शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

दिलासादायक बातमी; कोरोनाला सोलापूर जिल्ह्यातील ६0९ गावांनी वेशीवरच रोखले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 16:36 IST

बाहेरून येणाºयांना दिला नाही थारा; नियमांची कडक अंमलबजावणी, रोगप्रतिकारक औषधांचे वाटप, नागरिकांची नियमित तपासणी

ठळक मुद्देजिल्ह्यातील १0२९ गावांपैकी ६0९ गावे अद्याप कोरोनामुक्त राहिली आहेत४२0 गावांमध्ये शहरातून व पुणे, मुंबईच्या प्रवाशांकडून कोरोनाचा संसर्ग झालाअनलॉक झाल्यानंतरही ग्रामस्थांनी या नियमांचे काटेकोर पालन सुरू केले आहे

राजकुमार सारोळे 

सोलापूर : एप्रिलअखेरपर्यंत  कोरोनामुक्त राहिलेल्या जिल्ह्यात बाहेरून आलेल्या लोकांमुळे संसर्ग वाढला. तरीपण जिल्ह्यातील १0२९ गावांपैकी ६0९ गावांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाला वेशीवरच रोखून धरले आहे. जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणेला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी नियमांचे पालन केल्यामुळे हे शक्य झाल्याचे सरपंचाच्या प्रतिक्रियांवरून दिसून आले आहे. 

सोलापूर शहरात मार्च महिन्यात रुग्ण आढळले, पण ग्रामीण भागात बाहेरून येणाºया प्रत्येक प्रवाशांना क्वारंटाईन करून आरोग्य तपासणीची मोेहीम कडकपणे राबविण्यात आल्यामुळे ग्रामीण भाग कोरोनामुक्त राहिला होता. शहरात हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांमुळे व मुंबई, पुणे व परदेशातून आलेल्या लोकांमुळे ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पहिला रुग्ण २४ एप्रिल रोजी आढळला. अनलॉकनंतर संपर्कामुळे रुग्ण वाढत गेले. १३ आॅगस्टपर्यंत ग्रामीण भागात ६७७२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर यापैकी १९४ जणांचा मृत्यू झाला आहे. ३८५० इतके रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ५६.८५ टक्के तर मृत्यूचे प्रमाण २. ८६ टक्के आहे. रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण १५ दिवसांवर आले आहे.

ग्रामीण भागाची अशी स्थिती असताना ६०९ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. लॉकडाऊन झाल्यापासून आरोग्य यंत्रणा सतर्क व ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. लॉकडाऊननंतर कामानिमित्त बाहेरगावी गेलेले अनेक ग्रामस्थ परतले. पण ग्रामस्थांनी त्यांना  वेशीवर रोखून धरले. १४ दिवस शाळेत क्वारंटाईन होऊन आरोग्य तपासणी झाल्यावरच त्यांना गावात घेण्यात आले. यामुळे कोरोना विषाणूला दूर ठेवता आले आहे. 

अनलॉक झाल्यानंतरही ग्रामस्थांनी या नियमांचे काटेकोर पालन सुरू केले आहे. फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर, गरज असेल त्यावेळीच अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीला बाहेर पडणे, सॅनिटायझर व हात धुण्यासाठी साबणाचा वापर केला जात आहे. प्रवास टाळणे व संसर्गबाधित गाव व शहराकडे न जाण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहेत. खरीप हंगाम सुरू झाल्यावर शेतकºयांनी घरगुती बियाणांवर भर दिला. बाजूच्या मोठ्या गावांतून बियाणे व खते आणताना काळजी घेतल्याचे दिसून आले. 

कोरोनामुक्त गावेजिल्ह्यातील १0२९ गावांपैकी ६0९ गावे अद्याप कोरोनामुक्त राहिली आहेत. ४२0 गावांमध्ये शहरातून व पुणे, मुंबईच्या प्रवाशांकडून कोरोनाचा संसर्ग झाला.उत्तर तालुक्यातील गुळवंची, दक्षिणमध्ये निंबर्गी, सादेपूर, बाळगी, मंगळवेढ्यातील उचेठाण, बठाण, ब्रह्मपुरीचा समावेश आहे.

ग्रामस्थांची नियमित तपासणी व उपचारप्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाºयांनी दररोज गावात फेरफटका मारून जुने आजार असलेल्या लोकांची तपासणी, सॅनिटायझर, मास्कचे मोफत वाटप केले. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी रोगप्रतिकारक औषध व काढ्याचे वाटप केले. गरम पाणी व आहाराबाबत मार्गदर्शन केले

अंगणवाडी ताई, आशा वर्कर्सचा रोल कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यावर गावातील लोकांचे सर्वेक्षण, बाहेरून येणाºयांची यादी व त्यांना क्वारंटाईन करणे, जेष्ठ मंडळी, गरोदर व स्तनदा माता यांना वेळेत आहार पुरवठा केला. आशा वर्करनी पल्स आॅक्सिमीटरद्वारे तपासणी करून लोकांना रोग प्रतिबंधात्मक औषधे पोहोच केली. 

आरोग्य सर्वेक्षणावर भरकोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यावर लोक घराबाहेर पडू नयेत याची काळजी घेतली. घरोघरी सर्वेक्षण करून आजारी लोकांची माहिती काढली. अशा लोकांना रोग प्रतिबंधात्मक औषधांचा पुरवठा केला. बाहेरून येणाºयांवर कडक लक्ष ठेवून शाळेत क्वारंटाईन केले. -प्रकाश वायचळ- सीईओ, जिल्हा परिषद

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत