शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

बस्त्याची बार्शी...भांड्यांची सरशी; कोकणातला कच्चामाल रेल्वेनं कुर्डूवाडीत, तिथून बैलगाडीनं बार्शीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 11:55 AM

विविध व्हरायटींची ग्राहकांना भुरळ : कारखानदारांनी केले मार्केटिंग

ठळक मुद्देकारखानदारी आणि दुकान चालविताना येणाºया अडचणींमुळे नवीन पिढी आता इतर व्यवसायाकडे वळली अलीकडे तांब्या-पितळेच्या भांड्यांचे आरोग्याच्या बाबतीमध्ये महत्त्व व आयुर्वेदाचे महत्त्व वाढले

बार्शी : बार्शी शहरात एकूण २२ दुकाने आहेत. प्रत्येक भांडे दुकानदाराला आपल्या दुकानांमध्ये किमान १०० ते १५० प्रकारची भांडी ठेवावी लागतात़ त्यामध्ये चमच्यापासून पाणी तापविण्याच्या बंबापर्यंतचा समावेश असतो़ सध्याच्या ग्राहकांना व्हरायटी हवी असते, ती येथे पाहायला मिळते़ त्यामुळेच आजही बार्शीत भांडे खरेदीसाठी ग्राहकांचा ओढा आहे़ शिवाय बार्शीच्या कारखानदारांनीही त्याचे चांगलेच मार्केटिंग केल्याचे दिसून येते.

राजाभाऊ यवणकर यांच्या दुकान आणि कारखान्याची १२५ वर्षांची परंपरा आहे. पंचाहत्तरी ओलांडलेले राजाभाऊ म्हणाले, ४०-५० वर्षांपूर्वी कच्चामाल हा रेल्वेने रत्नागिरीहून कुर्डूवाडी येथे यायचा आणि तेथून बैलगाडीने बार्शी येथे आणला जायचा़ त्यावेळी लोखंडी घागरी, पाट्या अन् तवे अशा वस्तू बनविल्या जायच्या. मात्र नंतर पितळी घागरी, हांडे बनवायला सुरुवात केली. 

उसाच्या रसापासून गूळ बनविण्यासाठी, हळकुंड उकळून हळद बनविण्यासाठी लागणारी मोठी कढई आम्ही बनवायचो. इंदापूरपासून बीडपर्यंत त्यांना ग्राहकांची मागणी होती. आमच्या कढया इतक्या प्रसिद्ध होत्या की त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी एका दौºयानिमित्त आल्यानंतर पाहिल्या व असा कारखाना सांगली भागात सुरू करा, असे वडिलांना सांगितले, असेही त्यांनी सांगितले़ बार्शीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये मिलिंद पाठक यांचा अ‍ॅल्युमिनियमची भांडी बनविण्याचा कारखाना आहे़ या कारखान्यात ताट, डबे, चरवी, कढई या प्रकारची भांडी तयार होतात.

अडचणीमुळे नवी पिढी अन्य व्यवसायाकडे वळलीअलीकडच्या काळात कारखानदारी अडचणीत आली आहे, असे सांगत यवणकरांनी फॅक्टरी अ‍ॅक्ट फार जाचक आहे़ दहापेक्षा अधिक कामगार कारखान्यात ठेवल्यानंतर ईएसआय व पीएफ भरण्यापासून अनेक कायद्यांचे पालन करावे लागते़ कामगारांचे हित पाहिले पाहिजे, पण नियमात शिथिलतेचीही गरज आहे़ कारखानदारी आणि दुकान चालविताना येणाºया अडचणींमुळे नवीन पिढी आता इतर व्यवसायाकडे वळल्याचे राजाभाऊ यवणकर यांनी सांगितले.

म्हणूनच तांब्याच्या भांड्यांच्या मागणीत वाढबार्शीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये विभुते यांचा तांब्या-पितळेची भांडी बनविण्याचा खूप जुना कारखाना आहे़ कारखान्याची माहिती सांगताना तिसºया पिढीतील कुमार विभुते यांनी बाजारात नवे ट्रेंड येतात़ अलीकडे तांब्या-पितळेच्या भांड्यांचे आरोग्याच्या बाबतीमध्ये महत्त्व व आयुर्वेदाचे महत्त्व वाढले आहे़ त्यामुळे या भांड्यांमधून अन्न सेवन करणे व पाणी पिणे याला ग्राहक पसंती देऊ लागले आहेत़ या कारखान्यामध्ये तांब्या-पितळेची घागर व हंडा बनविले जातात़ पूर्वी पुणे व भंडारा येथून कारखान्यासाठी लागणारा कच्चामाल येत असे, त्यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरbarshi-acबार्शीMarketबाजार