शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

वाळू अन् पाण्याअभावी सोलापूर जिल्ह्यातील बांधकामे रखडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 14:03 IST

माळशिरस : वीट, वाळू, पाणी , सिमेंट याबरोबरच ठेकेदार, गवंडी, बिगारी, पेंटर, आर्किटेक्चर अशा अनेकांच्या साखळी कामामुळे इमारत उभारते. ...

ठळक मुद्देबांधकाम साहित्याचे दर वाढले : मजुरांना संसाराचा गाडा हाकणेसुद्धा झाले कठीणदुष्काळात तेरावा म्हणून की काय बांधकाम साहित्याचे दरही वाढलेले

माळशिरस : वीट, वाळू, पाणी, सिमेंट याबरोबरच ठेकेदार, गवंडी, बिगारी, पेंटर, आर्किटेक्चर अशा अनेकांच्या साखळी कामामुळे इमारत उभारते. या व्यवसायात मोठी उलाढाल होत असते़ हजारो मजुरांची रोजीरोटी यावर अवलंबून आहे, मात्र सध्या वाळू आणि पाण्याअभावी बांधकामे रखडल्याचे दिसून येतात़ इतकेच नाही तर दुष्काळात तेरावा म्हणून की काय बांधकाम साहित्याचे दरही वाढलेले आहेत़ त्यामुळे मजुरांना संसाराचा गाडा हाकणेसुद्धा कठीण झाल्याचे दिसून येत आहे.

शासनाच्या वतीने पंतप्रधान आवास, रमाई आवास, इंदिरा आवास घरकूल योजनांमधील बांधकामे वेळेत पूर्ण करून घेणे अधिकाºयांना बंधनकारक असते़ प्रत्येक वर्षाचे ठराविक उद्दिष्ट असते़ परंतु यंदा या सर्व योजनांमधील बांधकामे रखडल्याचे दिसून येतात़ त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वाळूची टंचाई आणि दुष्काळामुळे पाण्याचा अभाव होय़ तसेच सिमेंट व स्टीलचे दर वाढलेले दिसून येत आहेत़ त्यामुळे या सर्व गोष्टींचा व्यवसायावर ही परिणाम झाल्याचे दिसून येते़ अनेक बांधकामे अर्धवट स्थितीत आहेत तर अनेक कामांना मुहूर्त रखडलेला आहे. वाळूऐवजी (क्रश सॅन्ड) लहान खडी वापरली जात असली तरी हा व्यवसाय मंदीच्या सावटाखाली आहे.या सर्व गोष्टीमुळे या बांधकामावर काम करणाºया मजुरांचे हाल होताना दिसतात़ कारण त्यांचा संसाराचा गाडा हाकणे कठीण होऊ लागले आहे.

बांधकामाचा वेग मंदावला- तालुक्यात प्रतिवर्षी ५०० ते ५५० बांधकामे पक्की आरसीसी होतात तर साध्या पद्धतीची १५०० ते १६०० घरे तयार होतात़ पक्क्या बांधकामाला प्रती घराला ३ ते ४ लाख तर लहान घरांना ४० ते ५० हजार रुपये मजुरी खर्च येतो़ सध्या वाळू उपलब्ध नसल्याने क्रश कडी, वाळू ४ ते ५ हजार रुपये ब्रासप्रमाणे खरेदी करावी लागते़ सिमेंट व स्टीलमध्ये १५ टक्के वाढ झालेली आहे़ मजुरी व वीट यांचे दर मात्र स्थिर आहेत़ याशिवाय उन्हाची तीव्रता वाढल्याने बांधकामासाठी लागणारे पाणी उपलब्ध होऊ शकत नाही़ अशा वेगवेगळ्या कारणाने सध्या बांधकाम व्यवसायाचा वेग मंदावल्याचे दिसून येते, असे काही ठेकेदार व मजुरांनी सांगितले़

उसाची बिले मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील काही बांधकामांना सुरुवात झाली होती, मात्र वाळूचा तुटवडा व इतर साहित्यांचे वाढलेले दर आणि मुख्यत्वे उपलब्ध नसलेले पाणी यामुळे अनेक कामे अर्धवट स्थितीत रखडलेली आहेत़ त्यामुळे या व्यवसायाशी निगडित असणाºया अनेक घटकांवर परिणाम होत आहे़- रमेश तरंगे,आर्किटेक्चर, तरंगफळ

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळWaterपाणी