शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

सावधान...पुढे धोका आहे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:43 IST

माझी गरज ही केवळ माझ्या कुटुंबालाच नाही तर अवघा समाज राष्ट्राला माझी गरज आहे.

शनिवारचा दिवस होता...शाळा नियमितपणे सुरू होती...सकाळचे नऊ वाजले असतील... प्रचंड मोठा आवाज झाला. मी वर्गाबाहेर गेटच्या दिशेने धावलो. एक कार रिव्हर्स घेताना जोरात बंद गेटला धडकली. गेट लॉक असल्याने रॉड वाकला. तुटलाही असेल, काहीच कळत नव्हतं,कारण यावेळी लहान मुलं तिथं थांबतात कुणी नाही याची खात्री केली, हायसं वाटलं. एक टू व्हीलर माझ्या गाडीवर पडून टच झालं, संबंधित गाडीचंही डॅमेज झालं. रितसर पंचनामा वगैरे झाला. शाळेतून परतताना त्याच दिवशी कुत्रा,शेळी,सायकलवाले बºयापैकी आडवे आले.

सायंकाळी साडेसहा वाजता होटगी रोडवरुन जाताना रस्ता दुभाजक जागेतून एकजण वळला तर दुसरा आसºयाकडे जात होता. जोराची डॅश होऊन दोघेही पडले. सर्वांनी त्यांना व गाड्यांना बाजूला केलं. रात्री घरी परतताना कंबर तलाव पुलावर अ‍ॅक्टिव्हा स्लीप होऊन दोन तरुण खाली पडले. मागे कोणी नव्हतं हे बरं. या सर्व घटनांत सुदैवाने कोणासही गंभीर इजा व तितकं नुकसान नाही.

दोन्ही टू व्हीलर चालकांना हेल्मेट नव्हते, फोर व्हीलरचालक गाडी चालवण्याच्या स्थितीत नव्हता. या आणि अशा घटना वारंवार घडतात. खरंतर यात रस्त्याचा काही दोष नाही. रस्ते चांगले झाल्याने प्रगतीचा वेग वाढला पाहिजे पण आज मृत्यूचा वेग वाढताना दिसतो. आज आपण कोणतीही गाडी चालवताना केवळ स्वत: व्यवस्थित चालवण्याबरोबर समोरील चालकाच्या चालवण्याकडे लक्ष देणं ही आपलीच जबाबदारी आहे. कारण चालकांच्या डोक्यातील अनेक विचारांची गर्दी, वाढणारा वेग, हेल्मेटबाबत बेफिकिरी, बेशिस्त वाहतूक, पादचाºयांची,भाजीवाले, फेरी व गाडीवाले यांची रस्त्यावरील गर्दी. सर्वांना झालेली घाई,अगदी सिग्नलला हिरवा दिवा येण्याआधी बरेच लोक निघून गेलेले असतात. तेव्हा सर्वांच्या या कृती गंभीर आहेत. सावधान ..  पुढे धोका. हे ब्रीदवाक्य मनात खूप बिंबवावं लागेल. जेव्हा अपघात होतात तेव्हा चूक कोणाची ? हे शोधण्यापेक्षा सावधानता महत्त्वाची आहे. कारण कधीकधी भरुन न निघणारे नुकसान होत असते.

आपल्या प्रवासाचे अंतर कितीही असू दे. वेळ, वेग व शिस्त महत्त्वाचीच. काम कितीही महत्त्वाचं असू दे त्यापेक्षा आपलं जीवन अनमोल आहे. आपण कुटुंब प्रमुख असाल तर  आणखी जबाबदारी वाढते. घरी तुमची कोणीतरी वाट पाहतंय,यांचं भान अखंड असावं. अनेकदा इतरांच्या चुकांची शिक्षाही तुम्हाला भोगावी लागते. शांत राहा. स्वस्थ राहा,कारण आणखी त्रागा करून तुमचंच नुकसान होणार. काळजी घ्यावी लागेल. चिंतन करावंच लागेल कारण सावधान... पुढे धोका आहे.

गर्दीच्या ठिकाणी आणखी गर्दी आपण करु नये, खरेदीला गेल्यानंतर गाडी व्यवस्थित पार्क करावी. गाड्या ओव्हरलोड करू नये. घाटरस्त्यावर संपूर्ण सावधानता हवी,चढण चढणाºयांना आधी वाट द्यावी, वाहतुकीचे सर्व नियम तंतोतंत पाळावेच कारण सावधान पुढे धोका आहे.

चला आपण सारे आतापासूनच शुभसंकल्प करु या की मी सर्व वाहतुकीचे नियम पाळेन, गाडी चालवताना मी डोक्यात इतर कुठलाही विचार नाही ठेवता लक्ष रस्त्यावर ठेवेन. मी शिक्षित तर आहे थोडं जाणते व शहाणपणाने वागेन. माझी गरज ही केवळ माझ्या कुटुंबालाच नाही तर अवघा समाज राष्ट्राला माझी गरज आहे. या विचारांनी आपण आपलं व इतरांचं जगणं सुरक्षित व सुंदर करु शकतो आणि सारे जण ते करु. मग नक्कीच अशा प्रकारच्या अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होतील. तेव्हा सावधान.. पुढे धोका आहे याचा जरुर जरुर विचार करु या. - रवींद्र देशमुख(लेखक झेडपी शाळेत शिक्षक आहेत) 

टॅग्स :Solapurसोलापूरroad safetyरस्ते सुरक्षा