शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
3
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
4
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
5
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
7
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
8
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
9
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
10
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

सोलापूरातील भृगुकुलवंशीय मार्कंडेय महामुनींचा रथ सजतोय...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 2:37 PM

चांदीचा वर्ख : ६५ वर्षांपासून याच वाहनातून निघते ‘श्रीं’ची मिरवणूक

ठळक मुद्देपद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव ‘श्रीं’चे वाहन असलेल्या रथाची सजावट सुरू६५ वर्षे जुन्या सागवानी लाकडाचा रथ सोनेरी, गडद तपकिरी या रंगांनी सजला

महेश कुलकर्णी सोलापूर : पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना ‘श्रीं’चे वाहन असलेल्या रथाची सजावट सुरू आहे. ६५ वर्षे जुन्या सागवानी लाकडाचा रथ सोनेरी, गडद तपकिरी या रंगांनी सजला असून, उत्सवाच्या दिवशी आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात येणार आहे.

१९२४ साली मार्कंडेय मंदिराची स्थापना झाली. स्थापनेनंतर २९ वर्षे नारळी पौर्णिमेच्या दिवशी देवाची पालखी मिरवणूक निघत होती. १९५३ साली नरसय्या रामय्या बुर्ला यांनी ‘श्रीं’च्या उत्सवासाठी खास रथ आंध्र प्रदेशातून बनवून घेतला. सागवानी लाकडाचा रथ २० फूट लांबी, १५ फूट उंचीचा आहे. 

याचवेळी रथाला नरसय्या आकेन यांनी चांदीचा वर्ख करून दिला. या रथाच्या सारथ्याचा मान सुरुवातीपासून वर्षांपासून अंकाराम बंधूंचा आहे. रथ ओढण्यासाठी त्यांच्या घरातील बैलजोडी असते. नारळी पौर्णिमेच्या आधी महिनाभरापासून या बैलांना खुराक दिला जातो. कुठलेही काम लावण्यात येत नाही.

७.२ कि.मी. च्या मिरवणूक मार्गावर १४ तासांचा प्रवास हा रथ करतो. पुढे पालखी आणि मागे रथ. पालखीत चांदीचे शिवलिंग; रथात दीड फूट उंचीची मार्कंडेय महामुनींची सोन्याचा मुलामा असलेली मूर्ती बसविली जाते. नारळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा रथ मंदिरात आणला जातो. रथाच्या पूजेचा मान सुदर्शन गुंडला परिवाराला आहे. त्यांनी पूजा केल्यानंतर रथ मिरवणुकीसाठी रवाना होतो.

  • ७.२ 

कि.मी. प्रवास

  • १४ 

तास मिरवणूक

  • २० 

फूट रुंदी

  • १५ 

फूट उंची

  • ०२ 

टन वजन

  • १०० किलोंचे दागिने

- मार्कंडेय मंदिरात मूळ मूर्तीला १०० किलोंचे सोन्याचे दागिने आहेत. वर्षात एक दिवस म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी हे दागिने मूर्तीला परिधान करण्यात येतात. 

मिरवणुकीत विणलेली वस्त्रे ‘श्रीं’स अर्पण- नारळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दहा वाजता निघणारा रथोत्सव रात्री १२ वाजेपर्यंत चालतो. यादरम्यान मिरवणुकीत शिवलिंग आरकाल आणि त्यांचे कुटुंबीय वस्त्रे विणतात. ही वस्त्रे रथातील उत्सवमूर्तीला अर्पण करून रथोत्सवाचा समारोप करण्यात येतो.

शहरात तेलुगू भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मार्कंडेय रथोत्सवासाठी रात्री १२ पर्यंत परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आम्ही पत्राद्वारे गृहमंत्र्यांकडे केली आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नसल्याने मंडळांनी शांततेत रात्री दहाच्या आत मिरवणूक संपवावी.- सुरेश फलमारीसरचिटणीस, पद्मशाली ज्ञाती संस्था

टॅग्स :SolapurसोलापूरAndhra Pradeshआंध्र प्रदेशTamilnaduतामिळनाडू