शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची लूट करणारा जीआर रद्द करा : अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रुमणे मोर्चा काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 06:39 IST

सोलापूर लोकमत न्युज

मंगळवेढा :  शेतकऱ्यांच्या डाळिंब फळ पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे, तरी सुद्धा चुकीच्या निकषांमुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या घामातून भरलेला फळ पिक विमा मिळू शकत नाही. सरकारने तात्काळ ४५  मी मी पेक्षा जास्त पाऊस पडलेल्या प्रत्येक मंडळींची आकडेवारी घ्यावी व सरकारने शेतकऱ्यांना लुटणारा जीआर रद्द करावा व ४५ मी मी पेक्षा जास्त पाऊस पडलेल्या प्रत्येक मंडलाची भरपाई मंजूर करायला विमा कंपनीला भाग पाडावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर  शेतकरी  घेऊन  रुमणे मोर्चा काढणार असल्याचे निवेदन जिल्हा संघटक युवराज घुले यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना दिले आहे. 

सरकारने फळ पिक विमा लावलेले निकष शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकणारे आहेत सरकारने फक्त विमा कंपनीच्या फायद्याचे निकष लावलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी मृग बहर चा डाळिंबी चा विमा भरलेला आहे त्या फळ पिकांचे तीन ट्रिगर केलेले आहेत पहिला ट्रिगर १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये २१  दिवसांचा पावसाचा खंड असल्यानंतर दुसरा फिगर १६ ऑगस्ट ते १५ ऑक्टोंबर २१  दिवसाचा पावसाचा खंड असल्यानंतर आणि तिसरा ट्रिगर १६ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर फक्त या कालावधीमध्ये जास्त पाऊस तोही एक दिवसात ४५ ते ६० मी मी पाऊस झाल्यानंतरच फळपीक विमा मंजूर होणार आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने निकष लावून सरकारने दिवसाढवळ्या विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा खिसा कापलेला आहे, तरी पीक विमा मिळेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नसल्याचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत अर्जुन मुद्गुल, प्रभू चंदन शिंदे, ,काका दत्तू व शेतकरी बांधव उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीfraudधोकेबाजीFarmerशेतकरीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना