शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शांततेसाठी थायलंडने धाडली सोलापूरसाठी बुद्धमूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 14:56 IST

नालंदा बुद्धविहारात स्थापना : जागतिक शांतीसाठी उचलले पाऊल

ठळक मुद्देबुद्धांचा धम्म हा विश्व कल्याणाचा मार्ग - भन्ते बी. सारीपुत्तथायलंड ते सोलापूर हा हजारो मैलाचा प्रवासाचा टप्पा पारही मूर्ती २२५ किलोग्रॅम वजनाची असून साडेसहा फूट उंचीची आहे.

सोलापूर : थायलंड सरकारने जागतिक शांततेसाठी प्रयत्न सुरू केले असून, यासाठी ते विविध देशांना  गौतम बुध्दांची मूर्ती भेट देत आहेत. बुध्दांना करूणाशील म्हणून संबोधले जाते. त्यांनी मानवाला शांतीचा संदेश दिला. हाच संदेश देशादेशात पोहोचण्यासाठी थायलंडने हे पाऊल उचलले असून. तेथून आलेल्या बुध्दमूर्तीची विजापूर रोडवरील नालंदा बुध्द विहारात भन्ते बी. सारीपुत्त यांच्या हस्ते रविवारी स्थापना झाली.

थायलंडवरून ही मूर्ती सोलापुरात आली असली तरी या मूर्तीचा प्रवास आणि ती येथे आणण्यामागील भावनाही तेवढीच महत्त्वाची आहे. नालंदा नगरातील या बुद्धविहाराशी संबंधितांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मूर्ती २२५ किलोग्रॅम वजनाची असून साडेसहा फूट उंचीची आहे.

अर्धोन्मलित नेत्र आणि ध्यानमुद्रेत असणाºया या मूर्तीच्या चेहºयावरील धीरगंभीर भाव, तेज, शांती आणि प्रसन्नता पाहिल्यावर मन शांत होते. जगाला शांतीचा संदेश देणाºया गौतम बुद्धांच्या या मूर्तीला सोन्याचा मुलामा असून अत्यंत आकर्षक असलेली ही मूर्ती तेवढीच देखणीही आहे. सध्या सुरू असलेल्या वर्षावासात सोलापुरात आणलेली ही बुद्धमूर्ती समाजाला शांतीचा संदेश देईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

असा झाला मूर्तीचा प्रवास...- थायलंड ते सोलापूर हा हजारो मैलाचा प्रवासाचा टप्पा पार करून गौतम बुद्धांची मूर्ती सोलापुरात पोहोचली कशी, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी थायलंड सरकारने या मूर्ती मोफत देण्याची योजना आखली आहे. गुजरातमधील संघकाया फाउंडेशनच्या माध्यमातून अशा अनेक मूर्ती भारतात आल्या आहेत.

थायलंडवरून अत्यंत काळजीपूर्वक या मूर्ती बोटीने मुंबईत आणल्या जातात. तेथून कायदेशीर सोपस्कार पार पाडल्यावर संघकाया फाउंडेशनच्या माध्यमातून आधी ठरल्यानुसार या मूर्ती संबंधित संस्था अथवा मंडळांना सोपविल्या जातात. सोलापुरात आणलेल्या या मूर्तीचा प्रवासही असा झाला असून कल्याणमधील वाशिदवरून ही मूर्ती ट्रकमधून सोलापुरात आणण्यात आली. त्यानंतर ती नालंदा बुद्धविहारात स्थापन करण्यात आली.

बुद्धांचा धम्म हा विश्व कल्याणाचा मार्ग - भन्ते बी. सारीपुत्त- तथागत गौतम बुद्धांनी जगाला दिलेला शांतीचा संदेश आणि दिलेला धम्म हा विश्व कल्याणाचा मार्ग आहे. बुद्ध धम्माचे आचरण केल्यास प्रत्येकास समाधान लाभेल, असे प्रतिपादन भन्ते बी. सारीपुत्त यांनी नालंदा बुद्धविहारातील मूर्तीच्या स्थापनेप्रसंगी केले. भन्ते सारीपुत्त यांच्या हस्ते गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून बुद्धवंदना करण्यात आली. माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, माजी नगरसेवक अरुण भालेराव, अजित गायकवाड, बसपाचे राज्य प्रभारी संजीव सदाफुले, बौध्द महासभेचे अण्णासाहेब वाघमारे, धम्मरक्षिता कांबळे, प्रा. डॉ संघप्रकाश दुड्डे, बहुजन शिक्षक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर, बुद्धविहार संस्थेचे अध्यक्ष शरद वाघमारे, जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षा माया लोंढे उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरBuddha Cavesबौद्ध लेणीMumbaiमुंबईThailandथायलंड