शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

अकरावी प्रवेशाची ‘कट ऑफ’ घसरली; प्रवेश अर्ज संख्या निम्म्याने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 12:39 IST

ग्रामीण मुलांची शहराकडे पाठ; जाणकारांचाही अंदाज चुकला

सोलापूर : कोरोनामुळे मागील वर्षभरापासून पहिली ते पदवीचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे तसेच कोरोनाचा प्रभाव अजूनही झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी शहराकडे न येता ग्रामीण भागातच प्रवेश घेत आहेत. त्यामुळे शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खूप कमी अर्ज केले आहेत. परिणामी यंदाची अकरावीची गुणवत्ता यादी म्हणजेच ‘कट ऑफ’ घसरली आहे.

यंदा दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नववीच्या गुणांच्या आधारवर दहावीचे गुण देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढल्याचे अनेक जाणकरांचे मत होते. त्यामुळे यंदा शहरातील प्रमुख महाविद्यालयांचे ‘कट ऑफ’ तीन ते चार टक्क्यांनी वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. हा अंदाज यंदा प्रथमदर्शनी चुकल्याचे दिसत आहे. जाणकारांच्या मते यंदा टक्केवारी ९३ ते ९५ टक्के दरम्यान लागण्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. शहरातील काही प्रमुख कॉलेजचा ‘कट ऑफ’ हा फक्त ९१ टक्के ते ८५ टक्केदरम्यान लागला आहे.

सोमवारी दुपारी तीन वाजता अकरावीची ‘कट ऑफ लिस्ट’ प्रत्येक शाळेत महाविद्यालयात लावली जाणार आहे. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशाला सुरुवात होणार आहे. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना दोन तारखेपर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. तीन तारखेला दुसरी ‘कट ऑफ लिस्ट’ लागेल. यामुळे यंदा तिसरी ‘कट ऑफ लिस्ट’ अगोदरच सर्वच त्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ऑनलाईन, ऑफलाईन होणार गुणवत्ता यादी जाहीर

जे महाविद्यालय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवत आहे. त्या महाविद्यालयांचे ‘कट ऑफ लिस्ट’ ही सोमवारी सकाळी आपल्या संकेतस्थळावर दिली जाणार आहे. व ज्या महाविद्यालयांनी ऑफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवत आहेत त्यांची यादी महाविद्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे.

अनेक विद्यार्थी हे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला जास्त तयारी करून जास्त गुण घेत असतात. यंदा बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांची संधी हुकली. परिणामी त्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्याने ‘कट ऑफ लिस्ट’वर झाला. त्यामुळेच यंदा ‘कट ऑफ लिस्ट’ थोडी कमी लागेल.

हनुमंत जामदार, शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणssc examदहावी