शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मोठी बातमी; राज्यातील ५७ साखर कारखान्यांनी एफआरपीचे ७९९ कोटी थकविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 12:05 IST

११३ कारखाने एफआरपीत क्लेअर; आरआरसी केलेल्या ३२ पैकी ३ कारखान्यांनी दिली संपूर्ण रक्कम

सोलापूर : राज्यातील १३३ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची एफआरपीप्रमाणे व त्यापेक्षा अधिक रक्कम दिली असली तरी ५७ कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ७९९ कोटी ३६ लाख रुपये थकविले आहेत. मागील वर्षीच्या गाळप हंगामासाठी तब्बल ३२ कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात आली आहे.

मागील हंगाम राज्यातील १९० साखर कारखान्यांनी घेतला होता. त्यापैकी १३३ साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार व त्यापेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. ५७ साखर कारखान्यांनी मात्र, ७९९ कोटी ३६ लाख रुपये अद्यापही दिले नाहीत. साखर आयुक्तांनी एफआरपी थकविणाऱ्या ३२ साखर कारखान्यांची आरआरसी केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांचा समावेश आहे.

मागील वर्षीच्या गाळपाचे राज्यातील साखर कारखान्यांनी २३ हजार ७ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. एफआरपीपेक्षा ३५ कोटी ९५ लाख रुपये अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील स्थिती...

  • सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी, जनहित शेतकरी, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटनेच्या वतीने गेल्या पाच महिन्यांत साखर आयुक्त, जिल्हाधिकारी व साखर सहसंचालकांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आली. तरीही ४५४ कोटी ५३ लाख रुपये शेतकऱ्यांचे थकले आहेत.
  • - साखर सहसंचालक कार्यालयाच्या मते २२५ कोटी ५२ लाख रुपये थकले असून पांडुरंग, विठ्ठलराव शिंदे, लोकनेते, सिद्धेश्वर, सासवड माळी शुगर हे कारखाने शेतकऱ्यांसोबतच्या कराराप्रमाणे बैलपोळा व दिवाळी सणाला देणार आहेत. त्यामुळे देय रक्कम ४५४ कोटी ५३ लाख रुपये दिसत आहेत.
  • - २ हजार ५२९ कोटी ८४ लाख रुपये (एकूण एफआरपीच्या ९२.९६ टक्के) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत.
टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी