शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

Maharashtra Election 2019; भाजपने पोकळ राष्ट्रवादाचा राग आळवणे बंद करावे : शत्रुघ्न सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 12:13 IST

शेरोशायरीने सरकारवर केली टीका; सोलापूरच्या जाहीर सभेत बिहारी बाबूचा राजकीय जलवा

ठळक मुद्देकाँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सिन्हा यांची कुमठा नाका येथे जाहीर सभा मोदी आणि अमित शहा यांचे प्रत्यक्ष नाव न घेता त्यांच्या कारभारावर आणि शेरोशायरीतून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केलीबिहारी बाबू अर्थात अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या सभेला गर्दी होती

सोलापूर : ३७० कलम रद्द, बालाकोट हल्ला, सर्जिकल स्ट्राईक अशा देशहिताच्या विषयावर आम्ही सरकारसोबत आहोत़ अशा राष्ट्रवादाच्या मुद्यांवर त्यांनी राजकारण करू नये़ भाजपचा हा राष्ट्रवाद पोकळ आहे़ त्यांनी वारंवार अशाच पोकळ राष्ट्रवादाचा राग आलाप सुरू ठेवला आहे़ हे चुकीचे आहे आणि तो बंद करावा, अशी राजकीय सूचना करत भाजपने विकासाच्या मुद्यांवर राजकारण करावे, असा मार्मिक सल्ला देखील भाजपचे जुने सहकारी असलेले विद्यमान काँग्रेस नेते, प्रसिद्ध अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी दिला.

काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सिन्हा यांची आज दुपारी कुमठा नाका येथे जाहीर सभा झाली़ यावेळी त्यांनी मोदी आणि अमित शहा यांचे प्रत्यक्ष नाव न घेता त्यांच्या कारभारावर आणि शेरोशायरीतून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली़ बिहारी बाबू अर्थात अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या सभेला तुफान गर्दी होती़ गर्दीला संबोधित करताना ते म्हणाले, मला ही निवडणूक प्रचाराची सभा वाटत नाहीय़ ही विराट विजयी सभा वाटत आहे़ या विजयी सभेचा मी साक्षीदार असल्याचा आनंद आहे़ सभेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मध्यच्या उमेदवार प्रणिती शिंदे, दक्षिणचे उमेदवार बाबा मिस्त्री, उत्तरचे उमेदवार मनोहर सपाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक रियाज हुंडेकरी, चेतन नरोटे, अ‍ॅड़ यु़ एऩ बेरिया, संजय हेमगड्डी आदी उपस्थित होते.

सिन्हा म्हणाले, भारतीय अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांना नोबल पुरस्कार जाहीर झाला आहे़ त्यांचेही म्हणणे आहे की भारतीय अर्थव्यवस्था भयानक अशा स्थितीत आहे़ यावर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे़ अशा बुद्धिवंतांचे म्हणणे सरकारने ऐकून घेतले पाहिजे़ त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे़ सरकारने विकासावर बोलले पाहिजे़ रोज तीन लाख युवक बेरोजगार होत आहेत़ महागाई वाढत आहे़ हंगर इंडेक्सच्या अहवालानुसार ११७ देशातील बेकारी, गरिबी, भूकबळीवर सर्व्हे झाला आहे़ यात १०२ क्रमांकावर भारत आहे़ तर बांगलादेश २८ व्या क्रमांकावर आहे़ श्रीलंका  ७८ व्या क्रमांकावर आहे़ माझा मित्रपक्ष राजकारणावर इतका बोलत आहे की खरोखर विकास झाला की काय असे वाटते़ प्रत्यक्षात मात्र स्थिती वेगळी आहे.

मोदी अन् शहा यांचे नाव न घेता टीका- जो पहुंच गऐं है मंजिल पे, उनको तो नही है नाजे सफर, दो कदम अभी चले नही, रफ्तार की बाते करते है, अशी शायरी झाडत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्री मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली़ ते म्हणाले की, नोटाबंदी ही अहंकारातून झाली आहे़ यातून आपण सारे उद्ध्वस्त झालो़ यात देशहित कुठेच नव्हता़ अजून यातून सावरलो नाही तोच जीएसटी लागू झाला़ जीएसटीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले़ जीएसटीचा फायदा फक्त सीए लोकांनाच झाला आहे़ यातून देशाचे मोठे नुकसान झाले आहे़ ३७० कलम रद्द करताना सरकारने देशातील अभ्यासू लोकांशी चर्चा करणे अपेक्षित होते़ त्यांची सूचना घेऊन काश्मिर प्रश्न सोडवणे गरजेचे होते़ तसे त्यांनी केलेले नाही़ यातून काय बोध घ्यायचा़

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा