शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

वाळू अन् पाण्याअभावी सोलापूर जिल्ह्यातील बांधकामे रखडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 14:03 IST

माळशिरस : वीट, वाळू, पाणी , सिमेंट याबरोबरच ठेकेदार, गवंडी, बिगारी, पेंटर, आर्किटेक्चर अशा अनेकांच्या साखळी कामामुळे इमारत उभारते. ...

ठळक मुद्देबांधकाम साहित्याचे दर वाढले : मजुरांना संसाराचा गाडा हाकणेसुद्धा झाले कठीणदुष्काळात तेरावा म्हणून की काय बांधकाम साहित्याचे दरही वाढलेले

माळशिरस : वीट, वाळू, पाणी, सिमेंट याबरोबरच ठेकेदार, गवंडी, बिगारी, पेंटर, आर्किटेक्चर अशा अनेकांच्या साखळी कामामुळे इमारत उभारते. या व्यवसायात मोठी उलाढाल होत असते़ हजारो मजुरांची रोजीरोटी यावर अवलंबून आहे, मात्र सध्या वाळू आणि पाण्याअभावी बांधकामे रखडल्याचे दिसून येतात़ इतकेच नाही तर दुष्काळात तेरावा म्हणून की काय बांधकाम साहित्याचे दरही वाढलेले आहेत़ त्यामुळे मजुरांना संसाराचा गाडा हाकणेसुद्धा कठीण झाल्याचे दिसून येत आहे.

शासनाच्या वतीने पंतप्रधान आवास, रमाई आवास, इंदिरा आवास घरकूल योजनांमधील बांधकामे वेळेत पूर्ण करून घेणे अधिकाºयांना बंधनकारक असते़ प्रत्येक वर्षाचे ठराविक उद्दिष्ट असते़ परंतु यंदा या सर्व योजनांमधील बांधकामे रखडल्याचे दिसून येतात़ त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वाळूची टंचाई आणि दुष्काळामुळे पाण्याचा अभाव होय़ तसेच सिमेंट व स्टीलचे दर वाढलेले दिसून येत आहेत़ त्यामुळे या सर्व गोष्टींचा व्यवसायावर ही परिणाम झाल्याचे दिसून येते़ अनेक बांधकामे अर्धवट स्थितीत आहेत तर अनेक कामांना मुहूर्त रखडलेला आहे. वाळूऐवजी (क्रश सॅन्ड) लहान खडी वापरली जात असली तरी हा व्यवसाय मंदीच्या सावटाखाली आहे.या सर्व गोष्टीमुळे या बांधकामावर काम करणाºया मजुरांचे हाल होताना दिसतात़ कारण त्यांचा संसाराचा गाडा हाकणे कठीण होऊ लागले आहे.

बांधकामाचा वेग मंदावला- तालुक्यात प्रतिवर्षी ५०० ते ५५० बांधकामे पक्की आरसीसी होतात तर साध्या पद्धतीची १५०० ते १६०० घरे तयार होतात़ पक्क्या बांधकामाला प्रती घराला ३ ते ४ लाख तर लहान घरांना ४० ते ५० हजार रुपये मजुरी खर्च येतो़ सध्या वाळू उपलब्ध नसल्याने क्रश कडी, वाळू ४ ते ५ हजार रुपये ब्रासप्रमाणे खरेदी करावी लागते़ सिमेंट व स्टीलमध्ये १५ टक्के वाढ झालेली आहे़ मजुरी व वीट यांचे दर मात्र स्थिर आहेत़ याशिवाय उन्हाची तीव्रता वाढल्याने बांधकामासाठी लागणारे पाणी उपलब्ध होऊ शकत नाही़ अशा वेगवेगळ्या कारणाने सध्या बांधकाम व्यवसायाचा वेग मंदावल्याचे दिसून येते, असे काही ठेकेदार व मजुरांनी सांगितले़

उसाची बिले मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील काही बांधकामांना सुरुवात झाली होती, मात्र वाळूचा तुटवडा व इतर साहित्यांचे वाढलेले दर आणि मुख्यत्वे उपलब्ध नसलेले पाणी यामुळे अनेक कामे अर्धवट स्थितीत रखडलेली आहेत़ त्यामुळे या व्यवसायाशी निगडित असणाºया अनेक घटकांवर परिणाम होत आहे़- रमेश तरंगे,आर्किटेक्चर, तरंगफळ

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळWaterपाणी