शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अन्नधान्यांचा पुरवठा करणाºया मध्य रेल्वेने कमाविले ३०९.७४ कोटीचे उत्पन्न

By appasaheb.patil | Updated: May 8, 2020 09:42 IST

एका महिन्यांची कमाई; मालवाहतुकीसह पार्सल गाड्या वाहतुकीतून रेल्वे मालामाल; ७२ हजार ९९१ वॅगन केला माल लोड

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या काळात रेल्वेची अत्यावश्यक सेवा सुरूदेशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेने पोहचविले अन्नधान्यप्रवाशी सेवा बंद; मात्र मालवाहतूक गाड्या सुरू

सुजल पाटील

सोलापूर : कोविड-१९ विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू झाल्याने देश जणू काही थांबला आहे. या लॉकडाऊनच्या कठीण काळात भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार मध्य रेल्वे विभागाने महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात मालवाहतुक गाड्या चालविल्या़ या वाहतुकीतून मध्य रेल्वेला ३०९.७४ कोटी रूपयाचे उत्पन्न मिळाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव, संसर्ग होऊ नये यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गर्दीच होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ मेपर्यंत देशभरात संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूपासून कोणत्याही व्यक्तीची अडचण होऊ नये, यासाठी शासनाच्या वतीने योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. दरम्यान, लोकांची गरज भागविण्यासाठी व जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वेने मालवाहतूक गाड्या सुरूच ठेवल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळातही अन्नधान्य आणि अत्यावश्यक वस्तू देशभरात उपलब्ध राहतील याची खबरदारी भारतीय रेल्वेने घेतली.

 लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून २४ मार्च ते २५ एप्रिल या एक महिन्याच्या कालावधीत ७२ हजार ९९१ वॅगन लोड करून ५९ हजार ७३० वॅगन अन्नधान्यांची पोती देशाच्या कानाकोपºयात पोहचविल्या आहेत. मध्य रेल्वेने आंध्र प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू यासह आदी राज्यातून धान्यांची वाहतुक केली आहे़ रेल्वेगाडीत माल चढवणे, त्यांची  वाहतूक आणि तो व्यवस्थित उतरवण्याचे काम लॉकडाऊनच्या काळातही जोमाने सुरू आहे.----------------------४९८ टन औषधांची वाहतुक...

मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर आणि भुसावळ विभागातून ४९८ टन औषधांची वाहतुक पार्सल गाड्यांच्या माध्यमातून केली आहे़ मध्य रेल्वेने देशभरात ३२३ पार्सल गाड्या चालविल्या़ अत्यावश्यक सेवेबरोबरच फळे, भाजीपाला, ई कॉमर्स वस्तू, पीपीई किट, औषधे, गोळ्या, सॅनिटायझर आदी वस्तू पार्सल गाड्यांच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपºयात पोहचविल्या आहेत.------------------रेल्वे कर्मचाºयांना १२ तासांची ड्यूटी...

कोरोना या संक्रमण आजारामुळे देशभर लॉकडाउन पुकारण्यात आला आहे़ या काळात भारतीय रेल्वेच्यावतीने अन्नधान्य पुरवठयासाठी मालवाहतुक गाड्या अहोरात्र चालविण्यात येत आहेत़ लोकांच्या घरात अंधार पडू नये, अन्नधान्याचा तुटवडा भासू नये व आवश्यक सेवासुविधा मिळाव्यात, यासाठी रेल्वे अधिकारी, स्टेशन मास्टर, लोकोपायलट, साहाय्यक लोको पायलट, स्टेशन मास्तर, पॉइंट्स मॅन आपली सेवा देत आहेत़  या लोकांमुळे एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी माल पोहोचविणे शक्य होत आहे़  मध्य रेल्वे विभागात स्टेशन मास्तर आणि पॉइंट्स मॅन यांना १२-१२ तासांची ड्यूटी लावण्यात आली आहे.-----------------रेल्वे स्थानकाबाहेर विनाकारण गर्दी नको..

महाराष्ट्रातून परराज्यात जाणाºया नागरिकांसाठी स्थानिक नोडल अधिकाºयांमार्फत नावनोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ रेल्वेने बाहेरगावी जाण्याची व्यवस्था ज्यांची करण्यात आली आहे त्यांना रेल्वे स्थानकापर्यंत पोहचविण्याची व्यवस्था शासनामार्फत करण्यात येणार आहे़ त्यामुळे जोपर्यंत संबंधितांकडून जोपर्यंत कळविले जाणार नाही तोपर्यंत कोणीही रेल्वे स्थानक परिसरात गर्दी करू नये, विनाकारण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये असेही आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.---------------भारतीय रेल्वेने लॉकडाउनच्या काळातही अन्नधान्यांचा रात्रंदिवस पुरवठा करून एक नवा इतिहास रचला आहे़ मध्य रेल्वेतील सर्वच विभागाने या मालवाहतुक गाड्या वेळेवर धावण्यासाठी प्रयत्न केले आहे़ गरजेच्या वेळी अन्नधान्यांचा पुरवठा करून रेल्वे प्रशासनानेही माणुसकीचे दर्शन घडविले आहे़ प्रवासी सेवेला प्राधान्य देणाºया रेल्वेने मालवाहतुकीलाही प्राधान्य दिले आहे.- प्रदीप हिरडे,वारिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस