शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
3
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
4
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
5
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
6
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
9
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
10
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
11
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
12
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
15
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
18
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
19
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
20
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर

पाण्यानं आणली जान.. मतदारांनी ठेवली जाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:22 IST

सोलापूर : पाऊसमान कमी झाले की लोक पाणी... पाणी करायचे. अशा तीव्र टंचाईच्या काळात तहान भागवून जीवात जान ...

सोलापूर : पाऊसमान कमी झाले की लोक पाणी... पाणी करायचे. अशा तीव्र टंचाईच्या काळात तहान भागवून जीवात जान आणली. मतदारांनी नेमकी ही जाण ठेऊन मतदान केल्यामुळे मदत करणारी नेमकडी मंडळी निवडून आल्याचं निकालातून स्पष्ट झाले आहे. मात्र पाणी देणाऱ्या काहींना नाकारल्याचेही दिसत आहे.

तळेहिप्परगा, बीबीदारफळ व भागाईवाडी, हगलूर या गावांत पाणी या विषयावरच सत्तांतर झाले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील तळेहिप्परगा गावात पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकरुख तलावालगतच्या तळेहिप्परगा गावातही पाण्याची तीव्र समस्या आहे. येथील माजी सरपंच स्व. लक्ष्मण भिंगारे यांची तलावालगत शेत-जमीन आहे. गावातील पाण्याची समस्या लक्षात घेऊन त्यांची मुले कुमार व सचिन यांनी सोलापूर-तुळजापूर रस्त्यालगतच्या भागात स्वखर्चाने पाईपलाईन केली. पाणीपुरवठा करण्यासाठी एक कर्मचारीही नियुक्त केला. याशिवाय अंधाराचे साम्राज्य दूर करण्यासाठी १८५ दिवे लावले. स्वत:चे धान्य दुकान असल्याने अडचणीतील कुटुंबांना वेळोवेळी मोफत धान्य दिले. शिवाय कोरोनाच्या कालावधीत ५०० कुटुंबांना किट दिले. याची जाण ठेवत नागरिकांनी सचिन व रोहन, चुलते, पुतणे शिवाय सत्ताच भिंगारे-पाटील-कांबळे यांच्याकडे दिली.

बीबीदारफळ येथेही पाणीटंचाईच्या काळात खासगी दोन बोअरचे पाणी मिळाल्याने सत्ताधाऱ्यांचे दोन उमेदवार पराभूत झाले. गेल्या १५ वर्षांपासून जमिनीतील पाणी मोफत बघून अनेकांची शेती बागायती करणाऱ्या तुकाराम साठे यांना पराभूत व्हावे लागले.

-----

कुणी ठेवली कुणी नाही ठेवली...

भागाईवाडीत सत्ता गमवावी लागली. मात्र स्वतः पाणी फौंडेशनच्या कामाच्या बळावर कविता घोडके विजयी झाल्या. हगलूर येथे गेल्या आठ-दहा वर्षांपासून तुकाराम नवले हे संभाजीनगर या विस्तारित भागाला स्वतःच्या बोअरचे पाणी पुरवतात. मात्र त्यांचा १५ मतांनी पराभव झाला. यामुळे मोफत पाणी दिल्याची जाण काहींनी ठेवली, तर काहींना मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे.