शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

पाण्यानं आणली जान.. मतदारांनी ठेवली जाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:22 IST

सोलापूर : पाऊसमान कमी झाले की लोक पाणी... पाणी करायचे. अशा तीव्र टंचाईच्या काळात तहान भागवून जीवात जान ...

सोलापूर : पाऊसमान कमी झाले की लोक पाणी... पाणी करायचे. अशा तीव्र टंचाईच्या काळात तहान भागवून जीवात जान आणली. मतदारांनी नेमकी ही जाण ठेऊन मतदान केल्यामुळे मदत करणारी नेमकडी मंडळी निवडून आल्याचं निकालातून स्पष्ट झाले आहे. मात्र पाणी देणाऱ्या काहींना नाकारल्याचेही दिसत आहे.

तळेहिप्परगा, बीबीदारफळ व भागाईवाडी, हगलूर या गावांत पाणी या विषयावरच सत्तांतर झाले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील तळेहिप्परगा गावात पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकरुख तलावालगतच्या तळेहिप्परगा गावातही पाण्याची तीव्र समस्या आहे. येथील माजी सरपंच स्व. लक्ष्मण भिंगारे यांची तलावालगत शेत-जमीन आहे. गावातील पाण्याची समस्या लक्षात घेऊन त्यांची मुले कुमार व सचिन यांनी सोलापूर-तुळजापूर रस्त्यालगतच्या भागात स्वखर्चाने पाईपलाईन केली. पाणीपुरवठा करण्यासाठी एक कर्मचारीही नियुक्त केला. याशिवाय अंधाराचे साम्राज्य दूर करण्यासाठी १८५ दिवे लावले. स्वत:चे धान्य दुकान असल्याने अडचणीतील कुटुंबांना वेळोवेळी मोफत धान्य दिले. शिवाय कोरोनाच्या कालावधीत ५०० कुटुंबांना किट दिले. याची जाण ठेवत नागरिकांनी सचिन व रोहन, चुलते, पुतणे शिवाय सत्ताच भिंगारे-पाटील-कांबळे यांच्याकडे दिली.

बीबीदारफळ येथेही पाणीटंचाईच्या काळात खासगी दोन बोअरचे पाणी मिळाल्याने सत्ताधाऱ्यांचे दोन उमेदवार पराभूत झाले. गेल्या १५ वर्षांपासून जमिनीतील पाणी मोफत बघून अनेकांची शेती बागायती करणाऱ्या तुकाराम साठे यांना पराभूत व्हावे लागले.

-----

कुणी ठेवली कुणी नाही ठेवली...

भागाईवाडीत सत्ता गमवावी लागली. मात्र स्वतः पाणी फौंडेशनच्या कामाच्या बळावर कविता घोडके विजयी झाल्या. हगलूर येथे गेल्या आठ-दहा वर्षांपासून तुकाराम नवले हे संभाजीनगर या विस्तारित भागाला स्वतःच्या बोअरचे पाणी पुरवतात. मात्र त्यांचा १५ मतांनी पराभव झाला. यामुळे मोफत पाणी दिल्याची जाण काहींनी ठेवली, तर काहींना मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे.