शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मुख्यमंत्री 'हो-हो' म्हणाले, पण शेवटी दुष्काळग्रस्त बार्शीकरांना दुखावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 19:32 IST

पावसानं न पडून झोडपल पण, निदान राजानं गाऱ्हाण ऐकलं असं यावेळी बार्शीकरांना वाटलं होत. तालुक्याच्या तिन्ही नेत्यांनी सांगितल्यावर आता मुख्यमंत्रीमहोदय नक्कीच बार्शी

बार्शी - राज्य सरकारने 151 दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 9 तालुक्यांचा समावेश असून बार्शी आणि उत्तर सोलापूरला वगळण्यात आले. त्यामुळे, हो-हो म्हणूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर 3 लाख बार्शीकरांना दुखावलं आहे. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील इतर 9 तालुक्यात गंभीर दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

सोलापूर दौऱ्यावर असताना बार्शी तालुक्याचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं होत. विशेष म्हणजे आमदार दिलीप सोपल यांच्याशी बोलताना तर, "दिलीपराव, काळजीच करु नका, तुमच्या सुचनेप्रमाणे ट्रिगर 1 ट्रिगर 2 मध्ये नसला तरी ग्राऊंड सर्व्हेच्या आधारे बार्शी तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश होणारच" अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली होती. मुख्यमंत्र्यांचे लाडके राजाभाऊ आणि भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्याही निवेदनाला फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तर, तालुक्यातील दुसरे भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांनाही मुख्यमंत्र्यांनी खासगीत खात्री दिली होती, पण मिरगणे यांनी प्रसिद्धीला महत्व दिले नाही.

पावसानं न पडून झोडपल पण, निदान राजानं गाऱ्हाण ऐकलं असं यावेळी बार्शीकरांना वाटलं होत. तालुक्याच्या तिन्ही नेत्यांनी सांगितल्यावर आता मुख्यमंत्रीमहोदय नक्कीच बार्शी तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करतील अशीही अपेक्षा होती. पण, अखेर बार्शीला वगळूनच राज्यातील 151 दुष्काळी तालुक्याची यादी जाहीर झाली. बार्शी तालुक्यातील 71,873.01 हेक्टर खरीप क्षेत्र पावसाअभावी वाया जाण्याच्या मार्गांवर आहे. तर, रब्बी हंगामात केवळ 10 टक्केच पेरणी झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात साधं टिफनही चाललं नाही. पावसाअभावी तालुक्यातील 50 टक्के खरीप पीके वाया गेल्याचा अहवाल जिल्हाधिकारी साहेबांना पाठवल्याच तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी सांगितलं. मात्र, तरीही बार्शीला दुष्काळ यादीत स्थान न दिल्यानं तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. 'राजानं मारलं अन् निसर्गानं झोडपलं'! सांगणार कोणाला ? अशी दयनीय अवस्था तालुक्यातील आता बळीराजाची झाली आहे. त्यामुळे, फडणवीस साहेबांनी स्पेशल कॅटीगिरीत बार्शी तालुक्याचा समावेश करून बार्शीला दुष्काळ यादीत स्थान द्यावे, जेणेकरून मुख्यमंत्री शब्दाचे पक्के आहेत, असा बार्शीकरांचा विश्वास दृढ होईल.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMLAआमदारdroughtदुष्काळ