शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
5
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
6
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
7
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
8
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
9
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
10
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
11
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
12
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
13
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
14
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
15
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
16
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
17
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
18
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
19
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
20
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती

दिलासादायक बातमी; कोरोनाला सोलापूर जिल्ह्यातील ६0९ गावांनी वेशीवरच रोखले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 16:36 IST

बाहेरून येणाºयांना दिला नाही थारा; नियमांची कडक अंमलबजावणी, रोगप्रतिकारक औषधांचे वाटप, नागरिकांची नियमित तपासणी

ठळक मुद्देजिल्ह्यातील १0२९ गावांपैकी ६0९ गावे अद्याप कोरोनामुक्त राहिली आहेत४२0 गावांमध्ये शहरातून व पुणे, मुंबईच्या प्रवाशांकडून कोरोनाचा संसर्ग झालाअनलॉक झाल्यानंतरही ग्रामस्थांनी या नियमांचे काटेकोर पालन सुरू केले आहे

राजकुमार सारोळे 

सोलापूर : एप्रिलअखेरपर्यंत  कोरोनामुक्त राहिलेल्या जिल्ह्यात बाहेरून आलेल्या लोकांमुळे संसर्ग वाढला. तरीपण जिल्ह्यातील १0२९ गावांपैकी ६0९ गावांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाला वेशीवरच रोखून धरले आहे. जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणेला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी नियमांचे पालन केल्यामुळे हे शक्य झाल्याचे सरपंचाच्या प्रतिक्रियांवरून दिसून आले आहे. 

सोलापूर शहरात मार्च महिन्यात रुग्ण आढळले, पण ग्रामीण भागात बाहेरून येणाºया प्रत्येक प्रवाशांना क्वारंटाईन करून आरोग्य तपासणीची मोेहीम कडकपणे राबविण्यात आल्यामुळे ग्रामीण भाग कोरोनामुक्त राहिला होता. शहरात हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांमुळे व मुंबई, पुणे व परदेशातून आलेल्या लोकांमुळे ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पहिला रुग्ण २४ एप्रिल रोजी आढळला. अनलॉकनंतर संपर्कामुळे रुग्ण वाढत गेले. १३ आॅगस्टपर्यंत ग्रामीण भागात ६७७२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर यापैकी १९४ जणांचा मृत्यू झाला आहे. ३८५० इतके रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ५६.८५ टक्के तर मृत्यूचे प्रमाण २. ८६ टक्के आहे. रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण १५ दिवसांवर आले आहे.

ग्रामीण भागाची अशी स्थिती असताना ६०९ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. लॉकडाऊन झाल्यापासून आरोग्य यंत्रणा सतर्क व ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. लॉकडाऊननंतर कामानिमित्त बाहेरगावी गेलेले अनेक ग्रामस्थ परतले. पण ग्रामस्थांनी त्यांना  वेशीवर रोखून धरले. १४ दिवस शाळेत क्वारंटाईन होऊन आरोग्य तपासणी झाल्यावरच त्यांना गावात घेण्यात आले. यामुळे कोरोना विषाणूला दूर ठेवता आले आहे. 

अनलॉक झाल्यानंतरही ग्रामस्थांनी या नियमांचे काटेकोर पालन सुरू केले आहे. फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर, गरज असेल त्यावेळीच अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीला बाहेर पडणे, सॅनिटायझर व हात धुण्यासाठी साबणाचा वापर केला जात आहे. प्रवास टाळणे व संसर्गबाधित गाव व शहराकडे न जाण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहेत. खरीप हंगाम सुरू झाल्यावर शेतकºयांनी घरगुती बियाणांवर भर दिला. बाजूच्या मोठ्या गावांतून बियाणे व खते आणताना काळजी घेतल्याचे दिसून आले. 

कोरोनामुक्त गावेजिल्ह्यातील १0२९ गावांपैकी ६0९ गावे अद्याप कोरोनामुक्त राहिली आहेत. ४२0 गावांमध्ये शहरातून व पुणे, मुंबईच्या प्रवाशांकडून कोरोनाचा संसर्ग झाला.उत्तर तालुक्यातील गुळवंची, दक्षिणमध्ये निंबर्गी, सादेपूर, बाळगी, मंगळवेढ्यातील उचेठाण, बठाण, ब्रह्मपुरीचा समावेश आहे.

ग्रामस्थांची नियमित तपासणी व उपचारप्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाºयांनी दररोज गावात फेरफटका मारून जुने आजार असलेल्या लोकांची तपासणी, सॅनिटायझर, मास्कचे मोफत वाटप केले. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी रोगप्रतिकारक औषध व काढ्याचे वाटप केले. गरम पाणी व आहाराबाबत मार्गदर्शन केले

अंगणवाडी ताई, आशा वर्कर्सचा रोल कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यावर गावातील लोकांचे सर्वेक्षण, बाहेरून येणाºयांची यादी व त्यांना क्वारंटाईन करणे, जेष्ठ मंडळी, गरोदर व स्तनदा माता यांना वेळेत आहार पुरवठा केला. आशा वर्करनी पल्स आॅक्सिमीटरद्वारे तपासणी करून लोकांना रोग प्रतिबंधात्मक औषधे पोहोच केली. 

आरोग्य सर्वेक्षणावर भरकोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यावर लोक घराबाहेर पडू नयेत याची काळजी घेतली. घरोघरी सर्वेक्षण करून आजारी लोकांची माहिती काढली. अशा लोकांना रोग प्रतिबंधात्मक औषधांचा पुरवठा केला. बाहेरून येणाºयांवर कडक लक्ष ठेवून शाळेत क्वारंटाईन केले. -प्रकाश वायचळ- सीईओ, जिल्हा परिषद

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत