शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

मोठी बातमी; सोलापुरातील ८० हजार अतिवृष्टीग्रस्तांना लवकरच मदत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 3:26 PM

पंचनामे पूर्ण, प्रस्ताव शासनाकडे सादरi: जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली माहिती

सोलापूर : सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील तब्बल ७९ हजार ४४० शेतकरी बाधित झाले असून, ६७ हजार १९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. महसूल कर्मचारी, तसेच कृषी कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून, नुकसानभरपाईसाठी ६० कोटी १८ लाख रुपये मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

१५ ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यात ५१७ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते; परंतु प्रत्यक्षात ६१२ मिलिमीटर झाला. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, माढा, मोहोळ आणि अक्कलकोट या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ७९ हजार ४२० शेतकऱ्यांचे ६७ हजार १९४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये उडीद, सोयाबीन व फळबागांचा समावेश आहे. शासन निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी एकूण ६० कोटी १८ लाख १ हजार ९२५ रुपयांचा निधी सोलापूर जिल्ह्यासाठी आवश्यक आहे. त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे पाठविला आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार हेक्टरी जिरायत शेतीसाठी ६ हजार ८०० रुपये, फळबागांसाठी १८ हजार रुपये आणि बागायत क्षेत्रांसाठी १३ हजार ५०० रुपये, अशी मदत शासनाकडून मिळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरासरी हेक्टरी १० ते २५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

एका शेतकऱ्याचा मृत्यू

अतिवृष्टीमुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून, अनेक जनावरे दगावली आहेत. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत मिळावी, तसेच यासह मृत जनावरांच्या नुकसानभरपाईसाठी एकूण ११ लाखांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसfloodपूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार