शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ, माझी काळजी करू नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 13:19 IST

परवा रक्षाबंधनाचा सण प्रत्येकाने यथाशक्ती साजरा केला. भावाबहिणीच्या प्रेमळ नात्याला घट्ट बांधून ठेवणारा धागा नाजूक असला तरी जन्मजन्माचं नातं घट्ट करणारा असतो.

परवा रक्षाबंधनाचा सण प्रत्येकाने यथाशक्ती साजरा केला. भावाबहिणीच्या प्रेमळ नात्याला घट्ट बांधून ठेवणारा धागा नाजूक असला तरी जन्मजन्माचं नातं घट्ट करणारा असतो. बसस्टँडला मी माझ्या ताईला पुणे गाडीत बसवलं, माझ्यासारखे असे अनेक भाऊ होते, बहिणीही होत्या, कानावर शब्द आले.. भाऊ, माझी काही काळजी करू नको. मी बरी हाय, थोडं दिवस गेलं की सारं नीट होईल. बहीण हळुवार शब्दांनी स्वत:ला व काळजीत असणाºया भावाला धीर देत होती. नशिबापुढं कुणाला जाता येतं होय. सारं ऐकताना भावनावश झालो. बहिणीचं खरं प्रेम कोर्टात बापाच्या संपत्तीचा अधिकार सोडतानाच्या सही देताना कळतं, असा संदेश मीडियातून पसरवला जातो. पण हे ऐकल्यानंतर अजून नात्यासाठी काळजातली ओल कायम असलेली दिसली. बरं वाटलं.

निश्चितच अनेक विदारक वास्तव आहे. बहीण-भाऊ सख्ख्या नात्यात बोलत नाहीत. प्रेमळ सुसंवाद नाही. अगदी किरकोळ कारणासाठी समज, गैरसमजुती व संपत्तीसाठीही मनं कटू होताना दिसतात. हे असे सण ते सारं दुरुस्त होण्यासाठी तर असतात. पण दुसºया बाजूला या प्रसंगासारखी जीव लावणारी, नातं जपणारी माणसंही आहेतच की.

आज अनेक भाऊ-बहीण खरंच जगाला हेवा वाटावा असं राहतात, परिस्थिती कशीही असू दे. नाती जपण्याची ताकत मिळवावी लागेल. दिलं घेतलं पुरत नसतं, पण वेळप्रसंगी धावून जाणं अधिक महत्त्वाचं असतं. आपल्या अवतीभोवती असे हजारो बहीण-भाऊ व असे संवाद आपणही पाहिले, ऐकले असतील मग संवेदना शून्यतेचाच अधिक बोलबाला का होताना दिसतो. घराघरांतून यथाशक्ती हा सण साजरा झाला. दिवसभर गाड्यावरून व गाड्यांमधून भावाबहिणींची धावपळ दिसली. राखी खरेदी करताना बहिणीचा अधिक सुंदरतेचा चाललेला अट्टाहास भावाची अधिकाधिक ओवाळणी वा भेटवस्तू देण्यासाठी चाललेला प्रयत्न हे सारं फार प्रेमाने चालू असतं. यात पूर्वीचा भाबडा भाव जरी कमी झाला असला तरी अत्याधुनिक काळातही तो टिकून आहे हे कमी नाही ना? 

ज्या घरात ही नाती परिपूर्ण नाहीत. उपलब्ध नाहीत किंवा आहेत तरीही ते मानसबंधू, वडीलबंधू, ईश्वरबंधू, गुरुबंधू तसेच सीमेवरती अहोरात्र परिश्रम घेणारे जवान, कामावरील पोलीस, अनाथाश्रमात बंधुभावाने हा सण साजरा करताना पाहून मन भरून येते आणि तेव्हाच शाळेतील प्रतिज्ञेतील सारे भारतीय माझे बांधव आहेत, या शब्दांचा अर्थ समाजात रुजताना दिसतो. असंच म्हणता येईल नाही का? सर्वच जातीधर्माचे लोक हा सण साजरा करतात. हे पाहताना मन सुखावून जायला हरकत नाही, नक्कीच असते. अनेक ठिकाणी नात्यात वाईट स्थिती, पण आपण चांगल्याच गोष्टींचा विचार करू या ना? 

आज शिक्षण, उद्योग-व्यवसाय, नोकरी यानिमित्ताने अनेक भाऊ-बहीण देश-विदेशात असले तरी आॅनलाईन रक्षाबंधन साजरे करताना दिसतात. प्रेमतर तेच असतं ना? बहीणभावाचं नशीबवान ते जे असा आनंद देण्याचा त्याचा प्रयत्न चालू असतो. खरंच बहिणींची काळजी करणारा, घेणारा भाऊ व कायम भावाचं योगक्षेम राहण्यासाठी देवाला हात जोडणारी बहीण यांचं नातं अधिक घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण खरंच अत्यंत पवित्र आहे. सर्वच भावा-बहिणींनी ते जपण्यासाठी धडपड करावीच.

सण सरुन गेला, मीही साजरा केला. पण कानात ते बहिणीची पाठवणी करणारा भावा-बहिणीचे शब्द. ‘भाऊ माझी काळजी करू नको..’ हे शब्द खूप वेळ घुमत होते. संवेदनाची सर्वोच्च अवस्था होती ती...- रवींद्र देशमुख(लेखक जि. प. शिक्षक आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरRakhiराखी