शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

सावधान! ऑनलाईन जोडीदार शोधताय तर फसाल जरा जपून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 12:56 IST

यासंदर्भात फसल्या गेलेल्या शिवाजी रणसुरे यांच्या मते औरंगाबादच्या एका संस्थेकडे त्यांच्या मुलासाठी ३५०० रुपये भरले

सोलापूर- अलीकडे मुला-मुलींचे विवाह जमवणे एक समस्या होऊन बसली आहे. अनेकजण स्थानिक वधू-वर सूचक मंडळाकडे नाव नोंदवतात. मेळाव्याच्या माध्यमातूनही अनेकांचे विवाहाचे योग जुळून येतात. त्याच्या जोडीला आता ऑनलाईन नोंदणी करायची. भरमसाठ फी भरायची. यातून काहींचे विवाह जमतात तर काहींना पैसे भरल्यानंतर पुढे काहीच होत नाही. नाहक गंडवले जात असल्याच्याही व्यथा वधू-वरांच्या पित्यांकडून होऊ लागल्या आहेत. यासंबंधी तक्रार करायची म्हटले तरी पत्ते अर्धवट असणे, ज्या मोबाईलवरून फोन येतो तो पुन्हा लागत नाही अशावेळी कोणाला सांगायचे म्हणून अनेक मंडळी तक्रारी करायलाही पुढे येत नाहीत, असे सांगण्यात येत आहे.

यासंदर्भात फसल्या गेलेल्या शिवाजी रणसुरे यांच्या मते औरंगाबादच्या एका संस्थेकडे त्यांच्या मुलासाठी ३५०० रुपये भरले. रोहिणी नामक महिला कर्मचाऱ्यांकडून स्थळाची माहिती सांगण्यात आली. प्रत्यक्षात शहानिशा करताना मात्र दिलेला पत्ता चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. थोडाफार असाच अनुभव शिवाजी सोमवंशी यांना आला. त्यांना धुळे येथील विवाह संस्थेकडून गौरी मॅडम बोलतेय म्हणून मोबाईलवरून फोन आला. वास्तविक त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची नोंदणी केलेली नव्हती. त्यांनी त्यांच्या भावाचा बायोडाटा कोठूनतरी मिळवला आणि स्थळांची अपुरी माहिती दिली. ३६०० रुपये भरल्यानंतर स्थळाचा बायोडाटा आणि बोलणे करून देण्याबद्दल सांगितले. अशी अनेक उदाहरणे असूनही उघडपणे कोणी बोलायला तयार नसल्याचे सांगण्यात आले.

संस्थेबद्दल माहिती नसताना पैसे भरायचे कसे?

पूर्वी कधी पाहिलेही नाही आणि ओळखीचे नसतानाही मोबाईलवरून आलेल्या एका फोनवरून ‘आम्ही लग्न जमवून देतो’ या वाक्यावर विश्वास कसा ठेवायचा? शिवाय अगोदर पैसे कसे भरायचे. पैसे पाठवण्यासाठी क्यूआर कोड पाठवला जातो. त्यानंतर व्हॉट्सॲपवरून नाहीसा केेला जातो. याबद्दल शहानिशा करूनच पुढचे पाऊल उचलावे, असे आवाहन शिवाजी सोमवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केेले.

लग्न ही आयुष्यभराची रेशीमगाठ बांधणारं पवित्र बंधन आहे. आपल्या मुला-मुलींची सोयरीक पाहत असताना अत्यंत सजगपणे शहानिशा करून पुढील प्रक्रिया पार पाडावी. अनोळखी फोनकॉलवर सहजासहजी विश्वास ठेवून खातरजमा करावी.

- रवींद्र जोगीपेठकर, सोयरीक प्रो.

पालकांच्या असाहाय्यतेचा गैरफायदा

- मुला-मुलींचं विवाह जमवण्यास विलंब होत असल्यामुळे पालक चिंताग्रस्त आहेत. योग्य वयात मुलीचे हात पिवळे व्हावेत, अशी प्रत्येकांचीच इच्छा असते. नेमके पालकांच्या या भावनांचा काही मंडळी गैरफायदा घेऊन फसवणूक करतात. अशावेळी अत्यंत काळजीपूर्वक पाऊल टाकावे.

- श्याम कदम, सामाजिक कार्यकर्ते

-----

टॅग्स :marriageलग्नonlineऑनलाइनLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट