शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मेंटेनन्सअभावी सोलापूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 13:00 IST

दुरुस्तीची जबाबदारी कोणाची यावरून महापालिका-पोलिसात वाद

ठळक मुद्दे- पोलीस देताहेत महापालिका प्रशासनास वारंवार पत्र- खर्चामुळे रखडली दुरुस्ती, देखभाल व दुरुस्तीबाबत प्रशासनात अनास्था- सीसीटीव्ही कॅमेरे दुरूस्ती करण्याची जबाबदारी कोणाची यावरून वाद

सोलापूर : महापालिकेने शहरातील महत्त्वाच्या चौकात बसविलेले सीसी कॅमेरे देखभालीअभावी बंद पडत आहेत. कॅमेरे दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोणाची यावरून वाद निर्माण झाला आहे. 

महापालिकेने चार वर्षांपूर्वी शहरातील महत्त्वाच्या चौकात सीसी कॅमेरे बसविले आहेत. हे कॅमेरे बसवून सर्व यंत्रणा पोलीस आयुक्तालयाकडे हस्तांतरित केली आहे. त्यामुळे या कॅमेºयावर पोलीस आयुक्तालयाची निगराणी आहे. या कॅमेºयावरून वाहतुकीची शिस्त बिघडविणाºयावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. सीसी कॅमेºयातील नोंदीवरून राँग साईड, वेगाने जाणे, सिग्नल तोडणे असे वाहतुकीचे नियम तोडणाºयांना शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे दंड केला जात आहे. असे असताना कॅमेºयाची देखभाल व दुरुस्तीबाबत अनास्था दाखविली जात आहे.

कॅमेरा बंद पडला की महापालिकेकडे पत्रव्यवहार केला जात आहे. पोलीस कामाला सहकार्य म्हणून नगरअभियंता संदीप कारंजे यांनी अनेकवेळा संगणक विभागाला कॅमेरे दुरुस्तीची सूचना केली आहे. पण आता याचा खर्च उचलायचा कोणी यावरुन दुरुस्ती रखडली आहे. कॅमेरे दुरुस्तीबाबत पोलीस आयुक्तालयाने नुकतेच महापालिकेला पत्र दिले आहे. 

या ठिकाणी आहेत कॅमेरे- महापालिकेने शहरात पाच महत्त्वाच्या ठिकाणी सीसी कॅमेरे बसवून पोलीस आयुक्तालयाकडे नेटवर्क दिलेले आहे. छत्रपती शिवाजी चौक (पांजरापोळ), छत्रपती संभाजी चौक (जुना पुणे नाका), महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक), महात्मा गांधी चौक (स्टेशन) आणि विजापूर वेस या पाच ठिकाणी सीसी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी चौकातील कॅमेरे आॅफ्टिक फायबर केबल नेटवर्कमधून पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात जोडलेले आहेत. याचप्रमाणे स्टेशन चौकातील सीसीकॅमेºयाचे प्रक्षेपण नियंत्रण कक्षात आहे. विजापूर वेशीतील कॅमेरे बेगमपेठ पोलीस चौकीला जोडले गेले आहेत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील कॅमेºयाचे प्रक्षेपण महापालिकेकडेच आहे. 

मेंटेनन्सचा करार नाहीमहापालिकेने या महत्त्वाच्या चौकात सीसी कॅमेरे बसवून चार वर्षे होत आली आहेत. कॅमेºयाचे मेंटेनन्स कोणी करायचे या वादात अनेक दिवस हे कॅमेरे बंद असतात. कॅमेरे बंद पडण्याची कारणे किरकोळ असतात. वारा किंवा इतर धक्क्याने कनेक्शन तुटणे, वीजपुरवठा व्यवस्थित न होणे यामुळे प्रक्षेपण बंद पडते. दुरुस्तीसाठी पोलिसांकडून महापालिकेकडे पत्रव्यवहार होतो अशी माहिती संगणक प्रोग्रॅमर मतीन सय्यद यांनी दिली. 

महापालिकेतील ५५ कॅमेरे बदलणारमहापालिकेत सभागृह, इंद्रभुवन, प्रशासकीय इमारतीतील कार्यालये व बाहेरील बाजूस कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पण यातील बहुतांश कॅमेरे बंद पडले आहेत. त्यामुळे नव्याने ५५ कॅमेरे बसविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याप्रमाणे मनपा सभागृह : ११, भूमी व मालमत्ता : १७, बांधकाम परवाना : ९, सार्वजनिक आरोग्य विभाग : १७. सभागृहातील दोन सीसी कॅमेºयामध्ये रेकॉर्डरिंगची सुविधा असणार आहे.  

टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीcctvसीसीटीव्हीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसtraffic policeवाहतूक पोलीस