शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

मुख्यमंत्री 'हो-हो' म्हणाले, पण शेवटी दुष्काळग्रस्त बार्शीकरांना दुखावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 19:32 IST

पावसानं न पडून झोडपल पण, निदान राजानं गाऱ्हाण ऐकलं असं यावेळी बार्शीकरांना वाटलं होत. तालुक्याच्या तिन्ही नेत्यांनी सांगितल्यावर आता मुख्यमंत्रीमहोदय नक्कीच बार्शी

बार्शी - राज्य सरकारने 151 दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 9 तालुक्यांचा समावेश असून बार्शी आणि उत्तर सोलापूरला वगळण्यात आले. त्यामुळे, हो-हो म्हणूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर 3 लाख बार्शीकरांना दुखावलं आहे. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील इतर 9 तालुक्यात गंभीर दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

सोलापूर दौऱ्यावर असताना बार्शी तालुक्याचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं होत. विशेष म्हणजे आमदार दिलीप सोपल यांच्याशी बोलताना तर, "दिलीपराव, काळजीच करु नका, तुमच्या सुचनेप्रमाणे ट्रिगर 1 ट्रिगर 2 मध्ये नसला तरी ग्राऊंड सर्व्हेच्या आधारे बार्शी तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश होणारच" अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली होती. मुख्यमंत्र्यांचे लाडके राजाभाऊ आणि भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्याही निवेदनाला फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तर, तालुक्यातील दुसरे भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांनाही मुख्यमंत्र्यांनी खासगीत खात्री दिली होती, पण मिरगणे यांनी प्रसिद्धीला महत्व दिले नाही.

पावसानं न पडून झोडपल पण, निदान राजानं गाऱ्हाण ऐकलं असं यावेळी बार्शीकरांना वाटलं होत. तालुक्याच्या तिन्ही नेत्यांनी सांगितल्यावर आता मुख्यमंत्रीमहोदय नक्कीच बार्शी तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करतील अशीही अपेक्षा होती. पण, अखेर बार्शीला वगळूनच राज्यातील 151 दुष्काळी तालुक्याची यादी जाहीर झाली. बार्शी तालुक्यातील 71,873.01 हेक्टर खरीप क्षेत्र पावसाअभावी वाया जाण्याच्या मार्गांवर आहे. तर, रब्बी हंगामात केवळ 10 टक्केच पेरणी झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात साधं टिफनही चाललं नाही. पावसाअभावी तालुक्यातील 50 टक्के खरीप पीके वाया गेल्याचा अहवाल जिल्हाधिकारी साहेबांना पाठवल्याच तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी सांगितलं. मात्र, तरीही बार्शीला दुष्काळ यादीत स्थान न दिल्यानं तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. 'राजानं मारलं अन् निसर्गानं झोडपलं'! सांगणार कोणाला ? अशी दयनीय अवस्था तालुक्यातील आता बळीराजाची झाली आहे. त्यामुळे, फडणवीस साहेबांनी स्पेशल कॅटीगिरीत बार्शी तालुक्याचा समावेश करून बार्शीला दुष्काळ यादीत स्थान द्यावे, जेणेकरून मुख्यमंत्री शब्दाचे पक्के आहेत, असा बार्शीकरांचा विश्वास दृढ होईल.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMLAआमदारdroughtदुष्काळ