शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘सीबीएसई’ शिक्षण पद्धतीची दुकानदारी मोडीत काढणार : विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 16:50 IST

सोलापूर : सध्याच्या शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल घडवित कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्राधान्य देण्यात ...

ठळक मुद्देसध्याच्या शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल घडवित कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्राधान्य देण्यात येणार - विनोद तावडेराज्यात शिक्षणपद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. दहावी अनुत्तीर्णांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून आॅक्टोबरऐवजी जुलैमध्येच फेरपरीक्षा सुरु - विनोद तावडे

सोलापूर : सध्याच्या शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल घडवित कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्राधान्य देण्यात येणार आहे. अशी प्रक्रिया मागील दोन वर्षांपासून सुरू झाली आहे. याद्वारे सध्या असलेली सीबीएसई शिक्षण पद्धतीची दुकानदारी मोडीत काढू असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण व  उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेच्या अमृतमहोत्सव समारोप सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रारंभी गणेश व मार्कंडेय महामुनींच्या मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, सचिव दशरथ गोप, माजी खासदार गंगाधरपंत कुचन,गणेश बुधारम, धर्मण्णा सादूल, आ. प्रणिती शिंदे, माजी आ. नरसय्या आडम, मुरलीधर आरकाल, दीपक मुनोत, विनायक रार्चला, जगदीश दिड्डी, गोविंद गज्जम, डॉ. मीरा शेंडगे, प्राचार्या गीता  सादूल,शारदा गोरट्याल, प्रा.अनिल निंबाळकर व विश्वस्त व्यंकटेश आकेन, विजयकुमार गुल्लापल्ली, श्रीनिवास कटकूर, अ‍ॅड.श्रीनिवास क्यातम, श्रीधर चिट्याल, दिनेश यन्नम, लक्ष्मीकांत गड्डम, हरीश कोंडा, संगीता इंदापुरे, सुलोचना गुंडू, लक्ष्मीनारायण कमटम, अरविंद कुचन,नरसय्या इप्पाकायल, हरिदास पोटाबत्ती,नागनाथ गंजी आदी उपस्थित होते.

 पुढे बोलताना तावडे म्हणाले की, राज्यात शिक्षणपद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. दहावी अनुत्तीर्णांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून आॅक्टोबरऐवजी जुलैमध्येच फेरपरीक्षा सुरु केली. गुणपत्रिकेतून नापास ही संज्ञाच हद्दपार करुन उत्तीर्ण किंवा कौशल्य विकासास पात्र ही नवी पद्धत सुरु केली. विद्यार्थ्यांना  जे जमते तेच शिक्षण पाहिजे यादृष्टीने कौशल्य विकासावर आधारित शिक्षणपद्धती राबविल्यास या माध्यमातून भरीव अर्थार्जनाच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील. गेल्या ७५ वर्षांपासून विडी व यंत्रमाग कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्याचे पवित्र कार्य संस्था करीत आहे, या प्रशालेचे विद्यार्थी जगभर आहेत. याचा अभिमान वाटतो. असे  सांगून तावडे यांनी संस्थेचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.

याप्रसंगी पालकमंत्री देशमुख यांनी या संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत असल्याचे सांगितले.  तरी या संस्थेला आवश्यक निधी सरकार देईल, असा आशावाद व्यक्त केला. माजी खा. कुचन यांनी कुचन प्रशालेचा इतिहास मांडला. आ. शिंदे म्हणाल्या, शिष्यवृत्ती तसेच शिक्षणासाठी १९६७ च्या पुराव्याची अट हा जटिल प्रश्न असून तो  शिक्षणमंत्र्यांनी सोडवावा.  माजी आ. आडम यांनी पुल्ली कन्या प्रशालेचे वर्ग विनाअनुदानित असल्याचा मुद्दा मांडला. प्रास्ताविक सचिव दशरथ गोप यांनी केले. सूत्रसंचालन उमा कोटा,अभिज भानप यांनी केले.आभार गोपाळ मुडदिड्डी यांनी मानले.

माजी विद्यार्थ्यांनी जागविल्या आठवणी...- कुचन प्रशालेचे माजी विद्यार्थी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमृतमहोत्सवाच्या सांगता समारंभाचे आयोजन केल्यामुळे शाळा परिसर अत्यंत आकर्षक पध्दतीने सजविण्यात आला होता. शाळेचे माजी विद्यार्थी उद्योग - व्यवसायाबरोबरच प्रशासन आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. हे विद्यार्थी या देखण्या समारंभाचा साक्षीदार होण्यासाठी आवर्जुन आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दलच्या आठवणी जागविल्या. याशिवाय सेवानिवृत्त शिक्षकांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शाळेत रूजू होण्यापासूनच्या आठवणी सांगितल्या. पद्मशाली शिक्षण संस्थेच्या पदाधिकाºयांनी या समारंभाचे नेटके नियोजन केल्याबद्दल उपस्थितांनी प्रत्यक्ष भेटून त्यांची प्रशंसा केली.

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणCBSE Examसीबीएसई परीक्षाVinod Tawdeविनोद तावडेSchoolशाळा