शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शेतकऱ्यांची लूट करणारा जीआर रद्द करा : अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रुमणे मोर्चा काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 06:39 IST

सोलापूर लोकमत न्युज

मंगळवेढा :  शेतकऱ्यांच्या डाळिंब फळ पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे, तरी सुद्धा चुकीच्या निकषांमुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या घामातून भरलेला फळ पिक विमा मिळू शकत नाही. सरकारने तात्काळ ४५  मी मी पेक्षा जास्त पाऊस पडलेल्या प्रत्येक मंडळींची आकडेवारी घ्यावी व सरकारने शेतकऱ्यांना लुटणारा जीआर रद्द करावा व ४५ मी मी पेक्षा जास्त पाऊस पडलेल्या प्रत्येक मंडलाची भरपाई मंजूर करायला विमा कंपनीला भाग पाडावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर  शेतकरी  घेऊन  रुमणे मोर्चा काढणार असल्याचे निवेदन जिल्हा संघटक युवराज घुले यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना दिले आहे. 

सरकारने फळ पिक विमा लावलेले निकष शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकणारे आहेत सरकारने फक्त विमा कंपनीच्या फायद्याचे निकष लावलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी मृग बहर चा डाळिंबी चा विमा भरलेला आहे त्या फळ पिकांचे तीन ट्रिगर केलेले आहेत पहिला ट्रिगर १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये २१  दिवसांचा पावसाचा खंड असल्यानंतर दुसरा फिगर १६ ऑगस्ट ते १५ ऑक्टोंबर २१  दिवसाचा पावसाचा खंड असल्यानंतर आणि तिसरा ट्रिगर १६ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर फक्त या कालावधीमध्ये जास्त पाऊस तोही एक दिवसात ४५ ते ६० मी मी पाऊस झाल्यानंतरच फळपीक विमा मंजूर होणार आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने निकष लावून सरकारने दिवसाढवळ्या विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा खिसा कापलेला आहे, तरी पीक विमा मिळेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नसल्याचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत अर्जुन मुद्गुल, प्रभू चंदन शिंदे, ,काका दत्तू व शेतकरी बांधव उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीfraudधोकेबाजीFarmerशेतकरीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना