शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

ग्रामीण भागातील लोकांना शहरात येण्यासाठी कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 2:55 PM

मनपा आयुक्तांचे नवे आदेश : ग्रामीण भागातील नागरिकांना बसणार फटका

सोलापूर : शहरातील किराणा, भाजी-फळे, मांस विक्रीची दुकाने उद्या दि. १५ मेपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवता येतील, असे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत. उर्वरित सर्व दुकाने १ जूनपर्यंत बंद असतील. शहरात प्रवेश करायचा असेल तर कोरोना चाचणीचा अहवाल दाखविणे बंधनकारक असेल.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी शहरातील कोरोनास्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी शहरातील दुकाने व घरपोच सेवा सुरू असेल, असे आदेश दिले होते. त्यानुसार पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आदेश जारी केले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जाहीर केलेला लॉकडाऊन १ जून सकाळी सात वाजेपर्यंत कायम असेल. परंतु, अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा दुकाने, फळ व भाजी, मांस, अंडी विक्री करणाऱ्या दुकानांना सकाळी ७ ते ११ या कालावधीत परवानगी आहे. दुधाचे संकलन, वाहतूक व प्रक्रिया तसेच घरपोच सेवा देण्यास परवानगी आहे. मात्र, त्यांनी यापूर्वी दिलेल्या निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. अत्यावश्यक सेवेतील उत्पादक व निर्यातदारांना नियम व अटी लावून परवानगी असेल.

माल वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या बाबतीत एकाचवेळी वाहनांमध्ये दोन व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवास करता येणार नाही. ही वाहने राज्याबाहेरील असतील तर त्यांनी राज्यात प्रवेश करण्यापूर्वी ४८ तास अगोदर केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल दाखविणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र सात दिवसांसाठी वैध असेल.

 

आरटीपीसीआर चाचणी अहवाल आवश्यक

महापालिका हद्दीत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना मागील ४८ तासांपूर्वी केलेला आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दाखविणे बंधनकारक असेल. परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना हा नियम अनिवार्य असेल, असे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले. याचा फटका ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांना बसणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका