शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान...पुढे धोका आहे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:43 IST

माझी गरज ही केवळ माझ्या कुटुंबालाच नाही तर अवघा समाज राष्ट्राला माझी गरज आहे.

शनिवारचा दिवस होता...शाळा नियमितपणे सुरू होती...सकाळचे नऊ वाजले असतील... प्रचंड मोठा आवाज झाला. मी वर्गाबाहेर गेटच्या दिशेने धावलो. एक कार रिव्हर्स घेताना जोरात बंद गेटला धडकली. गेट लॉक असल्याने रॉड वाकला. तुटलाही असेल, काहीच कळत नव्हतं,कारण यावेळी लहान मुलं तिथं थांबतात कुणी नाही याची खात्री केली, हायसं वाटलं. एक टू व्हीलर माझ्या गाडीवर पडून टच झालं, संबंधित गाडीचंही डॅमेज झालं. रितसर पंचनामा वगैरे झाला. शाळेतून परतताना त्याच दिवशी कुत्रा,शेळी,सायकलवाले बºयापैकी आडवे आले.

सायंकाळी साडेसहा वाजता होटगी रोडवरुन जाताना रस्ता दुभाजक जागेतून एकजण वळला तर दुसरा आसºयाकडे जात होता. जोराची डॅश होऊन दोघेही पडले. सर्वांनी त्यांना व गाड्यांना बाजूला केलं. रात्री घरी परतताना कंबर तलाव पुलावर अ‍ॅक्टिव्हा स्लीप होऊन दोन तरुण खाली पडले. मागे कोणी नव्हतं हे बरं. या सर्व घटनांत सुदैवाने कोणासही गंभीर इजा व तितकं नुकसान नाही.

दोन्ही टू व्हीलर चालकांना हेल्मेट नव्हते, फोर व्हीलरचालक गाडी चालवण्याच्या स्थितीत नव्हता. या आणि अशा घटना वारंवार घडतात. खरंतर यात रस्त्याचा काही दोष नाही. रस्ते चांगले झाल्याने प्रगतीचा वेग वाढला पाहिजे पण आज मृत्यूचा वेग वाढताना दिसतो. आज आपण कोणतीही गाडी चालवताना केवळ स्वत: व्यवस्थित चालवण्याबरोबर समोरील चालकाच्या चालवण्याकडे लक्ष देणं ही आपलीच जबाबदारी आहे. कारण चालकांच्या डोक्यातील अनेक विचारांची गर्दी, वाढणारा वेग, हेल्मेटबाबत बेफिकिरी, बेशिस्त वाहतूक, पादचाºयांची,भाजीवाले, फेरी व गाडीवाले यांची रस्त्यावरील गर्दी. सर्वांना झालेली घाई,अगदी सिग्नलला हिरवा दिवा येण्याआधी बरेच लोक निघून गेलेले असतात. तेव्हा सर्वांच्या या कृती गंभीर आहेत. सावधान ..  पुढे धोका. हे ब्रीदवाक्य मनात खूप बिंबवावं लागेल. जेव्हा अपघात होतात तेव्हा चूक कोणाची ? हे शोधण्यापेक्षा सावधानता महत्त्वाची आहे. कारण कधीकधी भरुन न निघणारे नुकसान होत असते.

आपल्या प्रवासाचे अंतर कितीही असू दे. वेळ, वेग व शिस्त महत्त्वाचीच. काम कितीही महत्त्वाचं असू दे त्यापेक्षा आपलं जीवन अनमोल आहे. आपण कुटुंब प्रमुख असाल तर  आणखी जबाबदारी वाढते. घरी तुमची कोणीतरी वाट पाहतंय,यांचं भान अखंड असावं. अनेकदा इतरांच्या चुकांची शिक्षाही तुम्हाला भोगावी लागते. शांत राहा. स्वस्थ राहा,कारण आणखी त्रागा करून तुमचंच नुकसान होणार. काळजी घ्यावी लागेल. चिंतन करावंच लागेल कारण सावधान... पुढे धोका आहे.

गर्दीच्या ठिकाणी आणखी गर्दी आपण करु नये, खरेदीला गेल्यानंतर गाडी व्यवस्थित पार्क करावी. गाड्या ओव्हरलोड करू नये. घाटरस्त्यावर संपूर्ण सावधानता हवी,चढण चढणाºयांना आधी वाट द्यावी, वाहतुकीचे सर्व नियम तंतोतंत पाळावेच कारण सावधान पुढे धोका आहे.

चला आपण सारे आतापासूनच शुभसंकल्प करु या की मी सर्व वाहतुकीचे नियम पाळेन, गाडी चालवताना मी डोक्यात इतर कुठलाही विचार नाही ठेवता लक्ष रस्त्यावर ठेवेन. मी शिक्षित तर आहे थोडं जाणते व शहाणपणाने वागेन. माझी गरज ही केवळ माझ्या कुटुंबालाच नाही तर अवघा समाज राष्ट्राला माझी गरज आहे. या विचारांनी आपण आपलं व इतरांचं जगणं सुरक्षित व सुंदर करु शकतो आणि सारे जण ते करु. मग नक्कीच अशा प्रकारच्या अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होतील. तेव्हा सावधान.. पुढे धोका आहे याचा जरुर जरुर विचार करु या. - रवींद्र देशमुख(लेखक झेडपी शाळेत शिक्षक आहेत) 

टॅग्स :Solapurसोलापूरroad safetyरस्ते सुरक्षा