शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

अतिवृष्टी, पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 10:52 IST

१५ हजार शेतकरी बाधीत: बार्शी, पंढरपूर, सांगोला, दक्षिण सोलापूर, माळशिरसचा समावेश

सोलापूर: जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने  व माण आणि भीमेला पूर येऊन १५ हजार ३0२ शेतकºयांच्या ११ हजार २१ हेक्टरावरील विविध पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथिमक अंदाज असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.

 जिल्ह्यात दि. १७ व १८ सप्टेंबर रोजी सहा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. अतिवृष्टीने सांगोला, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी आणि मंगळवेढा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. माळशिरस, मंगळवेढा, सांगोला आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. या पावसाने तलाव, नाले भरून वाहिले आहेत. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. काही ठिकाणी पीके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकºयांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. याच जोडीला उजनी व वीर धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे पंढरपूर व दक्षिण सोलापूर तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला आहे.

नदीकाठची शेती मोठया प्रमाणावर वाहून गेली आहे. भीमेची पातळी अचानक वाढल्याने शेतातील वस्तीवर असणारी जनावरे, ट्रॅक्टर, पंप, पाईपलाईनबरोबरच डाळींब, केळीच्या बागा वाहून गेल्या आहेत. गेल्या दोन दिवसात कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्याची प्राथमिक आकडेवारी हाती आली आहे. नुकसानीची माहिती अजूनही घेतली जात असून हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे कृषी अधिकारी माने यांनी स्पष्ट केले.  

१७२ गावांना बसला फटका

पाच तालुक्यातील १७२ गावांना अतिवृष्टी व पुराचा फटका बसला आहे. यामध्ये माळशिरसमध्ये ९, दक्षिण सोलापूर तालुक्यात २५, सांगोल्यात ११, मंगळवेढ्यात १७, पंढरपूरमध्ये ६३ तर बार्शीत ४७ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात सुमारे १३ हजार हेक्टरावर खरिपाच्या कांद्याची लागवड झाली होती. यातील ८१५ शेतकºयांच्या ४९0 हेक्टर क्षेत्रावरील कांद्याचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. 

विमा कंपन्याचे सर्वेक्षण सुरू

अति पावसाने नुकसान झालेल्या पीकांचे विमा कंपनीमार्फत सर्वेक्षण सुरू आहे. अद्यापही बºयाच पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. बºयाच शेतांमध्ये तळी असल्याने पीकांपर्यंत पोहोचता येत नाही अशी परिस्थिती आहे. काही भागात बांध, नाल्यात साचलेल्या पाण्यामुळे शेतांना पाणी लागले आहे. यामुळे या शेतात रब्बीचा पेरा करणेही अवघड होणार आहे. 

असे झाले तालुकानिहाय नुकसान...

माळशिरस, बाजरी: ७२१ शेतकरी (हेक्टर:५८६), मका:२0७ (१३४), उस: ६३ (३९), डाळींब: ५३ (२६), द्राक्ष: ४९ (२५), एकूण: १0९३ (८१0).दक्षिण सोलापूर, तूर: १८७५ शेतकरी, ( हेक्टर: १३५९), मूग: १६९ (९0), उडिद: ६१0 (३८८), मका: ५४२ (३0७), सोयाबीन: ४४ (४२.८0), भुईमूग: ४५५ (२६९), बाजर: ७७ (४१), सूर्यफुल: २ (३), भाजीपाला: १४५ (८0), कांदा: ६६५ (३९१), पेरू: २(१), एकूण: ४५८६ (२९७१.८0).सांगोला, ढोबळी मिरची: २४ (१४), द्राक्ष: ४३ (२२), बाजरी: ९३ (६९), मका: १0५ (७३), डाळींब: ८३ (५४), एकूण: २४३ (१५९).मंगळवेढा, सूर्यफुल: ३१२ (२00), बाजरी: ५७ (४0), कांदा: ४३ (२५), इतर भाजीपाला: ११७ (८५),एकूण: ५२९ (३५0).पंढरपूर,उस: २४३५ (१८९९), डाळींब: १६५५ (११५३), द्राक्ष: १५९२ (१२१0), भाजीपाला: ५४७ (३११), चारापीके: ५00 (२९५), मका: ५१२ (३0९), एकूण: ७२४१ (५१७७). बार्शी, उडिद:२४ (१८), सोयाबीन: १४७९ (१४६२), कांदा: १0७ (७४)

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस