शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

महिलांवर होणाºया हिंसाचारात ७0 टक्के वाटा सामूहिक कुटुंबाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 16:27 IST

महिला हिंसा निर्मूलन दिन; कायदे झाल्यानंतर उघडकीस येत आहेत गुन्हे

ठळक मुद्देमहिलांवर होणाºया अन्यायामध्ये कुटुंबातील सामुहिक हिंसाचराचे प्रमाण ६५ ते ७0 टक्के इतकेमहिलांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने भांदवि ४९८ (अ) हा कायदा अस्तित्वात आलाशिक्षणामुळे आज महिला हिंसाचाराच्या विरोधात आवाज उठवत आहेत

सोलापूर : महिलांवर अन्याय होऊन तिच्यावर हिंसा होण्याच्या घटना अनेक असल्यातरी, ६५ ते ७0 टक्के वाटा हा कुटुंबातुनच सामुहिकरित्या होत असल्याचे समोर आले आहे. महिलांचे संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात आलेल्या कायद्यानंतर अनेक प्रकरणे उघडकीस येत असुन, गुन्हे दाखल होण्याच प्रमाण वाढले आहे. 

कुटुंब, घराबाहेरील सार्वजनीक ठिकाणी आणि शासकीय निमशासकीय कामाच्या ठिकाणी अशा तीन ठिकाणी महिलांना अन्याय, अत्यचार आणि हिंसेला सामोर जावे लागत आहे. लग्न झाल्यानंतर हुंड्यावरून, चारित्र्याच्या संशयावरून आणि छोट्या मोठ्या कारणावरून महिलांवर हिंसाचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. महिलांवर होणाºया अन्यायामध्ये कुटुंबातील सामुहिक हिंसाचराचे प्रमाण ६५ ते ७0 टक्के इतके आहे. महिलांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने भांदवि ४९८ (अ) हा कायदा अस्तित्वात आला. 

शिक्षणामुळे आज महिला हिंसाचाराच्या विरोधात आवाज उठवत आहेत. कायदा अस्तित्वात आल्यानंतर गेल्या १0 ते १५ वर्षात भांदवि ४९८ (अ), ३२३, ५0४, ५0६, ३४ प्रमाणे सासरच्या लोकांविरूद्ध गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.  विवाहितेचा जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खुन करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे आदी घटना घडतात. खटल्यात माहेरी असलेल्या विवाहितेचा कायमचा काडीमोड होऊन पोटगी मिळते किंवा कायमस्वरूपी नुकसान भरपाईची रक्कम दिली जाते. गंभीर जखमी झालेल्या किंवा खुन झालेल्या प्रकरणात सासरच्या लोकांना न्यायालय सक्तमजुरी किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावते. 

वैयक्तीक कामानिमित्त घरातुन बाहेर पडणाºया मुलींना व महिलांचा पाठलाग करणे, छेडछाड करणे किंवा अत्यचार करणे आदी प्रकार घडत असतात. या प्रकरणी भांदवि कलम ३७६ किंवा ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल होतो. प्रकरणी सक्तमजुरी किंवा जन्मठेपेची शिक्षा आहे. अल्पवयीन मुला-मुलींवर होणाºया लैंगिक अत्याचारासाठी पोस्को हा कायदा करण्यात आला आहे. यामध्ये ११ वर्षापासुन १७ वर्षा पर्यंतच्या मुलींचा समावेश सर्वात जास्त आहे. यामध्ये कमीत कमी १0 वर्षे सक्तमजुरी तर जास्ती जास्त जन्मठेपेच्या शिक्षेची तरतुद आहे. आता शिक्षेत वाढ करून फाशी देण्याची तरतुद करण्यात आली आहे. 

कामाच्या ठिकाणी दहा पेक्षा जास्त महिला असतील तर त्या ठिकाणी महिलांचे संरक्षण आणि प्रतिबंध अधिनियम नुसार दोन समित्या स्थापन केल्या जातात. दहा पेक्षा कमी महिला असणाºया कामाच्या ठिकाणी असे प्रकार घडल्यास थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याची सोय केली आहे. 

दररोज महिलांचे दहा खटले : अ‍ॅड. तमशेट्टी- छेडछाड करणे, विनयभंग, अत्याचार, सासरच्या मंडळीकडुन होणारा हिंसाचार आदी प्रकरणामध्ये २0१४ च्या सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यात वर्षाकाठी २६00 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या संख्येत सध्या दुप्पटीने वाढ झाली आहे. शहर जिल्ह्यातील विविध न्यायालयात दररोज किमान १0 खटले हे महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि हिंसेबद्दल चालतात. यामध्ये कौटुंबीक हिंसाचाराची प्रकरणे सर्वात जास्त आहेत. सामाजिकस्तरावर अत्याचाराला वाचा फोडणे गरजेचे आहे. महिलांना कौटुंबिक पातळीवर होणारा त्रास, तिचा छळ, मानसिक कोंडी रोखण्यासाठी शहरा बरोबर ग्रामीण पातळीवर विविध संस्थाच्या माध्यमातुन कायद्याचा प्रसार होणे गरजेचे आहे अशी माहिती अ‍ॅड. सरोजनी तमशेट्टी यांनी लोकमती बोलताना दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरWomenमहिलाWomen's Day Specialजागतिक महिला दिनCrime Newsगुन्हेगारी