शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मुख्यमंत्री 'हो-हो' म्हणाले, पण शेवटी दुष्काळग्रस्त बार्शीकरांना दुखावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 19:32 IST

पावसानं न पडून झोडपल पण, निदान राजानं गाऱ्हाण ऐकलं असं यावेळी बार्शीकरांना वाटलं होत. तालुक्याच्या तिन्ही नेत्यांनी सांगितल्यावर आता मुख्यमंत्रीमहोदय नक्कीच बार्शी

बार्शी - राज्य सरकारने 151 दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 9 तालुक्यांचा समावेश असून बार्शी आणि उत्तर सोलापूरला वगळण्यात आले. त्यामुळे, हो-हो म्हणूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर 3 लाख बार्शीकरांना दुखावलं आहे. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील इतर 9 तालुक्यात गंभीर दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

सोलापूर दौऱ्यावर असताना बार्शी तालुक्याचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं होत. विशेष म्हणजे आमदार दिलीप सोपल यांच्याशी बोलताना तर, "दिलीपराव, काळजीच करु नका, तुमच्या सुचनेप्रमाणे ट्रिगर 1 ट्रिगर 2 मध्ये नसला तरी ग्राऊंड सर्व्हेच्या आधारे बार्शी तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश होणारच" अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली होती. मुख्यमंत्र्यांचे लाडके राजाभाऊ आणि भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्याही निवेदनाला फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तर, तालुक्यातील दुसरे भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांनाही मुख्यमंत्र्यांनी खासगीत खात्री दिली होती, पण मिरगणे यांनी प्रसिद्धीला महत्व दिले नाही.

पावसानं न पडून झोडपल पण, निदान राजानं गाऱ्हाण ऐकलं असं यावेळी बार्शीकरांना वाटलं होत. तालुक्याच्या तिन्ही नेत्यांनी सांगितल्यावर आता मुख्यमंत्रीमहोदय नक्कीच बार्शी तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करतील अशीही अपेक्षा होती. पण, अखेर बार्शीला वगळूनच राज्यातील 151 दुष्काळी तालुक्याची यादी जाहीर झाली. बार्शी तालुक्यातील 71,873.01 हेक्टर खरीप क्षेत्र पावसाअभावी वाया जाण्याच्या मार्गांवर आहे. तर, रब्बी हंगामात केवळ 10 टक्केच पेरणी झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात साधं टिफनही चाललं नाही. पावसाअभावी तालुक्यातील 50 टक्के खरीप पीके वाया गेल्याचा अहवाल जिल्हाधिकारी साहेबांना पाठवल्याच तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी सांगितलं. मात्र, तरीही बार्शीला दुष्काळ यादीत स्थान न दिल्यानं तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. 'राजानं मारलं अन् निसर्गानं झोडपलं'! सांगणार कोणाला ? अशी दयनीय अवस्था तालुक्यातील आता बळीराजाची झाली आहे. त्यामुळे, फडणवीस साहेबांनी स्पेशल कॅटीगिरीत बार्शी तालुक्याचा समावेश करून बार्शीला दुष्काळ यादीत स्थान द्यावे, जेणेकरून मुख्यमंत्री शब्दाचे पक्के आहेत, असा बार्शीकरांचा विश्वास दृढ होईल.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMLAआमदारdroughtदुष्काळ