शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
6
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
7
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
8
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
9
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
10
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
11
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
12
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
13
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
14
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
16
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
17
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
18
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
19
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
20
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चटणी, भाकरी खाणाऱ्या भाऊंनी आधुनिक शेतीचा दिला होता सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 12:54 IST

भगवान शिंदेंच्या निधनानंतर संपूर्ण अक्कलकोट तालुक्यावर पसरली शोककळा

संपूर्ण अक्कलकोट तालूक्यासाठी सोमवारची सकाळ धक्कादायक ठरली. गोकुळ शुगर्स, धोत्री या संस्थेचे चेअरमन भगवान भाऊ शिंदे यांची सोलापुरात रेल्वे रूळावर झालेल्या अपघातात निधन झाल्याची बातमी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली, अन् सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला.

अक्कलकोट तालूक्यातील दहिटणेसारख्या छोट्याशा गावात १९५४ साली भगवान भाऊ शिंदे यांचा जन्म झाला.वडिल स्व.दत्तात्रय शिंदे व आई अंजनाबाईंच्या यांच्या संस्कारात भगवान शिंदेंचे आयुष्य सुरू झाले. संपूर्ण शिंदे कुटूंबाचा उदरनिर्वाह अल्पशा शेतीवर अवलंबून होता. त्यातच वडिलांचे छत्र लहानपणीच हरवल्याने संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी भगवान शिंदेसह इतर तीन भावंडांवर पडली. ज्या वयात हसणे, खेळणे आणि शिक्षण घेणे ठरलेले असते,त्या वयात संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी चारही भावंडांवर पडली. समाजात वावरत असताना ज्या अडचणी भगवान शिंदेंना लहानपणी दिसल्यानंतर त्यांच्या मनात समाजकारणाची भावना जन्मास आली आणि यातुन भगवान शिंदेंसारख्या समाजकारणी कार्यकर्तृत्वाचा फायदा संपूर्ण अक्कलकोट तालुक्यास झाला.

 भगवान शिंदे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिले.त्यांच्या हयातीत त्यांनी लोकशाहीतील कोणत्याही पदाविना लोकोपयोगी कार्य केले.  संपूर्ण चपळगाव गटात भगवान शिंदे हे सर्वांशी मिळून मिसळून राहायचे. प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जाणारा लोकहितवादी तत्वाचा नेता म्हणून त्यांची ओळख होती आणि म्हणूनच त्यांना भाऊ या नावाने संबोधले जायचे.चपळगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते.

‍‍‍‍  ज्या ज्या वेळी चपळगाव पंचक्रोशीत दुष्काळ पडला,त्या त्या वेळी भगवान शिंदे व संपूर्ण शिंदे कुटूंबांनी स्वतःच्या शेतातील पिके वाळवून पाणीपूरवठा केल्याची बाब जनता कधीच विसरणार नाही.जनतेच्या दुव्याने शिंदे परिवाराने चालविलेल्या कोणत्याही उद्योगधंद्यात त्यांना अडचण आली नाही. अक्कलकोट तालूक्यातील ऊस उत्पादकांची अडचण भगवान शिंदेंच्या नजरेतुन हटली नाही.मग भाऊंनी माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी म्हेत्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली रूद्देवाडीच्या माळरानावर मातोश्री शुगर्सची स्थापना केली.यानंतर भगवान भाऊ कधीच थांबले नाहीत.तडवळ व धोत्री या ठिकाणी साखर कारखान्याची निर्मिती करून संपूर्ण अक्कलकोट तालूक्यातील शेतकऱ्यांसाठी ऊसाचा प्रश्न मिटवला.शेतकरी जगला तरच देशात लोकशाही नांदेल या तत्त्वाने जगणारे भगवान भाऊ होते.

तालुक्याच्या माथी असलेला दुष्काळाचा कलंक पुसावा यासाठी जलसंधारणाची कामे भगवान भाऊ स्वतःच्या देखरेखेखाली करायचे. दहिटणेसारख्या छोट्याशा गावात जन्मलेले भाऊ स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चटणी,भाकरी अनेकदा आनंदाने खायचे.आधूनिक शेती व तंत्रज्ञान फार गरजेचे आहे,असा सल्ला ते वारंवार देत असे. त्यांनी कधीच श्रीमंतीचा देखावा केला नाही .गरीबी मिटविण्यासाठी त्यांनी स्वतःच्या कारखान्यात तालुक्यातील अनेक गरीब कुटूंबातील बेरोजगारांना घेतले.  त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक गरजूला ते सढळ हाताने मदत करायचे. राजकारणातील कोणत्याही पदाविना भगवान भाऊंनी संपूर्ण आयुष्यभर समाजकारण केले.

 समाजकारण व सहकार क्षेत्रातील एक निष्ठावंत हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मराठा समाजातील जागरूक असणारा लोकहितवादी नेता हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

- शंभुलिंग अकतनाळ, चप्पळगांव (ता. अक्कलकोट)

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने