शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

मोठी बातमी; राज्यातील ५७ साखर कारखान्यांनी एफआरपीचे ७९९ कोटी थकविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 12:05 IST

११३ कारखाने एफआरपीत क्लेअर; आरआरसी केलेल्या ३२ पैकी ३ कारखान्यांनी दिली संपूर्ण रक्कम

सोलापूर : राज्यातील १३३ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची एफआरपीप्रमाणे व त्यापेक्षा अधिक रक्कम दिली असली तरी ५७ कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ७९९ कोटी ३६ लाख रुपये थकविले आहेत. मागील वर्षीच्या गाळप हंगामासाठी तब्बल ३२ कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात आली आहे.

मागील हंगाम राज्यातील १९० साखर कारखान्यांनी घेतला होता. त्यापैकी १३३ साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार व त्यापेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. ५७ साखर कारखान्यांनी मात्र, ७९९ कोटी ३६ लाख रुपये अद्यापही दिले नाहीत. साखर आयुक्तांनी एफआरपी थकविणाऱ्या ३२ साखर कारखान्यांची आरआरसी केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांचा समावेश आहे.

मागील वर्षीच्या गाळपाचे राज्यातील साखर कारखान्यांनी २३ हजार ७ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. एफआरपीपेक्षा ३५ कोटी ९५ लाख रुपये अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील स्थिती...

  • सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी, जनहित शेतकरी, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटनेच्या वतीने गेल्या पाच महिन्यांत साखर आयुक्त, जिल्हाधिकारी व साखर सहसंचालकांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आली. तरीही ४५४ कोटी ५३ लाख रुपये शेतकऱ्यांचे थकले आहेत.
  • - साखर सहसंचालक कार्यालयाच्या मते २२५ कोटी ५२ लाख रुपये थकले असून पांडुरंग, विठ्ठलराव शिंदे, लोकनेते, सिद्धेश्वर, सासवड माळी शुगर हे कारखाने शेतकऱ्यांसोबतच्या कराराप्रमाणे बैलपोळा व दिवाळी सणाला देणार आहेत. त्यामुळे देय रक्कम ४५४ कोटी ५३ लाख रुपये दिसत आहेत.
  • - २ हजार ५२९ कोटी ८४ लाख रुपये (एकूण एफआरपीच्या ९२.९६ टक्के) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत.
टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी