शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

भाजप सत्तेसाठी काहीही करेल - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 13:11 IST

मनमोहनसिंगच करू शकतात मोदींचा मुकाबला !

ठळक मुद्दे२०१९ च्या निवडणुका हा भाजपासाठी संविधान बदलण्याचा शेवटचा मोका - प्रकाश आंबेडकर समविचारी पक्षाने देश पातळीवर एकत्र येण्याची गरज - प्रकाश आंबेडकर

पंढरपूर :  भारतात दोन समाजात तेढ निर्माण करुन दंगली घडवल्या जातील, युद्ध लादून सैनिकांना शहीद करण्याचे काम देखील होईल. यातून आम्ही शांतता राखण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र भाजपा निर्माण करेल. कारण भाजपा सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाणारा पक्ष असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

धनगर आरक्षणासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या धनगर मेळाव्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर पंढरपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुढे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुकाबला फक्त माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हेच करु शकतात. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आणखी राजकीय शिक्षणाची गरज आहे. काँगे्रसला पुन्हा सत्तेत यायचे असेल तर लहान पक्षांना एकत्र घ्यावे लागेल; मात्र त्यांनी कर्नाटकाच्या निवडणुकात बोध घेतल्याचे दिसून येत नाही. काँग्रेस पक्ष बदलत नसेल तर, तिसरा पर्याय निर्माण होईल. कर्नाटक येथील काँग्रेस व जेडीएस यांचे सरकार स्थिर नाही.

पुढील तीन महिन्यामध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळणार आहे. घटनेत तरतूद असलेल्या इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, मुस्लीम, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण देण्यास आमचा कोणताही विरोध नसून त्यांना आरक्षण मिळावे. यासाठी आम्ही प्रयत्न करु असे आंबेडकर म्हणाले. यापुढे अल्लुतेदार व बल्लुतेदारांना बरोबर घेऊन सत्ता संपादन करणार आहे व सत्तांतरानंतर बारा बलुतेरांचे प्रश्न सोडवित असताना, बहुजन समाजाला सोबत घेणार असल्याचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

संविधान बदलण्याचा शेवटचा मोकाभाजपाला संविधान बदलायचे आहे. त्यामुळे ते सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाण्यास तयार असल्याचे कर्नाटकाच्या निवडणुकीनंतर दिसले आहे. २०१९ च्या निवडणुका हा भाजपासाठी संविधान बदलण्याचा शेवटचा मोका आहे. यामुळे २०१९ पूर्वी अनेक प्रकार दिसून येतील असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले; मात्र त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ न देण्यासाठी समविचारी पक्षाने देश पातळीवर एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाManmohan Singhमनमोहन सिंगKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८