शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; इंदापूरला उजनीचे पाणी देण्याचे नियोजन १७ वर्षापुर्वीच ठरलेले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 12:03 IST

मंगळेढ्यालाही वाढविली : कोल्हापूर बंधारा क्षेत्रातील कालव्याचे पाणी बंद होणार

सोलापूर : भीमा उजनी प्रकल्पाच्या पाणी वापर फेरनियोजनात इंदापूरच्या लाकडी-निबोंडी उपसा सिंचन योजनेसाठी ०.९० टीएमसी पाण्याची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती भीमा कालवा मंडळाचे सहायक अधीक्षक अभियंता यू. आर. जानराव यांनी दिली आहे.

सन २००४ मध्ये उजनी प्रकल्पास द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त देण्यात आली होती. या अहवालामध्ये लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी ०.९० टीएमसी म्हणजेच २५.४८४ दलघमी इतक्या पाणी वापराची तरतूद करण्यात आली होती. तसेच प्रवाही कालव्याच्या लाभक्षेत्रासाठी ३२.१५ टीएमसी म्हणजेच ९१०.३३ दलघमी इतक्या पाणी वापराची तरतूद होती. सन २०१४ मध्ये मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. या योजनेसाठी २.०४ टीएमसी म्हणजेच ५७.७६३ दलघमी पाणी वापराची तरतूद करण्यात आलेली होती. सन २०१९ मध्ये उजनी प्रकल्पाच्या तृतीय सुधारित मान्यतेमध्ये लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी ०.९० टीएमसी २५.४८४ दलघमीऐवजी ०.५७ टीएमसी १६.१४० दलघमी व मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी १.०१ टीएमसी २८.५९८ दलघमी तरतूद केली होती. तसेच प्रवाही कालव्याच्या लाभक्षेत्रासाठी ३४.५१ टीएमसी म्हणजे ९७७.१५१ दलघमी इतक्या पाणी वापराची तरतूद हाेती.

-----

आता असा केला बदल

उजनी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या भीमा, सीना व माण नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यामुळे उजनी प्रकल्पाच्या कालवा क्षेत्रातील लाभक्षेत्र आच्छादित होत आहे. बंधाऱ्यामुळे ज्या भागात नदीवरून सिंचन होत आहे, अशा आच्छादित क्षेत्राचा अभ्यास करून ६ ऑक्टोबर रोजी भीमा उजनी प्रकल्पाच्या उपलब्ध पाण्याचे फेरनियोजन करण्यात आले आहे.

द्वितीय अहवाल मान्य केला

नवीन नियोजनानुसार उजनी प्रकल्पाचा द्वितीय सुधारित मान्यता अहवालातील मान्यतेनुसार लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी ०.९० टीएमसी व मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला शासनाने दिलेल्या प्रशासकीय मान्यतेनुसार २.०४ टीएमसी अशी तरतूद पुनर्स्थापित ठेवण्यात आलेली आहे.

लवादाची बाधा नाही

भीमा प्रकल्पाच्या सुधारित मंजूर जलनियोजनामुळे कृष्णा पाणी तंटा लवाद-१ यांनी भीमा प्रकल्पास मंजूर केलेल्या एकूण पाणी नियोजनात कोणताही बदल होत नाही, असे स्पष्टीकरण जानराव यांनी दिले आहे.

आघाडीने पुन्हा दिले

मंगळवेढा व लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेस तरतूद केलेले पाणी युती सरकारच्या काळात कमी करण्यात आले होते. आता नव्या बदलात पूर्वीचीच तरतूद महाविकास आघाडी सरकारने पुनर्स्थापित केली आहे. भाजपने कमी केलेले पाणी महाविकास आघाडीने कायम केले आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणIndapurइंदापूरwater transportजलवाहतूक