शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

योगाचा सृजनात्मक उपयोगच देशाला पुढे नेईल - बाबा रामदेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 18:20 IST

अक्कलकोट येथील राजे फत्तेसिंह मैदानावर योगचिकित्सा शिबीराला प्रारंभ

ठळक मुद्देभारत आज रोगमुक्ती आणि व्यसनमुक्तीकडे जात आहे़ - बाबा रामदेवयोगाने विश्वबंधुत्वाचा मार्ग दाखविला - बाबा रामदेवशेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सेंद्रीय शेतीचा पर्यायही बाबा रामदेव यांनी सुचविला़

अक्कलकोट : योग ही साधना असून माणसाचे आचार-विचार शुध्द करणारे तंत्र आहे़ शरीर आणि मनाच्या अस्वच्छतेसोबत बलशाली राष्ट्र निर्माण करण्याची ताकद योगामध्ये आहे़ योगाचा सृजनात्मक उपयोगच देशाला पुढे नेईल आणि उद्योगातून समृध्दी उभारण्यासोबतच देशाला आर्थिक महासत्ता बनवेल असे प्रतिपादन योगगुरू बाबा रामदेव यांनी केले़अक्कलकोट येथील राजे फत्तेसिंह मैदानावर शनिवारी सकाळी त्यांच्या योगचिकित्सा शिबीराला प्रारंभ झाला़ त्यानंतर योग शिबीर कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिबीराचे आयोजक सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते़यावेळी बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, भारत आज रोगमुक्ती आणि व्यसनमुक्तीकडे जात आहे़ त्याचे श्रेय योगाला आहे़ भारत जगात महाशक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून योगमार्गातून प्रवास सुरू आहे़ भारतासाठी हा सुवर्णकाळ आहे़ योगाने विश्वबंधुत्वाचा मार्ग दाखविला असून सर्व व्याधी, आजार, नकारात्मक विचार दूर करण्याची शक्ती योगात आहे़ योगाचा सृजनात्मक वापरच देशाला जगात अग्रस्थानी पोहचवेल़देशातील भ्रष्ट्राचार दुर करण्यासाठी उत्तम आचरणाची आणि योग शिक्षणाची गरज आहे़ मनाची शुध्दता करण्याचे काम योगच करू शकतो, तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रष्ट्राचार थांबविण्यासाठी आवश्यक आहे़ पंतप्रधान मोदी यांनी डिजीटललायझेशनच्या माध्यमातून हे काम सुरू केले आहे़ शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सेंद्रीय शेतीचा पर्यायही बाबा रामदेव यांनी सुचविला़ ते म्हणाले की, तांत्रिक शेती, वैज्ञानिक शेती आणि सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून देशातील कृषी व्यवस्थेचे चित्र बदलू शकते, शेतकºयांनी जोडधंदा, पशुपालन करावे असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला़

टॅग्स :SolapurसोलापूरBaba Ramdevरामदेव बाबाYogaयोग