शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

सावधान! ऑनलाईन जोडीदार शोधताय तर फसाल जरा जपून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 12:56 IST

यासंदर्भात फसल्या गेलेल्या शिवाजी रणसुरे यांच्या मते औरंगाबादच्या एका संस्थेकडे त्यांच्या मुलासाठी ३५०० रुपये भरले

सोलापूर- अलीकडे मुला-मुलींचे विवाह जमवणे एक समस्या होऊन बसली आहे. अनेकजण स्थानिक वधू-वर सूचक मंडळाकडे नाव नोंदवतात. मेळाव्याच्या माध्यमातूनही अनेकांचे विवाहाचे योग जुळून येतात. त्याच्या जोडीला आता ऑनलाईन नोंदणी करायची. भरमसाठ फी भरायची. यातून काहींचे विवाह जमतात तर काहींना पैसे भरल्यानंतर पुढे काहीच होत नाही. नाहक गंडवले जात असल्याच्याही व्यथा वधू-वरांच्या पित्यांकडून होऊ लागल्या आहेत. यासंबंधी तक्रार करायची म्हटले तरी पत्ते अर्धवट असणे, ज्या मोबाईलवरून फोन येतो तो पुन्हा लागत नाही अशावेळी कोणाला सांगायचे म्हणून अनेक मंडळी तक्रारी करायलाही पुढे येत नाहीत, असे सांगण्यात येत आहे.

यासंदर्भात फसल्या गेलेल्या शिवाजी रणसुरे यांच्या मते औरंगाबादच्या एका संस्थेकडे त्यांच्या मुलासाठी ३५०० रुपये भरले. रोहिणी नामक महिला कर्मचाऱ्यांकडून स्थळाची माहिती सांगण्यात आली. प्रत्यक्षात शहानिशा करताना मात्र दिलेला पत्ता चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. थोडाफार असाच अनुभव शिवाजी सोमवंशी यांना आला. त्यांना धुळे येथील विवाह संस्थेकडून गौरी मॅडम बोलतेय म्हणून मोबाईलवरून फोन आला. वास्तविक त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची नोंदणी केलेली नव्हती. त्यांनी त्यांच्या भावाचा बायोडाटा कोठूनतरी मिळवला आणि स्थळांची अपुरी माहिती दिली. ३६०० रुपये भरल्यानंतर स्थळाचा बायोडाटा आणि बोलणे करून देण्याबद्दल सांगितले. अशी अनेक उदाहरणे असूनही उघडपणे कोणी बोलायला तयार नसल्याचे सांगण्यात आले.

संस्थेबद्दल माहिती नसताना पैसे भरायचे कसे?

पूर्वी कधी पाहिलेही नाही आणि ओळखीचे नसतानाही मोबाईलवरून आलेल्या एका फोनवरून ‘आम्ही लग्न जमवून देतो’ या वाक्यावर विश्वास कसा ठेवायचा? शिवाय अगोदर पैसे कसे भरायचे. पैसे पाठवण्यासाठी क्यूआर कोड पाठवला जातो. त्यानंतर व्हॉट्सॲपवरून नाहीसा केेला जातो. याबद्दल शहानिशा करूनच पुढचे पाऊल उचलावे, असे आवाहन शिवाजी सोमवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केेले.

लग्न ही आयुष्यभराची रेशीमगाठ बांधणारं पवित्र बंधन आहे. आपल्या मुला-मुलींची सोयरीक पाहत असताना अत्यंत सजगपणे शहानिशा करून पुढील प्रक्रिया पार पाडावी. अनोळखी फोनकॉलवर सहजासहजी विश्वास ठेवून खातरजमा करावी.

- रवींद्र जोगीपेठकर, सोयरीक प्रो.

पालकांच्या असाहाय्यतेचा गैरफायदा

- मुला-मुलींचं विवाह जमवण्यास विलंब होत असल्यामुळे पालक चिंताग्रस्त आहेत. योग्य वयात मुलीचे हात पिवळे व्हावेत, अशी प्रत्येकांचीच इच्छा असते. नेमके पालकांच्या या भावनांचा काही मंडळी गैरफायदा घेऊन फसवणूक करतात. अशावेळी अत्यंत काळजीपूर्वक पाऊल टाकावे.

- श्याम कदम, सामाजिक कार्यकर्ते

-----

टॅग्स :marriageलग्नonlineऑनलाइनLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट