शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

संविधान बदलून हुकूमशाही आणण्याचा भाजपचा डाव  : नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 12:39 IST

संविधान बचावासाठी लढा देणे म्हणजे एक दुसरं महायुद्धच होणार असल्याचेही मत काँग्रेसच्या अखिल भारतीय मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष, माजी मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेस पक्षाने पराभव केला होता अशा अफवा भाजपकडून पसरविल्या जात आहेत - नितीन राऊतभाजपकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न होत असतानाही केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले त्यांच्यासोबत आहेत - नितीन राऊत

सोलापूर : भारतीय संविधान बदलून देशात हुकूमशाही राजवट आणण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसच्या अखिल भारतीय मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष, माजी मंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी येथे काँग्रेसभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

राऊत यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली. भारतात जात, धर्म आणि पंताच्या राजकारणाला थारा नाही पण भाजपकडून या लोकशाहीवर आधारित असलेल्या या देशाचे राजकारण जातीधर्मावर आणण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे संविधान बचावासाठी लढा देणे म्हणजे एक दुसरं महायुद्धच आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेस पक्षाने पराभव केला होता अशा अफवा भाजपकडून पसरविल्या जात आहेत. त्यावेळी डॉ. बाबासाहेब हे काँग्रेस पक्षातर्फे निवडणुकीस उभे नव्हते तर ते स्वतंत्र पक्षाकडून उभे होते.

डाव्या विचारसरणीच्या लोकांनी डॉ. बाबासाहेबांना दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसने त्यांना राज्यसभा आणि संविधान सभेवर घेतले. त्यावेळी पराभव झाला तरी दगडापेक्षा वीट मऊ म्हणून काँग्रेससोबत राहू, अशी भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतली होती. संविधान बचावासाठी लढणारे लोकच डॉ. बाबासाहेबांचे खरे वारसदार आहेत. भाजपकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न होत असतानाही केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले त्यांच्यासोबत आहेत. ज्यावेळी त्यांना हे कारस्थान लक्षात येईल त्यावेळी तेही संविधान बचाव लढ्यासाठी उभे राहतील, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-pcसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRamdas Athawaleरामदास आठवले