मात्र यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने ज्वारीची पेरणी झाली नाही़ मंगळवेढा रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जातो़ तालुक्यात रब्बीचे ५४ हजार हेक्टर क्षेत्र आहे़ यापैकी १५ हजार २५७ हे. म्हणजे केवळ २८ टक्के इतकी पेरणी झाली आहे़ पुरेशा पावसाअभावी पेरणी केलेल्या क्षेत्रावरील ज्वारी जळून गेली आहे़ जमिनीत पुरेशी ओल नसल्यामुळे बहुतांश शेतकºयांनी यावर्षी पेरणी केली नाही़ त्यामुळे जवळपास ३९ हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिले.

तालुक्यात खरीप व रब्बी हंगामात केवळ ३७ टक्के इतका पाऊस झाला. खरिपात १८ हजार ६४४ हेक्टरवर पेरणी झाली. परंतु पावसाअभावी खरीप पिके जळून गेली. यावर्षी ज्यांनी पेरले त्यांच्या हाती बाटूक पण आले नाही़ ज्वारीचे उत्पादन घटल्याने कडबा मिळणेही दुरापास्त आहे़ तालुक्यातील पशुपालक इतर तालुक्यात फिरून कडबा विकत घेत आहेत.

सध्या तालुक्यातील चार कारखान्यांनी उसाचे संपूर्ण क्षेत्र गाळप केले आहे़ चारा मिळणे मुश्कील झाले आहे़ येथील चाºयाचे दर गगनाला भिडले आहेत़ त्यामुळे जनावरे सांभाळायची कशी? असा प्रश्न दूध पालकांना सतावत आहे़  कडब्याची एक पेंडी २५ ते ३० रुपयांना मिळत आहे़ ऊस प्रति टन ३ ते ४ हजार रुपये असा झाला आहे.

शेतकºयांची कडब्याची वाढती मागणी पाहता उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर, तुळजापूर या भागातील व्यापाºयांनी कडबा विकणे आहे, संपर्क करा, अशा जाहिराती मंगळवेढ्यामध्ये जागोजागी लावल्या आहेत.

मंगळवेढ्याच्या इतिहासात पहिल्यांदा हजारो हेक्टर क्षेत्र नापेर राहण्याची वेळ आली आहे़ त्यामुळे कडबा व ज्वारीला उच्चांकी दर मिळत आहे़

तालुक्यातील पशुधनाचे हाल- तालुक्यातील शेतकरीशेतीला पूरक म्हणून दुग्धव्यवसाय करीत आहेत़ तालुक्यात सध्या गायी-म्हशींची संख्या ९५ हजार असून, शेळ्या-मेंढ्यांची संख्या ७६ हजार इतकी व कोंबड्यांची संख्या १ लाख ५७ हजार इतकी आहे़ या जनावरांना शासन पाण्यासाठी टँकर न देता पाण्यापासून वंचित ठेवल्याने पशुधनाचे मोठे हाल होत आहेत़ खरीप व रब्बी हंगाम कोरडा गेल्याने तालुक्यात चाºयाचे उत्पादन काहीच न झाल्यामुळे तीव्र चाराटंचाई जाणवत आहे़

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेती