शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

संत विद्यापीठ, टोकन पद्धत अन् स्कॉयवायक या प्रकल्पांना मुख्यमंत्र्याची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 15:00 IST

विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवासाचा लोकार्पण सोहळा : मंदिर समिती कर्मचाºयांच्या आकृतीबंध मंजूर

ठळक मुद्देविठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवासाचा लोकार्पण सोहळामंदिर समिती कर्मचाºयांच्या आकृतीबंध मंजूर

पंढरपूर : दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपुरात संत विद्यापीठ असणे गरजेचे आहे़  भाविकांना तासन तास रांगेत उभे राहण्याबाबत गैरसोय होऊ नये यासाठी टोकणपद्धत आणि कुठेही गडबड गोंधळू होऊ नये शांततेत पांडुरंगाचे दर्शन व्हावे़ यासाठी या तीन प्रमुख प्रकल्पांना मान्यता देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने बांधण्यात आलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवासाच्या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले, सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, खा़ विजयसिंह मोहिते-पाटील, आ़ प्रशांत परिचारक, आ़ भारत भालके, आ़ सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले, मंदिर समितीचे माजी अध्यक्ष आण्णासाहेब डांगे, माजी आ़ सुधाकरपंत परिचारक यांच्यासह मंदिर समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते़

आषाढी वारीमध्ये विठ्ठलाच्या  दर्शनासाठी येण्याची मनापासून इच्छा होती, पण आंदोलनाच्या कारणास्तव लाखो वारकºयांची गैरसोय होऊ नये म्हणून मी येणे टाळलो़ विठ्ठल हा ठायी ठायी आहे़ त्यामुळे मी माझ्या घरी विठ्ठलाची पूजा केली, असे सांगून माझ्यावर विठ्ठलाचा आशीर्वाद आहे़  त्यामुळेच मी हेलिकॉप्टर अपघातातून सुखरूप वाचलो़  कारण माझ्याशेजारी विठ्ठल-रुक्मिणी मातेची मूर्ती होती़  विठ्ठलाच्या भक्तांना आवडेल असे भक्तनिवास येथे बांधण्यात आले आहे.

मंदिर समितीच्या वतीने प्रमुख तीन प्रकल्पासंदर्भात माझ्याकडे प्रस्ताव दाखल झाले आहेत़  त्या तीनही प्रकल्पांना मी त्वरित मान्यता देत आहे, कारण संत विद्यापीठ हे पंढरपुरात होणे गरजेचे आहे़ कारण संतांची परंपरा मोठी आहे़ ती तशीच पुढे चालू रहावी, त्यासाठी हे विद्यापीठ होणे आवश्यक आहे़ या विद्यापीठत अभ्यासासाठी देश-विदेशातून संशोधक विद्यार्थी यावेत, अशी अपेक्षा आहे़  भाविकांची रांगेत जास्त काळ थांबण्याची गैरसोय टाळण्यासाठी टोकन पद्धत आणि स्कायवॉक  या तीनही प्रकल्पांना मान्यता देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली़.

याशिवाय पंढरपूरच्या विकासासाठी नगरोत्थान योजनेतून १८० कोटी दिले आहेत़ नमामि चंद्रभागाअंतर्गत चंद्रभागेचे प्रदूर्षन रोखण्यासाठी शहरात भुयारी गटारी बांधणे आवश्यक आहे़ त्यासाठी ६१ कोटी, नामसंकीर्तनासाठी ४० कोटी, ६५ एकर परिसर आणि नामदेव स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही़  पंढरपूर हे वारकरी सांप्रदायाचे केंद्र आहे़  येथील वारकरी सांप्रदायाचे संस्कार महत्वाचे आहेत़  त्यासाठी येथील विकासाला सदैव सहकार्य असेल़  मात्र मंदिर समितीच्या कोणत्याही प्रकल्पास किंवा चांगल्या उपक्रमास वारकºयांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील़ वारकरी आणि शासन यांच्या समन्वयातून पंढरपूरचा विकास केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले़  दुष्काळावर मात करण्याची ताकद मिळो, या वर्षी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़  सर्वत्र पाणी आणि जनावरांना चारा टंचाई निर्माण होत आहे़  या दुष्काळावर मात करण्याची ताकद पांडुरंगानी द्यावे, एवढीच साकडे पांडुरंगाला असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPandharpurपंढरपूर