शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

मोठी बातमी; राज्यातील ५७ साखर कारखान्यांनी एफआरपीचे ७९९ कोटी थकविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 12:05 IST

११३ कारखाने एफआरपीत क्लेअर; आरआरसी केलेल्या ३२ पैकी ३ कारखान्यांनी दिली संपूर्ण रक्कम

सोलापूर : राज्यातील १३३ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची एफआरपीप्रमाणे व त्यापेक्षा अधिक रक्कम दिली असली तरी ५७ कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ७९९ कोटी ३६ लाख रुपये थकविले आहेत. मागील वर्षीच्या गाळप हंगामासाठी तब्बल ३२ कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात आली आहे.

मागील हंगाम राज्यातील १९० साखर कारखान्यांनी घेतला होता. त्यापैकी १३३ साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार व त्यापेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. ५७ साखर कारखान्यांनी मात्र, ७९९ कोटी ३६ लाख रुपये अद्यापही दिले नाहीत. साखर आयुक्तांनी एफआरपी थकविणाऱ्या ३२ साखर कारखान्यांची आरआरसी केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांचा समावेश आहे.

मागील वर्षीच्या गाळपाचे राज्यातील साखर कारखान्यांनी २३ हजार ७ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. एफआरपीपेक्षा ३५ कोटी ९५ लाख रुपये अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील स्थिती...

  • सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी, जनहित शेतकरी, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटनेच्या वतीने गेल्या पाच महिन्यांत साखर आयुक्त, जिल्हाधिकारी व साखर सहसंचालकांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आली. तरीही ४५४ कोटी ५३ लाख रुपये शेतकऱ्यांचे थकले आहेत.
  • - साखर सहसंचालक कार्यालयाच्या मते २२५ कोटी ५२ लाख रुपये थकले असून पांडुरंग, विठ्ठलराव शिंदे, लोकनेते, सिद्धेश्वर, सासवड माळी शुगर हे कारखाने शेतकऱ्यांसोबतच्या कराराप्रमाणे बैलपोळा व दिवाळी सणाला देणार आहेत. त्यामुळे देय रक्कम ४५४ कोटी ५३ लाख रुपये दिसत आहेत.
  • - २ हजार ५२९ कोटी ८४ लाख रुपये (एकूण एफआरपीच्या ९२.९६ टक्के) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत.
टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी