शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पर्यावरण मंत्र्यांनी हातात खराटा घेऊन पंढरपुरात राबविली स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 14:45 IST

चंद्रभागा वाळवंटाची केली स्वच्छता :  स्वच्छता ठेकेदाराला सुनावले खडेबोल

ठळक मुद्देशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी चंद्रभागेची आरती होणारचंद्रभागा पात्र व वाळवंटातील अवघ्या काही तासातच १२ टन कचरा उचललाचंद्रभागा वाळवंटात राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत शिवसेनेचे शेकडो स्वयंसेवक

पंढरपूर : महाराष्ट्र राज्य पर्यावरण विभागाच्या वतीने पंढरपुरातील चंद्रभागा वाळवंटाची स्वच्छता मोहीम सोमवारी राबविली. यावेळी स्वत: पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सकाळी १० वाजता स्वच्छता मोहिमेत हातात खराटा घेऊन सहभागी झाले़. त्यांच्यासोबत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य  ह़ भ़ प़ ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ह़ भ़ प़ ज्ञानेश्वर महाराज जोगदंड, व्यवस्थापक बालाजी पदलवाड, मुख्याधिकारी अभिजित बापट, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ आवताडे, सिद्धनाथ कोरे, शरद वाघमारे, राहुल गावडे, रमेश गोडसे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले़.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून चंद्रभागेच्या वाळवंट व प्रदक्षणा मार्गावरील स्वच्छतेचा ठेका पावणे दोन कोटी रुपयांना देण्यात आलेल्या आहे़ मात्र ठेकेदाराकडून योग्य काम होत नसल्याने पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी संबंधित ठेकेदाराला खडे बोल सुनावले.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी चंद्रभागेची आरती होणार आहे़ त्यापार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दोन दिवसापूर्वीच चंद्रभागेची पाहणी केली़ यावेळी त्यांना चंद्रभागा वाळवंटामध्ये घाणीचे साम्राज्य आढळून आले. त्यानंतर त्यांनी महासभेच्या दिवशी सकाळी १० च्या सुमारास चंद्रभागेत स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविले़  त्यानुसार आज ही मोहीम राबविली़  यामध्ये नगरपालिकेचे कर्मचारी, मंदिर समितीचे कर्मचारी, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी व शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.

चंद्रभागेत नागरिकांनी व भाविकांनी विविध विधीनंतर विसर्जित केलेले कपडे, विविध देवी-देवतांचे फोटो, हार व अन्य निर्माल्य चंद्रभागा नदी पात्रासह वाळवंटात ठिकठिकाणी पडले होते. मंत्री रामदास कदम यांनी चंद्रभागा वाळवंटातील कचरा उचलण्यास सुरुवात केली़ या स्वच्छता मोहिम दरम्यान कचरा उचलून चंद्रभागा नदी वाळवंट स्वच्छ करण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे ठेकेदारास रामदास कदम यांनी चंद्रभागा वाळवंटाची स्वच्छता व्यवस्थित करा, स्वच्छता करण्याची तुमची जबाबदारी आहे, अशा सूचना केल्या.

१२ टन उचलला कचरा चंद्रभागा वाळवंटात राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत शिवसेनेचे शेकडो स्वयंसेवक, नगरपरिषदेचे १५० कर्मचारी मंदिर समितीचे बीसीए स्वच्छता ठेकेदार, बीसीए कंपनीचे १५० कर्मचारी यांनी १ जेसीबी, ४ ट्रॅक्टर, २ कंटेनर त्यांच्या साह्याने चंद्रभागा पात्र व वाळवंटातील अवघ्या काही तासातच १२ टन कचरा उचलला आहे.

वाळू चोरी थांबवण्यासाठी करणार प्रयत्नचंद्रभागा नदी पात्रातून अनेक छोटे मोठे दादा गाढवाच्या साह्याने व होडीच्या साह्याने वाळू चोरी करतात. चंद्रभागा वाळवंटात खड्डे पडतात. चंद्रभागा नदीपात्रात पाणी आल्यानंतर भाविकांना त्याचा अंदाज येत नाही व खड्ड्यात पडून भाविकांचा मृत्यू होतो. चंद्रभागा नदी पात्रात विविध कारखान्याचे मळी मिश्रित पाणी सोडण्यात येते. यामुळे भाविकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. अशा तक्रारी सिद्धनाथ कोरे, महेश मोठे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे केल्या. यापुढे चंद्रभागेच्या वाळवंटातील वाळू चोरी थांबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरRamdas Kadamरामदास कदमenvironmentवातावरण